शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रमासाठी बचतगट, सामाजिक संस्थांची मदत घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:58 IST

जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदारयादी शुद्धीकरण मोहिमेत बचतगट, सामाजिक संघटना, महाविद्यालयीन युवकांची मदत घेतली जाणार आहे. शाळेतील प्रभातफेरीद्वारे मतदार जनजागृती करावी तसेच वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी तहसीलदारांसह बीएलओंनी प्रयत्न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदारयादी शुद्धीकरण मोहिमेत बचतगट, सामाजिक संघटना, महाविद्यालयीन युवकांची मदत घेतली जाणार आहे. शाळेतील प्रभातफेरीद्वारे मतदार जनजागृती करावी तसेच वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी तहसीलदारांसह बीएलओंनी प्रयत्न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.शनिवारी नायगाव येथे नायगाव विधानसभा मतदारसंघाअंतर्गत समाविष्ट असलेल्या नायगाव, उमरी व धर्माबाद तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ व पर्यवेक्षिकांची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी डोंगरे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदारयादीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर केली जात आहे. १ सप्टेंबर रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.निवडणुकीमध्ये मतदारयादी, मतदार आणि आता ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीनला महत्त्व आले आहे. कर्मचाऱ्यांनी प्रत्येक निवडणूक नवीन समजून प्रशिक्षण घ्यावे. निवडणूक प्रक्रियेतील बदलही आत्मसात करावे, असा सल्ला दिला.यावेळी मतदानस्तरीय केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांच्या जबाबदाºया, त्यांची कामे याबाबत मतदार नोंदणी अधिकारी तथा धर्माबादचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी मार्गदर्शन केले. उमरीचे सहायक मतदान अधिकारी तथा तहसीलदार श्रीकांत गायकवाड, नायगावच्या तहसीलदार तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी सुरेखा नांदे, धर्माबादच्या तहसीलदार ज्योती चव्हाण यांनीही यावेळी आपापल्या तालुकाअंतर्गत सुरु असलेल्या मतदार नोंदणी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम व निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा यावेळी सादर केला.नायब तहसीलदार सुनील माचेवाड, नायब तहसीलदार शंकर नरावाड, नायब तहसीलदार डी. डी. लोंढे यांची यावेळी उपस्थिती होती. या प्रशिक्षण शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीपूर्वी नाव नोंदविण्याची शेवटची संधीजिल्ह्यात १ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीवर हरकती, आक्षेप, दावे स्वीकारण्यात येत आहेत. मतदारांना नावनोंदणी, नाव वगळणी, दुरुस्तीही ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत करता येणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी ही शेवटची संधी ठरणार आहे. निवडणूक काळात चुका दर्शविण्यापेक्षा वेळेतच दुरुस्ती करुन घेतली तर निश्चित लाभदायक ठरणार आहे याची सर्व मतदारांना बीएलओंनी जाणीव करुन द्यावी. त्यातून पुढील काळातील वाद टाळता येतील असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूक