शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रमासाठी बचतगट, सामाजिक संस्थांची मदत घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:58 IST

जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदारयादी शुद्धीकरण मोहिमेत बचतगट, सामाजिक संघटना, महाविद्यालयीन युवकांची मदत घेतली जाणार आहे. शाळेतील प्रभातफेरीद्वारे मतदार जनजागृती करावी तसेच वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी तहसीलदारांसह बीएलओंनी प्रयत्न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदारयादी शुद्धीकरण मोहिमेत बचतगट, सामाजिक संघटना, महाविद्यालयीन युवकांची मदत घेतली जाणार आहे. शाळेतील प्रभातफेरीद्वारे मतदार जनजागृती करावी तसेच वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी तहसीलदारांसह बीएलओंनी प्रयत्न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.शनिवारी नायगाव येथे नायगाव विधानसभा मतदारसंघाअंतर्गत समाविष्ट असलेल्या नायगाव, उमरी व धर्माबाद तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ व पर्यवेक्षिकांची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी डोंगरे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदारयादीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर केली जात आहे. १ सप्टेंबर रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.निवडणुकीमध्ये मतदारयादी, मतदार आणि आता ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीनला महत्त्व आले आहे. कर्मचाऱ्यांनी प्रत्येक निवडणूक नवीन समजून प्रशिक्षण घ्यावे. निवडणूक प्रक्रियेतील बदलही आत्मसात करावे, असा सल्ला दिला.यावेळी मतदानस्तरीय केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांच्या जबाबदाºया, त्यांची कामे याबाबत मतदार नोंदणी अधिकारी तथा धर्माबादचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी मार्गदर्शन केले. उमरीचे सहायक मतदान अधिकारी तथा तहसीलदार श्रीकांत गायकवाड, नायगावच्या तहसीलदार तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी सुरेखा नांदे, धर्माबादच्या तहसीलदार ज्योती चव्हाण यांनीही यावेळी आपापल्या तालुकाअंतर्गत सुरु असलेल्या मतदार नोंदणी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम व निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा यावेळी सादर केला.नायब तहसीलदार सुनील माचेवाड, नायब तहसीलदार शंकर नरावाड, नायब तहसीलदार डी. डी. लोंढे यांची यावेळी उपस्थिती होती. या प्रशिक्षण शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीपूर्वी नाव नोंदविण्याची शेवटची संधीजिल्ह्यात १ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीवर हरकती, आक्षेप, दावे स्वीकारण्यात येत आहेत. मतदारांना नावनोंदणी, नाव वगळणी, दुरुस्तीही ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत करता येणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी ही शेवटची संधी ठरणार आहे. निवडणूक काळात चुका दर्शविण्यापेक्षा वेळेतच दुरुस्ती करुन घेतली तर निश्चित लाभदायक ठरणार आहे याची सर्व मतदारांना बीएलओंनी जाणीव करुन द्यावी. त्यातून पुढील काळातील वाद टाळता येतील असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूक