शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रमासाठी बचतगट, सामाजिक संस्थांची मदत घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:58 IST

जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदारयादी शुद्धीकरण मोहिमेत बचतगट, सामाजिक संघटना, महाविद्यालयीन युवकांची मदत घेतली जाणार आहे. शाळेतील प्रभातफेरीद्वारे मतदार जनजागृती करावी तसेच वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी तहसीलदारांसह बीएलओंनी प्रयत्न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदारयादी शुद्धीकरण मोहिमेत बचतगट, सामाजिक संघटना, महाविद्यालयीन युवकांची मदत घेतली जाणार आहे. शाळेतील प्रभातफेरीद्वारे मतदार जनजागृती करावी तसेच वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी तहसीलदारांसह बीएलओंनी प्रयत्न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.शनिवारी नायगाव येथे नायगाव विधानसभा मतदारसंघाअंतर्गत समाविष्ट असलेल्या नायगाव, उमरी व धर्माबाद तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ व पर्यवेक्षिकांची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी डोंगरे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदारयादीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर केली जात आहे. १ सप्टेंबर रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.निवडणुकीमध्ये मतदारयादी, मतदार आणि आता ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीनला महत्त्व आले आहे. कर्मचाऱ्यांनी प्रत्येक निवडणूक नवीन समजून प्रशिक्षण घ्यावे. निवडणूक प्रक्रियेतील बदलही आत्मसात करावे, असा सल्ला दिला.यावेळी मतदानस्तरीय केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांच्या जबाबदाºया, त्यांची कामे याबाबत मतदार नोंदणी अधिकारी तथा धर्माबादचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी मार्गदर्शन केले. उमरीचे सहायक मतदान अधिकारी तथा तहसीलदार श्रीकांत गायकवाड, नायगावच्या तहसीलदार तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी सुरेखा नांदे, धर्माबादच्या तहसीलदार ज्योती चव्हाण यांनीही यावेळी आपापल्या तालुकाअंतर्गत सुरु असलेल्या मतदार नोंदणी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम व निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा यावेळी सादर केला.नायब तहसीलदार सुनील माचेवाड, नायब तहसीलदार शंकर नरावाड, नायब तहसीलदार डी. डी. लोंढे यांची यावेळी उपस्थिती होती. या प्रशिक्षण शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीपूर्वी नाव नोंदविण्याची शेवटची संधीजिल्ह्यात १ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीवर हरकती, आक्षेप, दावे स्वीकारण्यात येत आहेत. मतदारांना नावनोंदणी, नाव वगळणी, दुरुस्तीही ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत करता येणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी ही शेवटची संधी ठरणार आहे. निवडणूक काळात चुका दर्शविण्यापेक्षा वेळेतच दुरुस्ती करुन घेतली तर निश्चित लाभदायक ठरणार आहे याची सर्व मतदारांना बीएलओंनी जाणीव करुन द्यावी. त्यातून पुढील काळातील वाद टाळता येतील असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूक