शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

आठवीतील विद्यार्थ्यांने दोघांना वाचविले; एकजण बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 02:50 IST

मानार नदीच्या घाटावर शनिवारी दुपारी आंघोळ करण्यासाठी गेलेले तीन शाळकरी मुले पाण्यात बुडू लागली.

कंधार / बहाद्दरपुरा (जि. नांदेड) : मानार नदीच्या घाटावर शनिवारी दुपारी आंघोळ करण्यासाठी गेलेले तीन शाळकरी मुले पाण्यात बुडू लागली. आठवीतील कामेश्वर जगन्नाथ वाघमारे (घोडजकर) हा तिघांच्या मदतीला धावला. यातील आदित्य कोंडिबा दुंडे (१६) व गजानन विश्वनाथ श्रीमंगले (१६) या दोघांना त्याने मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले, तर ओम विजय मठपती (१६) हा बुडून मरण पावला.घोडज येथे प्रसिद्ध ऋषी महाराज मंदिर येथे शनिवारी दुपारी कंधार येथील मनोविकास माध्यमिक शाळेतील दहावीत शिकत असलेले ओम विजय मठपत्ती, आदित्य कोंडिबा दुंडे व गजानन विश्वनाथ श्रीमंगले हे तिघे दर्शनासाठी गेले होते. तिघेही मानार नदीवरील धोबीघाटावर आंघोळ करून दर्शनाला जाणार होते. नदीपात्रातील पाणी पायऱ्यापर्यंत आलेले होते. तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. तिघेही बुडत असताना झालेला आवाज कामेश्वरच्या कानावर पडला. त्याने धाडसाने दोघांना वाचवले. परंतु ओम विजय मठपती या मुलाला वाचविण्यात अपयश आले.