शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीत प्रभाग पद्धतीमुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड, सत्ताधाऱ्यांना मात्र झाला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:22 IST

महापालिकेच्या यापूर्वी झालेल्या दोन सार्वत्रिक निवडणुका या प्रभाग पद्धतीनेच झाल्या होत्या. त्याचा चांगला लाभ काँग्रेसला झाला होता. परिणामी आगामी ...

महापालिकेच्या यापूर्वी झालेल्या दोन सार्वत्रिक निवडणुका या प्रभाग पद्धतीनेच झाल्या होत्या. त्याचा चांगला लाभ काँग्रेसला झाला होता. परिणामी आगामी काळातही प्रभाग पद्धतीनेच मनपा निवडणुका घेण्याची मागणी काँग्रेसने जाहीरपणे केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने वाॅर्ड पद्धतीनुसार निवडणूक होईल असे सांगितले होते. तो निर्णय आता महाविकास आघाडी सरकारने फिरवला आहे.

पालिकेतील सध्याची स्थिती

महापालिकेत सध्या काँग्रेसचे एकहाती बहुमत आहे. भाजपाचे ६, सेना १, अपक्ष एक असे संख्याबळ आहे. प्रभाग पद्धतीचा लाभ घेत काँग्रेसने आपल्या दुबळ्या उमेदवारांनाही विजयापर्यंत खेचून आणण्याची किमया साधली आहे.

आता अशी असेल पालिकेतील स्थिती

यापूर्वी झालेल्या दोन निवडणुकांचा अनुभव गाठीशी असल्याने प्रभाग पद्धतीत विजयाचे गणित कसे साधायचे याची रचना काँग्रेसकडे तयार असते. इतर पक्षही आता आपले संख्याबळ वाढविण्यासाठी कामाला लागणार आहेत.

एका मतदाराला तिघांना द्यावे लागणार मत

महापालिका निवडणुकीत यापूर्वी एका प्रभागात दोन आणि त्यानंतर तर ४ उमेदवारांना नांदेडकरांनी मतदान केले आहे. आता एका प्रभागात तीन उमेदवार निवडायचे आहेत. प्रभाग पद्धती नांदेडकरांसाठी नवी नाही.

शहराच्या विकासाला बसणार खीळ

प्रभाग रचनेमुळे नगरसेवक एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. विकासकामे खोळंबली आहेत. मूलभूत सुविधा मिळत नाहीत.

-अब्दुल शफीक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

वाॅर्ड पद्धतीने आपल्या वाॅर्डाचा विकास साधता आला असता. सर्व काही वाॅर्डासाठी अशी परिस्थिती राहिली असती.

-प्रशांत इंगोले, वंचित बहुजन आघाडी

राजकीय अपेक्षांवरही पाणी

प्रभाग पद्धतीमुळे नगरसेवकांची जबाबदारी निश्चित होत नाही. त्यामुळे वाॅर्ड पद्धतीने निवडणूक होईल, अशी अपेक्षा होती.

-तुलजेश यादव, सेना

प्रभाग पद्धतीने नगरसेवक नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. वाॅर्ड पद्धतीने ती टाळता आली असती.

-दीपकसिंह रावत, भाजपा

अनेक उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

-जीवन घोगरे, राष्ट्रवादी

प्रभाग पद्धतीने वाॅर्डांचा विकास साधता येतो. एकत्र येऊन निधी मिळवता येतो. प्रभाग पद्धती योग्यच आहे. -वीरेंद्रसिंघ गाडीवाले, काँग्रेस.