शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

महापालिका निवडणुकीत प्रभाग पद्धतीमुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड, सत्ताधाऱ्यांना मात्र झाला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:22 IST

महापालिकेच्या यापूर्वी झालेल्या दोन सार्वत्रिक निवडणुका या प्रभाग पद्धतीनेच झाल्या होत्या. त्याचा चांगला लाभ काँग्रेसला झाला होता. परिणामी आगामी ...

महापालिकेच्या यापूर्वी झालेल्या दोन सार्वत्रिक निवडणुका या प्रभाग पद्धतीनेच झाल्या होत्या. त्याचा चांगला लाभ काँग्रेसला झाला होता. परिणामी आगामी काळातही प्रभाग पद्धतीनेच मनपा निवडणुका घेण्याची मागणी काँग्रेसने जाहीरपणे केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने वाॅर्ड पद्धतीनुसार निवडणूक होईल असे सांगितले होते. तो निर्णय आता महाविकास आघाडी सरकारने फिरवला आहे.

पालिकेतील सध्याची स्थिती

महापालिकेत सध्या काँग्रेसचे एकहाती बहुमत आहे. भाजपाचे ६, सेना १, अपक्ष एक असे संख्याबळ आहे. प्रभाग पद्धतीचा लाभ घेत काँग्रेसने आपल्या दुबळ्या उमेदवारांनाही विजयापर्यंत खेचून आणण्याची किमया साधली आहे.

आता अशी असेल पालिकेतील स्थिती

यापूर्वी झालेल्या दोन निवडणुकांचा अनुभव गाठीशी असल्याने प्रभाग पद्धतीत विजयाचे गणित कसे साधायचे याची रचना काँग्रेसकडे तयार असते. इतर पक्षही आता आपले संख्याबळ वाढविण्यासाठी कामाला लागणार आहेत.

एका मतदाराला तिघांना द्यावे लागणार मत

महापालिका निवडणुकीत यापूर्वी एका प्रभागात दोन आणि त्यानंतर तर ४ उमेदवारांना नांदेडकरांनी मतदान केले आहे. आता एका प्रभागात तीन उमेदवार निवडायचे आहेत. प्रभाग पद्धती नांदेडकरांसाठी नवी नाही.

शहराच्या विकासाला बसणार खीळ

प्रभाग रचनेमुळे नगरसेवक एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. विकासकामे खोळंबली आहेत. मूलभूत सुविधा मिळत नाहीत.

-अब्दुल शफीक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

वाॅर्ड पद्धतीने आपल्या वाॅर्डाचा विकास साधता आला असता. सर्व काही वाॅर्डासाठी अशी परिस्थिती राहिली असती.

-प्रशांत इंगोले, वंचित बहुजन आघाडी

राजकीय अपेक्षांवरही पाणी

प्रभाग पद्धतीमुळे नगरसेवकांची जबाबदारी निश्चित होत नाही. त्यामुळे वाॅर्ड पद्धतीने निवडणूक होईल, अशी अपेक्षा होती.

-तुलजेश यादव, सेना

प्रभाग पद्धतीने नगरसेवक नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. वाॅर्ड पद्धतीने ती टाळता आली असती.

-दीपकसिंह रावत, भाजपा

अनेक उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

-जीवन घोगरे, राष्ट्रवादी

प्रभाग पद्धतीने वाॅर्डांचा विकास साधता येतो. एकत्र येऊन निधी मिळवता येतो. प्रभाग पद्धती योग्यच आहे. -वीरेंद्रसिंघ गाडीवाले, काँग्रेस.