शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
2
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
3
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
4
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
5
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
6
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
7
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
8
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
9
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
10
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
11
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
12
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
13
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
14
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
15
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
16
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
17
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
18
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
19
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
20
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?

महापालिका निवडणुकीत प्रभाग पद्धतीमुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड, सत्ताधाऱ्यांना मात्र झाला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:22 IST

महापालिकेच्या यापूर्वी झालेल्या दोन सार्वत्रिक निवडणुका या प्रभाग पद्धतीनेच झाल्या होत्या. त्याचा चांगला लाभ काँग्रेसला झाला होता. परिणामी आगामी ...

महापालिकेच्या यापूर्वी झालेल्या दोन सार्वत्रिक निवडणुका या प्रभाग पद्धतीनेच झाल्या होत्या. त्याचा चांगला लाभ काँग्रेसला झाला होता. परिणामी आगामी काळातही प्रभाग पद्धतीनेच मनपा निवडणुका घेण्याची मागणी काँग्रेसने जाहीरपणे केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने वाॅर्ड पद्धतीनुसार निवडणूक होईल असे सांगितले होते. तो निर्णय आता महाविकास आघाडी सरकारने फिरवला आहे.

पालिकेतील सध्याची स्थिती

महापालिकेत सध्या काँग्रेसचे एकहाती बहुमत आहे. भाजपाचे ६, सेना १, अपक्ष एक असे संख्याबळ आहे. प्रभाग पद्धतीचा लाभ घेत काँग्रेसने आपल्या दुबळ्या उमेदवारांनाही विजयापर्यंत खेचून आणण्याची किमया साधली आहे.

आता अशी असेल पालिकेतील स्थिती

यापूर्वी झालेल्या दोन निवडणुकांचा अनुभव गाठीशी असल्याने प्रभाग पद्धतीत विजयाचे गणित कसे साधायचे याची रचना काँग्रेसकडे तयार असते. इतर पक्षही आता आपले संख्याबळ वाढविण्यासाठी कामाला लागणार आहेत.

एका मतदाराला तिघांना द्यावे लागणार मत

महापालिका निवडणुकीत यापूर्वी एका प्रभागात दोन आणि त्यानंतर तर ४ उमेदवारांना नांदेडकरांनी मतदान केले आहे. आता एका प्रभागात तीन उमेदवार निवडायचे आहेत. प्रभाग पद्धती नांदेडकरांसाठी नवी नाही.

शहराच्या विकासाला बसणार खीळ

प्रभाग रचनेमुळे नगरसेवक एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. विकासकामे खोळंबली आहेत. मूलभूत सुविधा मिळत नाहीत.

-अब्दुल शफीक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

वाॅर्ड पद्धतीने आपल्या वाॅर्डाचा विकास साधता आला असता. सर्व काही वाॅर्डासाठी अशी परिस्थिती राहिली असती.

-प्रशांत इंगोले, वंचित बहुजन आघाडी

राजकीय अपेक्षांवरही पाणी

प्रभाग पद्धतीमुळे नगरसेवकांची जबाबदारी निश्चित होत नाही. त्यामुळे वाॅर्ड पद्धतीने निवडणूक होईल, अशी अपेक्षा होती.

-तुलजेश यादव, सेना

प्रभाग पद्धतीने नगरसेवक नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. वाॅर्ड पद्धतीने ती टाळता आली असती.

-दीपकसिंह रावत, भाजपा

अनेक उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

-जीवन घोगरे, राष्ट्रवादी

प्रभाग पद्धतीने वाॅर्डांचा विकास साधता येतो. एकत्र येऊन निधी मिळवता येतो. प्रभाग पद्धती योग्यच आहे. -वीरेंद्रसिंघ गाडीवाले, काँग्रेस.