शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

नगरपालिकेतील टोकाच्या राजकारणामुळे कंधार शहराच्या विकासाचा वेग खुंटला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 13:47 IST

विकासासाठी प्रत्येक जण आपआपले राजकीय गणित मांडू लागल्याने मोठी कोंडी निर्माण झाली आहे़ त्यामुळे शहराची अवस्था विचित्र होत असल्याचे चित्र आहे़

ठळक मुद्देनगरपालिकेत नळगे गटाकडे नगराध्यक्ष दिले तर आ़ चिखलीकर गटाचे १० नगरसेवक आहेतराज्य शासनाने २०१६ अखेरपर्यंतचा अखर्चिक निधी परत घेण्याची हालचाल सुरू केली आहे

कंधार ( नांदेड ) : शहराचा कायापालट करून सुंदर शहराचे स्वप्न मृगजळ ठरत आहे. आ. प्रताप पा. चिखलीकर व माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे यांच्यातील टोकाचे राजकारण विकासाचा खेळखंडोबा करणारे ठरत आहे, अशी भावना शहरात पसरल्याने विकासाचा वेग कधी वाढणार, असा सवाल केला जात आहे़

कंधार ऩप़ निवडणूक अतिशय अटीतटीची झाली़ मतदारांनी आ़ प्रताप पाटील चिखलीकर व माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे यांना नाराज केले नाही़ विकासासाठी सतर्क असणा-या नळगे गटाकडे नगराध्यक्ष दिले़ तर आ. चिखलीकर समर्थक १० जण निवडून दिले़ काँग्रेस विरूद्ध शिवसेना अशी लढत न राहता वैेयक्तिक राजकीय अस्तित्वाच्या लढाईचे स्वरूप या निवडणुकीला आले होते. विकासासाठी प्रत्येक जण आपआपले राजकीय गणित मांडू लागल्याने मोठी कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे शहराची अवस्था विचित्र होत असल्याचे चित्र आहे़

व्यापारी गाळे, महाराणा प्रताप चौक ते शिवाजी चौक रस्ता, मुख्य रस्त्यावरील आठवडी बाजार वाहतुकीची बेशिस्त, पाणीपुरवठा इ. प्रश्नांची उकल करण्यास राजकारण नडत आहे. दोन्ही नेतृत्वाला एकत्रित आणणारा राजकीय दुवा नाही़ जो होता तो एक बाजू धरल्याने तशी शक्यता आता दिसत नाही़ विकास करण्याच्या आश्वासनाने आता नगरसेवकांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे. आगामी राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती अनेक नगरसेवकांत बळावत चालली आहे. तसेच शहरवासियांना विकासाचे राजकारण असेच होणार का? असा प्रश्न पडला आहे़विकासासाठी निधी मिळत नसल्याची ओरड सातत्याने होत असते़, परंतु निधी असताना विकास साधता येत नसल्यास दोष कोणाचा, हा खरा प्रश्न आहे.

राज्य शासनाने २०१६ अखेरपर्यंतचा अखर्चिक निधी परत घेण्याची हालचाल सुरू केली असताना टोकाचे राजकारण विकासकामाच्या आड येणे, ही शहरवासियांना खटकणारी बाब ठरत आहे़ सर्वांगसुंदर शहर विकास टोकदार राजकारणात अडकला आहे़ आ़प्रताप पाटील चिखलीकरांना मतदारसंघाकडे लक्ष पुरवून २०१९ ची निवडणूक लढवायची आहे़ शहर विकासाचे मॉडेल विधानसभा मतदारसंघात रुजविण्यासाठी उपयोगात आणण्याची गरज आहे. त्यासाठी येथील कार्यकर्त्यांसह प्रमुख पदाधिका-यांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न आ. चिखलीकरांनी करणे गरजेच आहे़ अरविंद  नळगे यांनीही विकासासाठी एक पाऊल मागे घेणे निकडीचे आहे़ अशी राजकीय वर्तुळात चर्चा झडत आहे़ दोन्ही नेत्यांनी एकत्रित न येता टोकाची भूमिका कायम ठेवल्यास आगामी काळात राजकीय किंमत चुकवावी लागण्याचा धोका असून शहर विकासाचा वेगही दिवसेंदिवस कमी होण्याची चिन्हे आहेत. 

व्यापारी गाळे, महाराणा प्रताप चौक ते शिवाजी चौक रस्ता, मुख्य रस्त्यावरील आठवडी बाजार वाहतुकीची बेशिस्त, पाणीपुरवठा आदी प्रश्नांची उकल करण्यास राजकारण नडत आहे़ दोन्ही नेतृत्वाला एकत्रित आणणारा राजकीय दुवा नाही. जो होता तो एक बाजू धरल्याने तशी शक्यता आता दिसत नाही़ विकास करण्याच्या आश्वासनाने आता नगरसेवकांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे़ आगामी राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती अनेक नगरसेवकांत बळावत चालली आहे़ तसेच शहरवासियांना विकासाचे राजकारण असेच होणार का, असा प्रश्न पडला आहे.