शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
4
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
5
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
6
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
7
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
9
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
10
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
11
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
12
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
13
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
14
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
15
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
16
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
17
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
18
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
19
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
Daily Top 2Weekly Top 5

रान पेटविण्याची वेळ आणू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:22 IST

१२७व्या घटनादुरुस्तीने आरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्याची असल्याचे केंद्राने सांगितले, तर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवा, अशी मागणी राज्याने ...

१२७व्या घटनादुरुस्तीने आरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्याची असल्याचे केंद्राने सांगितले, तर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवा, अशी मागणी राज्याने केंद्राकडे केली आहे. दोन्ही सरकारांनी काय करायचे ते करावे, परंतु आम्हाला आरक्षण मिळालेच पाहिजे. राज्यातील मराठा समाज हा शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे जोपर्यंत सिद्ध होणार नाही, तोपर्यंत समाजाला आरक्षण मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या पंधरा पानी पत्रावरही संभाजी राजेंनी नाराजी व्यक्त केली. शासनाने १४ जुलैला जीआर काढला होता. त्यानुसार २०१४ ते कोरोना काळापर्यंत ज्या मराठा उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या त्यांना रूजू करुन घ्या, असे त्यात म्हटले होते. परंतु जात प्रमाणपत्राची पडताळणी न झाल्याने गरीब मराठा समाजाला नोकऱ्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे असा जीआर काय कामाचा? असा सवालही त्यांनी केला. आरक्षणासाठी अशीच बनवा बनवी सुरू राहिल्यास आम्हाला दिल्ली आणि मुंबईवर चाल करून जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

चौकट- फक्त एका वसतिगृहाचे झाले उद्घाटन

शासनाने १५ ऑगस्टपर्यंत राज्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी २३ वसतिगृहे सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. परंतु त्यातील फक्त एका वसतिगृहाचे उद्घाटन झाले. तेही ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यामुळे शिंदे यांचे आम्ही आभार मानतो. अजूनही वेळ हातातून गेलेली नाही. त्यामुळे सरकारने प्रामाणिक प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

चौकट- मावळ्यांनो मास्क वापरा...

आपण सर्व खरे मराठा आहोत. आपली ताकद दाखविण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. परंतु अजून कोरोना पूर्णपणे हद्दपार झाला नाही. समोर बसलेल्या अनेकांनी मास्क घातले नाहीत. परंतु असे करू नका. मास्क वापरा, तब्बेतीला जपा, असा प्रेमाचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. तसेच भाषणापूर्वी आपल्या खिशातील सॅनिटायझरची बाटली काढून माईक सॅनिटाईज केला.

भाजप, सेना, काँग्रेस प्रतिनिधींची हजेरी

मूक आंदोलनात भाजपाचे खा. प्रताप चिखलीकर, सेनेचे खा. हेमंत पाटील, आ. मोहन हंबर्डे, आ. राम पाटील रातोळीकर, आ. बालाजी कल्याणकर, आ. तुषार राठोड, आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची उपस्थिती होती.

पोलिसांनी केले योग्य नियोजन

मूक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे स्पष्ट होते. त्यामुळे शहरातील वाहतूक खोळंबू नये किंवा कुठे गडबड होऊ नये, यासाठी पोलिसांनी योग्य नियोजन केले. वाहतूक इतर मार्गांनी वळविली होती. तसेच आंदोलन संपताच काही वेळातच हा रस्ताही वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.