शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

छत्रपतींच्या स्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गावर चर्चा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:20 IST

चव्हाण म्हणाले, अरबी समुद्रातील श्री शिवछत्रपतींच्या स्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी बोटीचा मार्ग आहे. परंतु, बोटीद्वारे बाराही महिने स्मारकापर्यंत जाता येणार नाही. ...

चव्हाण म्हणाले, अरबी समुद्रातील श्री शिवछत्रपतींच्या स्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी बोटीचा मार्ग आहे. परंतु, बोटीद्वारे बाराही महिने स्मारकापर्यंत जाता येणार नाही. खासकरून पावसाळ्याचे तीन ते चार महिने अरबी समु्द्रात प्रचंड वेगाने वारे वाहतात. त्यामुळे बोटीशिवाय स्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी भूमिगत किंवा इतर पर्यायी मार्गांबाबत शासनस्तरावर चर्चा करण्यात आली. परंतु, सध्या या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे अद्याप यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. परंतु, शासनाने कागदोपत्री तयारी केली आहे. न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्रीस्तरावर हा निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे चव्हाण म्हणाले. तर, मराठा आरक्षणाच्या विषयावरून विरोधक राजकारण करीत आहेत. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच शासनाची भूमिका आहे. परंतु, विरोधकांना मराठा आणि ओबीसीमध्ये वाद निर्माण करावयाचा आहे. राजकारणासाठी ते या मुद्याचा वापर करीत आहेत. भरती करू नये, असे सरकारच म्हणत नाही. नवीन भरतीबाबत प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. अद्याप त्यावर निर्णय झाला नाही. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात मार्चमध्ये सुनावणी आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर या विषयात सरकार पुढील भूमिका स्पष्ट करेल, असेही चव्हाण म्हणाले.