शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींच्या स्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गावर चर्चा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:20 IST

चव्हाण म्हणाले, अरबी समुद्रातील श्री शिवछत्रपतींच्या स्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी बोटीचा मार्ग आहे. परंतु, बोटीद्वारे बाराही महिने स्मारकापर्यंत जाता येणार नाही. ...

चव्हाण म्हणाले, अरबी समुद्रातील श्री शिवछत्रपतींच्या स्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी बोटीचा मार्ग आहे. परंतु, बोटीद्वारे बाराही महिने स्मारकापर्यंत जाता येणार नाही. खासकरून पावसाळ्याचे तीन ते चार महिने अरबी समु्द्रात प्रचंड वेगाने वारे वाहतात. त्यामुळे बोटीशिवाय स्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी भूमिगत किंवा इतर पर्यायी मार्गांबाबत शासनस्तरावर चर्चा करण्यात आली. परंतु, सध्या या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे अद्याप यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. परंतु, शासनाने कागदोपत्री तयारी केली आहे. न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्रीस्तरावर हा निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे चव्हाण म्हणाले. तर, मराठा आरक्षणाच्या विषयावरून विरोधक राजकारण करीत आहेत. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच शासनाची भूमिका आहे. परंतु, विरोधकांना मराठा आणि ओबीसीमध्ये वाद निर्माण करावयाचा आहे. राजकारणासाठी ते या मुद्याचा वापर करीत आहेत. भरती करू नये, असे सरकारच म्हणत नाही. नवीन भरतीबाबत प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. अद्याप त्यावर निर्णय झाला नाही. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात मार्चमध्ये सुनावणी आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर या विषयात सरकार पुढील भूमिका स्पष्ट करेल, असेही चव्हाण म्हणाले.