शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

धर्माबाद बस स्थानक दुरुस्तीचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:09 IST

महाराष्ट्र बसस्थानक दुरूस्ती बांधकाम निकृष्ट दर्जाचे अन् तेही संथगतीने होत असल्याने त्या ठिकाणी थांबण्यास, ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. जुन्या इमारतीवर बांधकाम होत असल्याने भविष्यात ते कोसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे.

ठळक मुद्देदुरूस्तीसाठी १ कोटी मंजूरजुन्या भिंतीवरच होतेय बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : महाराष्ट्र बसस्थानक दुरूस्ती बांधकाम निकृष्ट दर्जाचे अन् तेही संथगतीने होत असल्याने त्या ठिकाणी थांबण्यास, ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. जुन्या इमारतीवर बांधकाम होत असल्याने भविष्यात ते कोसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे.धर्माबाद बसस्थानक दुरूस्ती व बांधकामासाठी ६० लाख व समोर पंटागणात मजबुती, डांबरीकरण, रस्त्यासाठी ४० लाख असे एकूण १ कोटी रुपयांचा निधी तीन वर्षांपूर्वीच मंजूर झाला. दोन वर्षानंतर सन २०१८ जानेवारीमध्ये दुरूस्ती व बांधकामाला सुरूवात झाली. आज दहा महिने उलटले तरीही बांधकाम पूर्ण झाले नाही. संथगतीने होत आहे. तेही जुन्या बसस्थानकाचे पत्र (टिन) काढले. जुने अँगल तसेच ठेवून त्यावर केवळ नवीन टिन बसवून बाजूला असलेल्या इमारतीच्या जुन्या भिंतीवर दुसरी मजली म्हणून बांधकाम करण्यात येत आहे. जुन्या भिंतीवर बांधकाम करीत असल्याने भविष्यात ते कोसळण्याची भीती निर्माण होत आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असून ते मातीमिश्रीत आहे़ तसेच बसस्थानकाच्या पटांगणात केवळ गिट्टी टाकली असून डांबरीकरणाचा अद्याप बेपत्ता आहे. साठ लाखांचे काम व चाळीस लाखांचे काम केवळ दहा ते पंधरा लाखांत गुंडाळण्याचा प्रकार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. दहा महिने उलटले तरीही कामाने गती घेतली नसून संथगतीने अन् तेही निष्कृष्ट दर्जाचे होत आहे.सुविधांचा अभावधर्माबाद येथील नवीन बसस्थानक सन १९९२ साली बांधले असून २५ वर्षानंतर दुरूस्तीसाठी फंड मिळाला़ दरम्यान, येथील बसस्थानक ओसाड बनले होते. याठिकाणी कोणतीच सुविधा नसून पिण्याचे पाणी, शौचालयाचा अभाव, पंखे बंद, रात्रीला लाईट नाही़ खिडक्या, दारे तुटलेले, आजूबाजूला झुडपे वाढलेले, अस्वच्छता या कारणांमुळे प्रवासी इकडे फिरकत नव्हते़दुरूस्तीचे कामे थातूरमातूर

  • पंचवीस वर्षानंतर एक कोटीचा निधी मिळाला़ तेही इस्टीमेटनुसार कामे होत नसून थातूरमातूर करण्यात येत आहे. एसटी महामंडळाचे बांधकाम विभाग व गुत्तेदार यांच्या मनमानी कारभारामुळे भविष्यात इमारत धोकादायक ठरणार असून काही घटना घडली तर याला जबाबदार कोण? असा सवाल प्रवासी वर्गातून केला जात आहे. दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून एसटी महामंडळाला आर्थिक नुकसान झाले आहे़
टॅग्स :Nandedनांदेडpwdसार्वजनिक बांधकाम विभाग