शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देवायचीवाडी ,काटकळबा,मजरे धर्मापुरी पंचवीस वर्षात पंधरा वेळा महिलांनी भूषवले सरपंचपद....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:54 IST

बारुळ- कंधार तालुक्यातील देवयाचीवाडी,काटकळबा,मजरे, धर्मापुरी, राहटी ग्रामपंचायतीच्या मागील पंचवीस वर्षाच्या इतिहासात १५ महिलांना वीस वर्षे सरपंच पदी काम करण्याची ...

बारुळ-

कंधार तालुक्यातील देवयाचीवाडी,काटकळबा,मजरे, धर्मापुरी, राहटी ग्रामपंचायतीच्या मागील पंचवीस वर्षाच्या इतिहासात १५ महिलांना वीस वर्षे सरपंच पदी काम करण्याची संधी मिळाली तर बारूळ येथे पंचवीस वर्षात एकाच वेळेस महिलांना सरपंच पदाची संधी मिळाली. अनेक महिलांच्या कार्यकाळात त्यांच्या घरातील पुरुषांनी किंवा सत्ताधारी गटातील प्रमुखाने पडद्यामागून सूत्रे हलविली यामुळे गावातील महिलाविषयक प्रश्न कायम राहिले ते प्रश्न ना पुरुष सरपंचांना सोडविता आले ना महिला सरपंचाच्या काळात सुटले

आज अनेक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत त्यात राजकीय क्षेत्रही मागे राहिले नाही. शासनाकडून ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य सरपंच पदाचे महिलांसाठी स्वतंत्र आरक्षण काढण्यात येत आहे त्यामुळे आपसूकच महिलांना ग्रामपंचायतीचा म्हणजे गावाचा कारभार हाकून गावाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी आपले योगदान देण्याचा मार्ग खुला झाला. देवायचीवाडी,काटकळबा,मजरे वरंवट राहटी चिचोली मगलसागवी मागील पंचवीस वर्षाच्या कालावधीतील २० महिलांच्या हाती सरपंच पद राहिले तर बारुळ औराळ चिखली नदनवन बाचोटी ग्रामपंचायतीत मागील पंचवीस वर्षाच्या काळात फक्त एकच वेळेस तर काही ठिकाणी दोन वेळस महिला सरपंचांनी कारभार पाहिला. महिलांना सरपंच पदी काम करण्याची संधी मिळाली असती तरी त्यांना गावच्या विकासासाठी त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविता आलेल्या नाहीत, कधी पती कधी मुलगा तर कधी सत्तेतील पदाधिकारी कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याने त्यांच्या कामकाजावर त्यांचा परिणाम झाला. विशेष काय या महिलांना काम करताना गावातील महिलांसाठी सोयीसुविधा नियुक्त सार्वजनिक शौचालय उभे करता आले नाही. इथे सोयी-सुविधांचा अभाव आहे. गत वर्षी पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास आल्याने पाण्याची सोय झाली मात्र, योजनेआधी पाण्यासाठी महिलांची अहोरात्र होणारी धावपळ वेगळीच होती. शिवाय महिलांसाठी असलेल्या शासकीय योजनाही गावात प्रभावीपणे राबविण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष यापूर्वी झाले. तेच दुर्लक्ष महिला सरपंच असतानाही केवळ पुरुषांच्या हस्तक्षेपामुळे झाले.

ग्रामीण भागात जुन्या संकल्पना कायम...

महिला सरपंच चांगले काम करू शकतात मात्र पुरुषांच्या हस्तक्षेपामुळे महिलांची पदे ही केवळ नावाला उरली आहेत. कामकाज करताना कधी घरातील पुरुषाचा तर कधी सत्तेतील सहकाऱ्यांचा हस्तक्षेप होतो. आजही ग्रामीण भागात महिलांची चूल आणि मूल ही संकल्पना कायम आहे. मुलगी शिकली आणि प्रगती झाली ही बाब खरी आहे मात्र राजकारणात ते सूत्र लागू होत नाही.