शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पार्डीकरांचा महामार्गासाठी एक इंचही जमीन न देण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 12:18 IST

महामार्ग क्रमांक ३६१ साठी संपादित जमिनीचा पूर्ण शंभर टक्के मावेजा मिळाल्याशिवाय एक इंचही जमीन देणार नसल्याचा निर्धार मंगळवारी पार्डी (ता. अर्धापूर) येथे झालेल्या शेतक-यांच्या बैठकीत करण्यात आला.

ठळक मुद्दे शेतक-यांचा इशारा : महामार्ग क्रमांक ३६१ साठी संपादित जमिनीचा १०० टक्के मावेजा हवा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्धापूर : महामार्ग क्रमांक ३६१ साठी संपादित जमिनीचा पूर्ण शंभर टक्के मावेजा मिळाल्याशिवाय एक इंचही जमीन देणार नसल्याचा निर्धार मंगळवारी पार्डी (ता. अर्धापूर) येथे झालेल्या शेतक-यांच्या बैठकीत करण्यात आला.महामार्ग क्रमांक ३६१ साठी भूसंपादनाचे काम वेगात सुरु असून, शासनाचे नियम डावलून मनमानी पद्धतीने मूल्यांकन होत असल्याचा आरोप शेतक-यांचा आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांत वेगवेगळा मावेजा दिला जात आहे. जेवढी जमीन घेण्यात आली, त्याच्या चारपट दर दिला पाहिजे, असा नियम आहे. आवश्यकता भासल्यास मूल्यांकनाच्या पाचपट मावेजा देण्याची तरतूद आहे, असे असताना केवळ ५ गुंठे जमिनीला १०० टक्के मावेजा दिला जात आहे. घेतलेल्या जमिनीचा शंभर टक्के मावेजा देण्याची हमी अधिकारी देत नाहीत, तोपर्यंत या कामासाठी अधिकारी, कर्मचा-यांना शेतक-यांनी शेतात फिरु देवू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी केले. शेतक-यांनी आपल्या शेतात रोवलेले मोजमापाचे खांब उखडून टाकण्याचा निर्णय यावेळी घेतला. पार्डी येथील रतन देशमुख यांच्या शेतात ही बैठक घेण्यात आली. बैठकीस हदगाव, अर्धापूर, नांदेड, लोहा तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी विठ्ठलराव देशमुख, मारोतराव देशमुख, प्रकाश देशमुख, सदाशिवराव देशमुख, गजानन देशमुख, आनंदराव देशमुख, गोविंद देशमुख, राजकुमार देशमुख, संभाजीराव देशमुख, नारायणराव देशमुख, राहुल पत्रे, अब्दुल मुबीन अब्दुल लतिफ, माधव देशमुख, सुनील कदम, नवनाथ देशमुख, सचिन देशमुख, रत्नाकर देशमुख, आयुब खान, मनसब खान, दत्ता चिलोरे, गोविंद वाघमारे आदी उपस्थित होते.वेगवेगळ्या जिल्ह्यांत वेगवेगळा मावेजा दिला जात आहे. जेवढी जमीन घेण्यात आली, त्याच्या चारपट दर दिला पाहिजे, असा नियम आहे. आवश्यकता भासल्यास मूल्यांकनाच्या पाचपट मावेजा देण्याची तरतूद आहे, असे असताना केवळ ५ गुंठे जमिनीला १०० टक्के मावेजा दिला जात आहे.