शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

प्रशासनाची दिरंगाई, ७५ टक्के शेतकऱ्यांचे पंचनामे शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:19 IST

सप्टेंबर महिन्यातील ७ आणि ८ तारखेला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नदी-नाल्यांना पूर येऊन हजारो हेक्टर ...

सप्टेंबर महिन्यातील ७ आणि ८ तारखेला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नदी-नाल्यांना पूर येऊन हजारो हेक्टर जमिनी खरडल्या. यातून नुकसान माेठ्या प्रमाणात झाल्याने सामुदायिक पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांसह मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी प्रा.शिवाजी सोनखेडकर यांनी केली होती. जिल्ह्यातील नुकसानीची तीव्रता लक्षात घेता मागील दोन वर्षांप्रमाणे सामुदायिक पंचनामे होणे गरजेचे होते. परंतु, प्रशासनाकडे याकडे दुर्लक्ष करत वैयक्तिक पंचनामे सुरू केले आहेत. जिल्ह्यातील ८५ महसूल मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्याअंतर्गत येणाऱ्या १३८३ पैकी ४०५ गावांतील १ लाख २४ हजार ११३ शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत. तर ३ लाख २७ हजार ४७५ शेतकऱ्यांच्या २ लाख ६९ हजार ६२२ हेक्टरचे पंचनामे करण्याचे काम बाकी आहे. यामध्ये मुखेड तालुक्यातील ३० हजार १३६ हेक्टर, किनवट - ११ हजार ३२६, उमरी - १० हजार १५६, नायगाव - २८ हजार २७४, मुदखेड - ८ हजार ४७७, बिलोली - २१ हजार ३७१, अर्धापूर - ४ हजार ९२८, धर्माबाद - ११ हजार २८०, कंधार - ४२ हजार १३१, भोकर - २ हजार, लोहा - ५१ हजार २३५, देगलूर - २२ हजार ७१८, हिमायतनगर - २१ हजार ७१८ तर नांदेड तालुक्यातील ४ हजार ४०७ हेक्टरचे पंचनामे शिल्लक आहेत.

महसूल विभागाकडून सुरू असलेल्या पंचनाम्यांची गती पाहता सोयाबीन काढणी पूर्ण झाल्यानंतर पंचनामे होतील, असेच चित्र आहे. दहा दिवसात सव्वा लाख शेतकऱ्यांचे पंचनामे झाले तर सव्वातीन लाख शेतकऱ्यांचे पंचनामे शिल्लक असून त्यासाठी महिनाभराचा वेळ लागू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल की नाही, याबाबत शंकाच आहे. तसेच शासनाने ७ आणि ८ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत कुठलीही मदत अद्यापपर्यंत जाहीर केली नाही.

चाैकट...

संयुक्त पंचनाम्यांना ब्रेक

स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल, कृषी विभागाचे प्रतिनिधी यांनी मिळून पंचनामे करणे गरजेचे आहे. परंतु, मंडळात केवळ तलाठी फिरताना दिसत आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे सुरू नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल की नाही, याबाबत शाशंकता आहे. मागील दोन वर्षात झालेल्या सामुदायिक पंचनाम्याप्रमाणे सामुदायिक पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे होते.

पंचनामे करणाऱ्यांना कुठलेच ज्ञान नाही...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीकविम्याचे दावे ऑनलाइन होत नसतील तर कृषी सहाय्यक अथवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. परंतु, ऑफलाइन अर्ज करूनही कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. तसेच पीकविमा कंपनीने काही खासगी संस्थांना पंचनामे करण्याचे काम दिले आहे. त्यांच्याकडून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना शेतीचे पिकांचे कुठलेही ज्ञान नाही. त्यामुळे पंचनाम्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.