शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पदवी परीक्षा उरली नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:51 IST

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सुरू केलेल्या होम परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्याच महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षण करण्यात येत असल्याने आणि प्राध्यापकही तेच असल्याचे परीक्षार्थीमध्ये कुठलीही भीती राहिली नसल्याचे चित्र आहे़

भारत दाढेल।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सुरू केलेल्या होम परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्याच महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षण करण्यात येत असल्याने आणि प्राध्यापकही तेच असल्याचे परीक्षार्थीमध्ये कुठलीही भीती राहिली नसल्याचे चित्र आहे़स्वारातीम विद्यापीठाने स्थापनेपासून अभ्यासक्रम, परीक्षा पद्धतीत वेगळा आकृतिबंध निर्माण करून नवा पॅटर्न निर्माण केला होता़ परंतु सद्य:स्थितीतील विद्यापीठाचा पदवीचा अभ्यासक्रम परीक्षा पद्धतीमुळे घसरत चालला आहे़ सीबीसीएस अभ्यासक्रम, सत्र परीक्षा, होम परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा बट्ट्याबोळ झाला आहे़ महाविद्यालयात झालेल्या परीक्षेचे पेपर मूल्याकंन, फेरतपासणी त्याच प्राध्यापकांनी करायची हा नवा नियम विद्यापीठाने लागू केला आहे़ पदवी परीक्षेतील केंद्रावर बहि:स्थ पर्यवेक्षक, भरारी पथक नसल्याने होम परीक्षेत सर्वत्र कॉप्यांचा सुळसुळाट सुरू आहे़ आपल्याच विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई करण्यास महाविद्यालय प्रशासन पुढे येत नाही़विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन कुलगुरू डॉ़ जनार्दन वाघमारे यांनी अभ्यासक्रम, परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल केले होते़ विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयात कॉपीमुक्तीचा नवा पॅटर्न तयार झाला होता़ परीक्षार्थ्याने कॉपी करून नये म्हणून डब्ल्यूपीसी, एसपीसी, निकाल राखून ठेवणे यासारखे नवीन नियम लागू केले होते़ त्यामुळे कॉपीवर मोठ्या प्रमाणात आळा बसला होता़परंतु आता या विद्यापीठाने पदवी परीक्षेत सत्र परीक्षा लागू केली़ त्यानंतर चॉईस बसे क्रेटीट सिस्टिम लागू केली़ यामध्ये विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न, अंतर्गत गुण लागू केल्याने नापास होण्याची भीती कमी झाली़ गत दोन वर्षांपासून होम परीक्षा सुरू करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण केली आहे़ परीक्षा महाविद्यालयात घेण्यात येत असून परीक्षा केंद्रावर परीक्षण करणारे प्राध्यापकही तेच असल्याने परीक्षार्थ्यांना कोणतीच भीती राहिली नाही़ परीक्षेसाठी बहि:स्थ पर्यवेक्षक म्हणून नेमणुका यावर्षी विद्यापीठाने बंद केल्यामुळे कॉपीसाठी रान मोकळे करून दिले आहे़ परीक्षा आपल्याच महाविद्यालयात देवून पेपर तपासणीही तेच प्राध्यापक करणार असल्याने परीक्षक आपल्या विद्यार्थ्यांना हात सोडून गुणदान देवून महाविद्यालयाचा निकाल चांगला लावण्याचा प्रयत्न करीत आहेत़ विद्यापीठाने मॉडरेशन ही त्याच महाविद्यालयातील प्राध्यापकाने करण्याचा नियम काढला आहे़