शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

रोडगी येथे भिक्खू संघाच्या हस्ते बुद्ध विहाराचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST

तथागत गौतम बुद्ध यांनी समस्त जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश दिला. सध्याच्या काळात जगापुढे कोरोनाचे महासंकट उभे राहिले असताना ...

तथागत गौतम बुद्ध यांनी समस्त जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश दिला. सध्याच्या काळात जगापुढे कोरोनाचे महासंकट उभे राहिले असताना मानवजातीच्या हितासाठी सर्वांनीच शिस्त, संयम, धैर्य याचा अवलंब करणे आवश्यक आहे. जगात दुःख कायम आहे, हे बुद्धाने सांगितले. त्याच्या निवारण्याचा उपायही सांगितला. बुद्ध धम्म जीवनाचा मार्ग दर्शवितो. धम्म म्हणजे नीती होय. नीतीचा विकास म्हणजेच दुःखाचे निरोधन आहे. दुःखावर मात करण्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांचे विचार अंगीकारण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटकाळातही बुद्धाचे विचार मार्गदर्शक ठरत असल्याचे प्रतिपादन येथील साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी रोडगी येथे केले.

तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६५ व्या जयंतीनिमित्त अर्धापूर तालुक्यातील रोडगी येथे महामाया प्रजापती बुद्ध विहाराची स्थापना भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आली. बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना भंते सुदर्शन आणि भंते श्रद्धानंद यांच्या हस्ते झाली. गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प, दीप‌ आणि धूपपूजन झाल्यानंतर बुद्ध विहाराचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला. ढवळे म्हणाले की, वेळ, परिस्थिती बदलली, मात्र गौतम बुद्धांच्या विचारांना आपल्या जीवनात विशेष स्थान आहे. बुद्ध म्हणजे एक पवित्र विचार असून समर्पणाची भावना आणि जगण्याची आदर्श आचारसंहिता आहे. सूत्रसंचालन भुजंग लोणे यांनी केले.‌ प्रास्ताविक शामराव लोणे यांनी, तर आभार निवृत्ती लोणे यांनी मानले. यावेळी दत्ता लोणे, हरी लोणे, हरी कोकरे, शंभुराज सोनाळे, गंगाबाई लोणे, राधाबाई लोणे, जयश्री कोकरे, वंदना कोकरे, अनुसया सोनाळे, राजश्री सोनाळे, शोभा सोनाळे, आशा कोकरे, सुनंदा कोकरे, धोंड्याबाई कोकरे, मनीषा कोकरे, विशाखा कोकरे, ज्योती लोणे, रत्नमाला लोणे आदींची उपस्थिती होती.