शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आयुष मंत्रालयाच्या निर्णयाने राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर होणार अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:58 IST

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबईच्या वतीने आयुर्वेदिक, होमिओपॅथीक आणि युनानीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. ज्या महाविद्यालयात हे प्रवेश होणे अपेक्षित होते, अशा २६ महाविद्यालयांना प्रवेशाच्या शेवटच्या फेरीत मान्यता देऊन त्या फेरीतून उरलेल्या जागा संस्थास्तरावर वर्ग करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे हजारो राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय सुविधांपासून वंचित रहावे लागणार आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे तक्रार २६ महाविद्यालयांना आॅक्टोबरमध्ये दिली मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबईच्या वतीने आयुर्वेदिक, होमिओपॅथीक आणि युनानीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. ज्या महाविद्यालयात हे प्रवेश होणे अपेक्षित होते, अशा २६ महाविद्यालयांना प्रवेशाच्या शेवटच्या फेरीत मान्यता देऊन त्या फेरीतून उरलेल्या जागा संस्थास्तरावर वर्ग करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे हजारो राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय सुविधांपासून वंचित रहावे लागणार आहे.सध्या राज्यातील आयुर्वेदिक, होमिओपॅथीक, युनानी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयुर्वेदिकची ७० महाविद्यालये, होमिओपॅथीकची ४८ महाविद्यालये तर युनानीच्या ६ महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश मिळावा व राखीव प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शासकीय सवलतींचा लाभ मिळावा, यासाठी गतवर्षी २०१७ साली राज्य सामाईक प्रवेश कक्षाने मुंबईस्थित समुपदेशन प्रवेशफेरी घेतली होती. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश सुकर झाले होते. परंतु, आयुष मंत्रालयाने सुमारे २६ महाविद्यालयांना १५ आॅक्टोबरनंतर मान्यता दिली़ त्यामुळे या महाविद्यालयांतील बहुतांश जागा रिक्त आहेत. या जागा संस्थास्तरावर भरण्यासाठीचे सूचनापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जारी केले आहे. या संस्थास्तरावरून भरलेल्या जागांसाठी राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसह आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांनादेखील संपूर्ण शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होणार आहे. राखीव प्रवर्ग तसेच कोणत्याही पात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठी मुंबईस्थित समुपदेशनफेरी घ्यावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री तसेच राज्य सीईटी कक्षाकडे शैक्षणिक सल्लागार गणेश तिडके यांनी दिले आहे़ दरम्यान, सदर विभागाने मागील वर्षीप्रमाणे शेवटच्या फेरीआधी मुंबईस्थित समुपदेशन फेरी घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी तसेच पालकवर्गातून जोर धरत आहे़मुंबईस्थित समुपदेशन फेरीची गरज - तिडकेआयुष मंत्रालयाने राज्यातील २६ महाविद्यालयांना शेवटच्या टप्प्यात म्हणजेच आॅक्टोबर महिल्यात मान्यता दिली़ त्यामुळे बहुतांश महाविद्यालयांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. या जागा संस्थास्तरावर भरण्याआधी संबंधित विभागाने मुंबईस्थित फेरीतून भरल्यास विद्यार्थ्यांना शासन सवलतींचा लाभ मिळेल, अशी माहिती गणेश तिडके यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

टॅग्स :NandedनांदेडMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टरCentral Governmentकेंद्र सरकार