शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय आता नागरिकांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST

यातून संभाव्य तिसरी लाट रोखली जाईल. त्याचवेळी पॉझिटिव्हीटी वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन करावे लागणार आहे. त्यामुळे आता नागरिकांनीच नियमावलींचे पालन ...

यातून संभाव्य तिसरी लाट रोखली जाईल. त्याचवेळी पॉझिटिव्हीटी वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन करावे लागणार आहे. त्यामुळे आता नागरिकांनीच नियमावलींचे पालन करून जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी नागरिकांच्या सहकाऱ्याने कोरोनाची दुसरी लाट रोखता आल्याचे डॉ. विपीन म्हणाले. परंतु, हीच परिस्थिती कायम ठेवण्यासाठी आगामी काळातही नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे. शहर व जिल्ह्यातील बाजारातील गर्दी पाहता अजूनही धोका कायम असल्याचेच स्पष्ट होत आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पॉझिटिव्हिटी वाढल्यास निर्बंधही पुन्हा लादावे लागणार आहेत.

जिल्ह्यात लसीकरणाचीही मोहीम वेग घेत आहे. आगामी काळात लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. त्यामुळे लसीकरणही वेगात होईल. ग्रामीण भागातील नागरिकांनी लसबाबत सुरू असलेल्या अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही केले. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत पोलिसांनी संयमी भूमिका घेतल्याचे सांगितले. हा निर्णय प्रशासनाचा होता, असे ते म्हणाले. कोरोनामुळे पोलीस दलातील ५५० कर्मचारी बाधित झाले होते. दुर्दैवाने नऊ जणांचा मृत्यूही झाल्याचे शेवाळे यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने चांगले परिश्रम घेतले. जिल्ह्यातील भोसी गावच्या कोरोनामुक्ती पॅटर्नची केंद्रानेही दखल घेतली. इतर गावांनीही चांगली कामगिरी बजावल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर, मनपा उपायुक्त शुभम क्यातमवार यांचीही उपस्थिती होती.

चौकट-------------

तिसऱ्या लाटेची तयारी

जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयारी केली जात आहे. यासाठी ग्रामीण भागातही टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. टास्क फोर्सच्या माध्यमातून उपचारांसाठी आवश्यक त्या वैद्यकीय साधनांची पूर्तता केली जात आहे. लहान मुलांना धोका असल्याचे सांगितले जात आहे. बालरोग तज्ज्ञांच्या मदतीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे डॉ. विपीन यांनी सांगितले.