शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

‘सीआरपीएफ’मुळेच देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:19 IST

कॅप्शन : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीआरपीएफ कॅम्प मुदखेड येथे १ काेटीव्या वृक्षाचे राेपण करताना साेबत जवानांना मार्गदर्शन करताना. ...

कॅप्शन : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीआरपीएफ कॅम्प मुदखेड येथे १ काेटीव्या वृक्षाचे राेपण करताना साेबत जवानांना मार्गदर्शन करताना.

नांदेड : देशातील एकूणच वातावरण पाहता केंद्रीय राखीव पाेलीस दलाच्या जवानांशिवाय अंतर्गत सुरक्षा मजबूत राहू शकत नाही, किंबहुना तशी कल्पनाही केली जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे सीआरपीएफ कॅम्पमध्ये आयाेजित ‘अखिल भारतीय वृक्षाराेपण अभियान-२०२१’ या कार्यक्रमात जवानांना मार्गदर्शन करताना बाेलत हाेते. सीआरपीएफच्या मुदखेड कॅम्पमध्ये अमित शहा यांच्या हस्ते एक कराेडव्या वृक्षाचे राेपण शुक्रवारी दुपारी करण्यात आले. यावेळी शहा म्हणाले, देशांतर्गत सुरक्षेचा काेणताही प्रश्न निर्माण झाला की, सर्वप्रथम आठवण येते ती सीआरपीएफ जवानांची. हे जवान काेणतेही आव्हान स्वीकारण्यास, बलिदान देण्यास कायम तत्पर असतात. ही कुणाला अतिशयाेक्ती वाटेल, परंतु सीआरपीएफ जवानांशिवाय देशाच्या अंतर्गत सुरक्षेची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. गेल्या सात वर्षांत सीआरपीएफच्या २ हजारपेक्षा अधिक जवानांनी प्राणांची आहुती दिली. त्यामुळेच आज देश सुरक्षित असल्याचे शहा यांनी सांगितले.

शहा म्हणाले, केंद्रीय सुरक्षा बलाने २ काेटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. दाेन वर्षांपासून हा कार्यक्रम राबवला जात आहे. यावर्षी ९९ लाख ९९ हजार ९९९ रोपांची लागवड करण्यात आली असून, १ काेटीव्या क्रमांकाचे रोप मी मुदखेड येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये लावताेय, ही माझ्या आनंदाची व गाैरवाची बाब आहे. १७ सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा वाढदिवस, निजामाच्या जुलमी शासनातून मराठवाडा व तेलंगणाची मुक्तता झाल्याचा सुवर्ण दिवस व गुरू गाेविंदसिघांची पावन भूमी. त्यामुळेच मी नांदेड जिल्ह्याची १ काेटीव्या वृक्ष लागवडीसाठी निवड केल्याचे शहा यांनी सांगितले. या कार्यक्रमाला नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर, सीआरपीएफचे महासंचालक कुलदीपसिंग हे प्रामुख्याने उपस्थित हाेते. यावेळी अमित शहा यांचा गुरूद्वाराचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

चाैकट....

शहिदांचे बलिदान देश विसरणार नाही

१७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन आहे. निजामांच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ, गाेविंदभाई श्राफ, दिगांबर पाटील आदींनी दिलेले बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही, असे सांगत सुरक्षा दलाकडून मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व शहिदांना अमित शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशाचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी हे ऑपरेशन यशस्वी करून देशाच्या स्वातंत्र्यानतर १३ महिन्यांनी मराठवाड्याला निजामांपासून मुक्तता मिळवून दिल्याचे स्मरणही अमित शहा यांनी यावेळी करून दिले.

चाैकट....

देश ५ ट्रिलियन डाॅलरच्या वाटेवर

अमित शहा यांनी सांगितले की, भारत देश ५ ट्रिलियन डाॅलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. त्यात सुरक्षा दलातील जवानांचे याेगदान तेवढेच माेठे आहे. त्यांच्याशिवाय ही वाटचाल शक्य नाही.