शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

‘सीआरपीएफ’मुळेच देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:19 IST

कॅप्शन : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीआरपीएफ कॅम्प मुदखेड येथे १ काेटीव्या वृक्षाचे राेपण करताना साेबत जवानांना मार्गदर्शन करताना. ...

कॅप्शन : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीआरपीएफ कॅम्प मुदखेड येथे १ काेटीव्या वृक्षाचे राेपण करताना साेबत जवानांना मार्गदर्शन करताना.

नांदेड : देशातील एकूणच वातावरण पाहता केंद्रीय राखीव पाेलीस दलाच्या जवानांशिवाय अंतर्गत सुरक्षा मजबूत राहू शकत नाही, किंबहुना तशी कल्पनाही केली जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे सीआरपीएफ कॅम्पमध्ये आयाेजित ‘अखिल भारतीय वृक्षाराेपण अभियान-२०२१’ या कार्यक्रमात जवानांना मार्गदर्शन करताना बाेलत हाेते. सीआरपीएफच्या मुदखेड कॅम्पमध्ये अमित शहा यांच्या हस्ते एक कराेडव्या वृक्षाचे राेपण शुक्रवारी दुपारी करण्यात आले. यावेळी शहा म्हणाले, देशांतर्गत सुरक्षेचा काेणताही प्रश्न निर्माण झाला की, सर्वप्रथम आठवण येते ती सीआरपीएफ जवानांची. हे जवान काेणतेही आव्हान स्वीकारण्यास, बलिदान देण्यास कायम तत्पर असतात. ही कुणाला अतिशयाेक्ती वाटेल, परंतु सीआरपीएफ जवानांशिवाय देशाच्या अंतर्गत सुरक्षेची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. गेल्या सात वर्षांत सीआरपीएफच्या २ हजारपेक्षा अधिक जवानांनी प्राणांची आहुती दिली. त्यामुळेच आज देश सुरक्षित असल्याचे शहा यांनी सांगितले.

शहा म्हणाले, केंद्रीय सुरक्षा बलाने २ काेटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. दाेन वर्षांपासून हा कार्यक्रम राबवला जात आहे. यावर्षी ९९ लाख ९९ हजार ९९९ रोपांची लागवड करण्यात आली असून, १ काेटीव्या क्रमांकाचे रोप मी मुदखेड येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये लावताेय, ही माझ्या आनंदाची व गाैरवाची बाब आहे. १७ सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा वाढदिवस, निजामाच्या जुलमी शासनातून मराठवाडा व तेलंगणाची मुक्तता झाल्याचा सुवर्ण दिवस व गुरू गाेविंदसिघांची पावन भूमी. त्यामुळेच मी नांदेड जिल्ह्याची १ काेटीव्या वृक्ष लागवडीसाठी निवड केल्याचे शहा यांनी सांगितले. या कार्यक्रमाला नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर, सीआरपीएफचे महासंचालक कुलदीपसिंग हे प्रामुख्याने उपस्थित हाेते. यावेळी अमित शहा यांचा गुरूद्वाराचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

चाैकट....

शहिदांचे बलिदान देश विसरणार नाही

१७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन आहे. निजामांच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ, गाेविंदभाई श्राफ, दिगांबर पाटील आदींनी दिलेले बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही, असे सांगत सुरक्षा दलाकडून मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व शहिदांना अमित शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशाचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी हे ऑपरेशन यशस्वी करून देशाच्या स्वातंत्र्यानतर १३ महिन्यांनी मराठवाड्याला निजामांपासून मुक्तता मिळवून दिल्याचे स्मरणही अमित शहा यांनी यावेळी करून दिले.

चाैकट....

देश ५ ट्रिलियन डाॅलरच्या वाटेवर

अमित शहा यांनी सांगितले की, भारत देश ५ ट्रिलियन डाॅलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. त्यात सुरक्षा दलातील जवानांचे याेगदान तेवढेच माेठे आहे. त्यांच्याशिवाय ही वाटचाल शक्य नाही.