शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

किनवट तालुक्यात आदिवासी घरकुलाचे साडेसहा कोटी परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 20:02 IST

वाड्या-तांड्यावर झोपड्यामध्ये राहणार्‍या आदिवासींना शासनाने घरकुले मंजूर केली होती. मात्र केवळ योजनेच्या प्रसिद्धीअभावी लाभार्थ्यांचे अर्ज आले नाहीत.

ठळक मुद्दे शासनाच्या आदिम विकास विभागाकडून घरकुल योजना राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून आदिवासींना पक्के घर देण्यात येते. त्यानुसार एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय, किनवट यांनी २०१४-२०१५ ते २०१६-१७ या तीन वर्षांसाठी ६५५ घरकुलांना मंजुरी दिली होती.

- गोकुळ भवरे

किनवट (नांदेड ) : शासकीय योजना गरजूपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांपासून जिल्हाधिकार्‍यां पर्यंत सर्वच जण करतात. मात्र त्यानंतरही शासनाच्या अनेक चांगल्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. वाड्या-तांड्यावर झोपड्यामध्ये राहणार्‍या आदिवासींना शासनाने घरकुले मंजूर केली होती. मात्र केवळ योजनेच्या प्रसिद्धीअभावी लाभार्थ्यांचे अर्ज आले नाहीत. पर्यायाने आदिवासीसाठी आलेला ६ कोटी ६३ लाखांचा निधी परत गेला आहे.

किनवट तालुक्यात आदिम कोलाम जमात मोठ्या प्रमाणात आहे. हा समाज जंगलाच्या सानिध्यात राहत असून जंगलातील मोहफुल, तेंदूपत्ता, डिंक, चारटेंबूर व अन्य रानमेवा जमा करुन त्यावर आपला उदरनिर्वाह चालवितात. याबरोबरच जंगलातील बांबूपासून टोपली, दुरडी, टेवली, डाले, शेनोडे, ताटवा इ. वस्तू तयार करुन त्यावर कुटुंबाचा गाडा चालवितात. यातील बहुतांशजणांचा गवताच्या झोपडीचा निवारा आहे. त्यातच लेकरा-बाळांसह कुटुंबिय राहतात. या जमातीसाठी शासनाच्या आदिम विकास विभागाकडून घरकुल योजना राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून आदिवासींना पक्के घर देण्यात येते. 

त्यानुसार एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय, किनवट यांनी २०१४-२०१५ ते २०१६-१७ या तीन वर्षांसाठी ६५५ घरकुलांना मंजुरी दिली होती. या घरकुलाची किंमत १ लाख ३२ हजार रुपये आहे. यातील एक लाख २० हजारांची रक्कम आदिवासी विभागातर्फे दिली जाते तर उर्वरित रक्कम महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेतून देण्यात येते. २०१६-१७ या वर्षात या घरकुलाची किंमत १ लाख ४९ हजार एवढी करण्यात येऊन किनवट तालुक्यात ६५५ घरकुलांसाठी ७ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र त्यातील १ कोटी २२ लाख ४० हजार रुपये खर्चत अवघी १०२ घरकुले पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले. अत्यल्प लाभार्थी आणि प्राप्त झालेल्या अर्जातील कागदपत्रांची पूर्तता अनेकजण करु न शकल्याने घरकुलांसाठी आलेला तब्बल ६ कोटी ६३ लाख ६० हजार रुपयांचा निधी परत गेला आहे. 

या योजनेचा तीन वर्षांचा आढावा घेतला असता, २०१४-१५ मध्ये २५० घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती़ त्यातील ३४ घरकुले पूर्ण झाली़ २०१५-१६ मध्ये १५५ घरकुलांना मंजुरी मिळाली़ मात्र अवघी २९ घरकुले पूर्ण करण्यात प्रशासन यशस्वी ठरले़ तीच परिस्थिती २०१६-१७ मध्ये राहिली़ मंजरी मिळालेल्या २५० पैकी प्रशासनाला अवघी ३९ घरकुले पूर्ण करण्यात यश आले आहे. पाड्यावरील हजारो आदिवासी उघड्यावर राहत असताना, आलेला निधी परत गेल्याने संताप व्यक्त होत आहे़ 

शासनाचा पुढाकार प्रशासन अपयशीवाडी-तांड्यावरील आदिवासींना पक्के घर देणार्‍या या योजनेसाठी शासनाकडून मोठा निधी मंजूर झाल्यानंतरही त्याचा विनियोग करण्यात प्रशासनाला अपयश आले. कोलाम आदिवासी जमातीत आजही अशिक्षितांचे प्रमाण मोठे आहे. यामुळे अनेकांना शासकीय कागदपत्रांची पूर्तता करता आली नाही. कोणाकडे जात प्रमाणपत्र नाही तर कोणाच्या नावाची नमुना नं. ८ ला नोंद नाही. या व अशा इतर कारणांमुळे बहुतांश जणांना गरज असतानाही या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. आदिवासी कोलाम समाजाची स्थिती पाहता प्रशासनाने अगोदर घरोघर जावून खातरजमा करुन प्रमाणपत्रे वितरित करावीत, अशी मागणी होत आहे.

अर्जच प्राप्त झाले नाहीतआदिम कोलाम जमातींच्या घरकुलांसाठी लाभार्थ्यांकडून अर्जच प्राप्त झाले नाहीत. यासाठी पुढाकार घेवूनही लाभार्थी उपलब्ध न झाल्याने पूर्ण निधी खर्च झाला नाही. आता या योजनेचा १७३ लक्षांक वाढवून मागितला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना घरकुले देण्यात येतील.- सुनील बारसे, सहायक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास

टॅग्स :Nandedनांदेड