शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पीकविमा कंपन्या मालामाल, ६१३ कोटी भरले, मिळणार ९८ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:18 IST

नांदेड जिल्ह्यातील नऊ लाख ५५ हजार ८०० शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता. २०२० खरिपामध्ये व बहुतेक ...

नांदेड जिल्ह्यातील नऊ लाख ५५ हजार ८०० शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता. २०२० खरिपामध्ये व बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर या पिकांना संरक्षण घेतले; परंतु खरिपामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत व काढणीपश्चात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सामुदायिक पंचनामे करण्याची शेतकऱ्यांच्या वतीने मागणी केली गेली होती. तसेच कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व विमा कंपनीकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग व तांत्रिक कर्मचारी यांमुळे ही रास्त मागणी शेतकऱ्यांनी केली होती; परंतु जिल्हा प्रशासनाने ती नाकारली व वैयक्तिक पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा यासाठी वापर केला गेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये काढणीपश्चात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे; परंतु ती नाकारून नांदेड जिल्ह्याला केवळ नुकसान भरपाईपोटी १३४ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील जवळपास साडेनऊ लाख शेतकऱ्यांनी ४४ कोटी ६८ लाख रुपये विमा हप्ता भरला आहे. त्यापोटी राज्य सरकारने २८४ कोटी ४३ लाख ८३००० व केंद्र सरकारने तेवढेच म्हणजे २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार अनुदानापोटी हप्ता भरला आहे, असा एकूण ६१३ कोटी विमा हप्ता भरला आहे. त्यात शेतकरी एका हेक्टरला ९०० रुपये विमा हप्ता भरतो व त्याला कव्हर ४५ हजार रुपयांचे असते. नांदेड जिल्ह्यातील एकूण विमाधारकांपैकी ९० टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन हे पीक फिरल्यामुळे ९० टक्के लोकांनी सोयाबीनचा विमा काढलेला आहे. या एका हेक्‍टरसाठी केंद्र सरकार सहा हजार तीनशे रुपये व राज्य सरकार सहा हजार तीनशे रुपये, असे अंदाजे जवळपास १२ हजार ६०० रुपये देते. परंतु, पीक विमा कंपनी शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही त्यांना योग्य परतावा करीत नाही.

नांदेड जिल्ह्यातील आपत्ती व काढणीपश्‍चात पाऊस या कारणास्तव ८२ हजार शेतकऱ्यांना ७५ कोटी ८४ लाख रुपये विमा मिळाला. तसेच ३९ हजार शेतकऱ्यांना २२ कोटी रुपये विमा मिळाला आहे, असे एकूण नांदेड जिल्ह्यातील एक लाख २१ हजार ६०२ शेतकऱ्यांना आतापर्यंत ९७ कोटी ९१ लाख एवढी नुकसान भरपाईपोटी विम्याची रक्कम मिळालेली आहे.