शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:13 IST

जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे ७ लाख ४२ हजार ८६१ इतके आहे. त्यापैकी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ६ लाख ५४ ...

जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे ७ लाख ४२ हजार ८६१ इतके आहे. त्यापैकी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ६ लाख ५४ हजार १३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. देगलूर तालुक्यात १०१.२७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. हिमायतनगर तालुक्यात ९९.११, माहृर ९५.७८, लोहा ९७.६२, नांदेड- ८२.२७, अर्धापूर ९४.९४, मुदखेड- ९६.९३, कंधार- ९९.९४, मुखेड ७७.१०, नायगाव ७०.२६, बिलोली ७१.४४, धर्माबाद ९२.८६, किनवट ८८.२२, हदगाव ९२.८९, भोकर ८६.९२ आणि उमरी तालुक्यात ७८.२२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी ही सोयाबीन या नगदी पिकाची झाली आहे. खरीप हंगामात सोयाबीनचे ३ लाख ९ हजार ७७५ हेक्टर क्षेत्र अपेक्षित असताना ३ लाख ६८ हजार ३४ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ११८.९६ टक्के सोयाबीनची पेरणी केली आहे. तूर पिकाचा पेराही चांगला झाला आहे. ९१.४१ टक्के पेरणी पूर पिकाची झाली आहे. ज्वारी पीक १८ हजार ८५५, मूग १८ हजार ७१२, उडीद १९ हजार २८७ आणि १ लाख ७२ हजार २७३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाअभावी पिके माना टाकू लागली होती. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. अनेक भागात शेतकरी पिके जगवण्यासाठी प्रयत्न करीत होते. बुधवारी दुपारी काही भागात चांगला पाऊस झाला. संध्याकाळी मात्र जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने चांगली हजेरी लावली. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत यात सर्वाधिक पाऊस भोकर तालुक्यात झाला आहे. येथे ५९.० मिमी. पावसाची नोंद झाली. किनवट तालुक्यात ५७.६०, उमरी ५६.३, नायगाव ५२.४, नांदेड २३.५, बिलोली ४२.३, मुखेड २७.९, कंधार २०.३, लोहा २३.५, हदगाव ३८.८, देगलूर ३३.६, मुदखेड ३६.६, हिमायतनगर २८, माहूर २१.४, धर्माबाद ४५ मिमी. आणि अर्धापूर तालुक्यात २६.६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ३६.२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. जूनमध्ये १४४.९ मिमी. पाऊस अपेक्षित असताना २२५.१ मिमी. तर जुलैमध्ये ७६ मिमी. पाऊस अपेक्षित असताना ४७.९ मिमी. पाऊस झाला आहे. जुलैमध्ये पावसाने ताण दिल्याने शेतकरी चिंतीत झाला होता. मात्र बुधवारी चांगला पाऊस झाल्याने आता शेतकरी सुखावला आहे. त्याचवेळी जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटही उद्‌भवले होते ते आता दूर झाले आहे. उर्वरित १२ टक्के पेरण्याही या पावसाने पूर्ण होतील, असे जिल्हा कृषी अधीक्षक आर.बी. चलवदे यांनी सांगितले.नांदेड- जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या चांगल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून जिल्ह्यात ८८ टक्के पेरण्या झाल्या असून उर्वरित पेरण्याही दोन दिवसात पूर्ण होतील, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. त्याचवेळी या पावसाने पेरणी झालेली पिकेही बहरली आहे.

जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे ७ लाख ४२ हजार ८६१ इतके आहे. त्यापैकी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ६ लाख ५४ हजार १३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. देगलूर तालुक्यात १०१.२७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. हिमायतनगर तालुक्यात ९९.११, माहृर ९५.७८, लोहा ९७.६२, नांदेड- ८२.२७, अर्धापूर ९४.९४, मुदखेड- ९६.९३, कंधार- ९९.९४, मुखेड ७७.१०, नायगाव ७०.२६, बिलोली ७१.४४, धर्माबाद ९२.८६, किनवट ८८.२२, हदगाव ९२.८९, भोकर ८६.९२ आणि उमरी तालुक्यात ७८.२२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी ही सोयाबीन या नगदी पिकाची झाली आहे. खरीप हंगामात सोयाबीनचे ३ लाख ९ हजार ७७५ हेक्टर क्षेत्र अपेक्षित असताना ३ लाख ६८ हजार ३४ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ११८.९६ टक्के सोयाबीनची पेरणी केली आहे. तूर पिकाचा पेराही चांगला झाला आहे. ९१.४१ टक्के पेरणी पूर पिकाची झाली आहे. ज्वारी पीक १८ हजार ८५५, मूग १८ हजार ७१२, उडीद १९ हजार २८७ आणि १ लाख ७२ हजार २७३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाअभावी पिके माना टाकू लागली होती. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. अनेक भागात शेतकरी पिके जगवण्यासाठी प्रयत्न करीत होते. बुधवारी दुपारी काही भागात चांगला पाऊस झाला. संध्याकाळी मात्र जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने चांगली हजेरी लावली. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत यात सर्वाधिक पाऊस भोकर तालुक्यात झाला आहे. येथे ५९.० मिमी. पावसाची नोंद झाली. किनवट तालुक्यात ५७.६०, उमरी ५६.३, नायगाव ५२.४, नांदेड २३.५, बिलोली ४२.३, मुखेड २७.९, कंधार २०.३, लोहा २३.५, हदगाव ३८.८, देगलूर ३३.६, मुदखेड ३६.६, हिमायतनगर २८, माहूर २१.४, धर्माबाद ४५ मिमी. आणि अर्धापूर तालुक्यात २६.६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ३६.२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. जूनमध्ये १४४.९ मिमी. पाऊस अपेक्षित असताना २२५.१ मिमी. तर जुलैमध्ये ७६ मिमी. पाऊस अपेक्षित असताना ४७.९ मिमी. पाऊस झाला आहे. जुलैमध्ये पावसाने ताण दिल्याने शेतकरी चिंतीत झाला होता. मात्र बुधवारी चांगला पाऊस झाल्याने आता शेतकरी सुखावला आहे. त्याचवेळी जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटही उद्‌भवले होते ते आता दूर झाले आहे. उर्वरित १२ टक्के पेरण्याही या पावसाने पूर्ण होतील, असे जिल्हा कृषी अधीक्षक आर.बी. चलवदे यांनी सांगितले.