शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
3
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
4
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
5
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
6
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
7
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
8
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
9
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
10
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
12
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
13
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
14
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
15
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
16
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
17
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
18
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
19
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
20
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:13 IST

जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे ७ लाख ४२ हजार ८६१ इतके आहे. त्यापैकी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ६ लाख ५४ ...

जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे ७ लाख ४२ हजार ८६१ इतके आहे. त्यापैकी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ६ लाख ५४ हजार १३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. देगलूर तालुक्यात १०१.२७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. हिमायतनगर तालुक्यात ९९.११, माहृर ९५.७८, लोहा ९७.६२, नांदेड- ८२.२७, अर्धापूर ९४.९४, मुदखेड- ९६.९३, कंधार- ९९.९४, मुखेड ७७.१०, नायगाव ७०.२६, बिलोली ७१.४४, धर्माबाद ९२.८६, किनवट ८८.२२, हदगाव ९२.८९, भोकर ८६.९२ आणि उमरी तालुक्यात ७८.२२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी ही सोयाबीन या नगदी पिकाची झाली आहे. खरीप हंगामात सोयाबीनचे ३ लाख ९ हजार ७७५ हेक्टर क्षेत्र अपेक्षित असताना ३ लाख ६८ हजार ३४ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ११८.९६ टक्के सोयाबीनची पेरणी केली आहे. तूर पिकाचा पेराही चांगला झाला आहे. ९१.४१ टक्के पेरणी पूर पिकाची झाली आहे. ज्वारी पीक १८ हजार ८५५, मूग १८ हजार ७१२, उडीद १९ हजार २८७ आणि १ लाख ७२ हजार २७३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाअभावी पिके माना टाकू लागली होती. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. अनेक भागात शेतकरी पिके जगवण्यासाठी प्रयत्न करीत होते. बुधवारी दुपारी काही भागात चांगला पाऊस झाला. संध्याकाळी मात्र जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने चांगली हजेरी लावली. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत यात सर्वाधिक पाऊस भोकर तालुक्यात झाला आहे. येथे ५९.० मिमी. पावसाची नोंद झाली. किनवट तालुक्यात ५७.६०, उमरी ५६.३, नायगाव ५२.४, नांदेड २३.५, बिलोली ४२.३, मुखेड २७.९, कंधार २०.३, लोहा २३.५, हदगाव ३८.८, देगलूर ३३.६, मुदखेड ३६.६, हिमायतनगर २८, माहूर २१.४, धर्माबाद ४५ मिमी. आणि अर्धापूर तालुक्यात २६.६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ३६.२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. जूनमध्ये १४४.९ मिमी. पाऊस अपेक्षित असताना २२५.१ मिमी. तर जुलैमध्ये ७६ मिमी. पाऊस अपेक्षित असताना ४७.९ मिमी. पाऊस झाला आहे. जुलैमध्ये पावसाने ताण दिल्याने शेतकरी चिंतीत झाला होता. मात्र बुधवारी चांगला पाऊस झाल्याने आता शेतकरी सुखावला आहे. त्याचवेळी जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटही उद्‌भवले होते ते आता दूर झाले आहे. उर्वरित १२ टक्के पेरण्याही या पावसाने पूर्ण होतील, असे जिल्हा कृषी अधीक्षक आर.बी. चलवदे यांनी सांगितले.नांदेड- जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या चांगल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून जिल्ह्यात ८८ टक्के पेरण्या झाल्या असून उर्वरित पेरण्याही दोन दिवसात पूर्ण होतील, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. त्याचवेळी या पावसाने पेरणी झालेली पिकेही बहरली आहे.

जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे ७ लाख ४२ हजार ८६१ इतके आहे. त्यापैकी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ६ लाख ५४ हजार १३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. देगलूर तालुक्यात १०१.२७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. हिमायतनगर तालुक्यात ९९.११, माहृर ९५.७८, लोहा ९७.६२, नांदेड- ८२.२७, अर्धापूर ९४.९४, मुदखेड- ९६.९३, कंधार- ९९.९४, मुखेड ७७.१०, नायगाव ७०.२६, बिलोली ७१.४४, धर्माबाद ९२.८६, किनवट ८८.२२, हदगाव ९२.८९, भोकर ८६.९२ आणि उमरी तालुक्यात ७८.२२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी ही सोयाबीन या नगदी पिकाची झाली आहे. खरीप हंगामात सोयाबीनचे ३ लाख ९ हजार ७७५ हेक्टर क्षेत्र अपेक्षित असताना ३ लाख ६८ हजार ३४ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ११८.९६ टक्के सोयाबीनची पेरणी केली आहे. तूर पिकाचा पेराही चांगला झाला आहे. ९१.४१ टक्के पेरणी पूर पिकाची झाली आहे. ज्वारी पीक १८ हजार ८५५, मूग १८ हजार ७१२, उडीद १९ हजार २८७ आणि १ लाख ७२ हजार २७३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाअभावी पिके माना टाकू लागली होती. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. अनेक भागात शेतकरी पिके जगवण्यासाठी प्रयत्न करीत होते. बुधवारी दुपारी काही भागात चांगला पाऊस झाला. संध्याकाळी मात्र जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने चांगली हजेरी लावली. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत यात सर्वाधिक पाऊस भोकर तालुक्यात झाला आहे. येथे ५९.० मिमी. पावसाची नोंद झाली. किनवट तालुक्यात ५७.६०, उमरी ५६.३, नायगाव ५२.४, नांदेड २३.५, बिलोली ४२.३, मुखेड २७.९, कंधार २०.३, लोहा २३.५, हदगाव ३८.८, देगलूर ३३.६, मुदखेड ३६.६, हिमायतनगर २८, माहूर २१.४, धर्माबाद ४५ मिमी. आणि अर्धापूर तालुक्यात २६.६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ३६.२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. जूनमध्ये १४४.९ मिमी. पाऊस अपेक्षित असताना २२५.१ मिमी. तर जुलैमध्ये ७६ मिमी. पाऊस अपेक्षित असताना ४७.९ मिमी. पाऊस झाला आहे. जुलैमध्ये पावसाने ताण दिल्याने शेतकरी चिंतीत झाला होता. मात्र बुधवारी चांगला पाऊस झाल्याने आता शेतकरी सुखावला आहे. त्याचवेळी जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटही उद्‌भवले होते ते आता दूर झाले आहे. उर्वरित १२ टक्के पेरण्याही या पावसाने पूर्ण होतील, असे जिल्हा कृषी अधीक्षक आर.बी. चलवदे यांनी सांगितले.