शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

नववधूचा श्रृंगार करून करिश्मावर झाले अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:54 IST

येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात राहणा-या करिश्मा नरवाडे हिने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली़ तिच्या अंतिम इच्छेनुसार नववधूचा श्रृंगार करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात राहणा-या करिश्मा नरवाडे हिने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली़ तिच्या अंतिम इच्छेनुसार नववधूचा श्रृंगार करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़करिश्माची आत्महत्या सर्वांनाच हुरहुर लावून गेली़ तिला दहावीमध्ये ८६ टक्के गुण होते़ ती १२ वीत विज्ञान शाखेत होती़ २६ जानेवारी रोजी ती गावाकडे गेली़ रविवारी फोनवर तिच्या आईशी बोलली़ यावेळी तिने नांदेडला येवून आईला भेटण्याची इच्छा व्यक्त केली़ मात्र परीक्षा जवळ आली, फिरू नकोस़ पुढच्या रविवारी नांदेडला ये असे तिच्या आईने सांगितल्याने ती काहीशी नाराज झाली़सोमवारी ती वहीमध्ये काहीतरी लिहित होती़ यावेळी तिच्या मैत्रिणीने काय लिहितेस असे विचारले़ मात्र करिश्माने मैत्रिणीच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही़ काही नाही असेच लिहितेय म्हणून तिने मैत्रिणीचा प्रश्न टाळला़ त्यानंतर रविवारी तिने या जगाचा निरोप घेतला़ सोमवारी उत्तरीय तपासणी केल्यानंतर दुपारी १२ वाजता तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला़त्यानंतर मरडगा येथे तिच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले़ तत्पूर्वी नवरीसारखे नटवून माझा अंत्यविधी करावी ही तिची शेवटची इच्छा होती़ त्याप्रमाणे कुटुंबियांनी तिची अंतिम इच्छा पूर्ण केली़ नववधूप्रमाणे तिला लग्नाची लाल साडी, चुनरी नेसविण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते़ जो-तो करिश्माच्या अशा अचानक जाण्यामुळे हळहळ व्यक्त करीत होता़मृत्यूपूर्वी करिश्माने आठ पानांची चिठ्ठी लिहून ठेवली होती़ या चिठ्ठीतील मजकूर वाचून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले़ करिश्माने लिहिलेल्या चिठ्ठीतील अक्षर वळणदार होते़ तिची समज बघून अधिकारीही थक्क झाले़ तिला आई भेटली असती तर कदाचित ती आज जिवंत राहिली असती़करिअरची काळजी करू नको, विज्ञान शाखा सोड व कलेमध्ये चांगले गुण मिळव असा सल्ला देवून कोणी मार्ग दाखवला असता तरीही करिश्मा जिवंत राहिली असती, असेही बोलले जात आहे़दहा वर्षांपासून आईची भेट नाही़!मला दहा वर्षांपासून आई भेटली नाही़ मी कालही तिला फोन करून हॉस्टेलला बोलावले; पण तिने येण्यास नकार दिला़ त्यामुळे माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही़ दारूमुळे बाबा दगावले व आईने आम्ही तीन मुली असतानाही दोनच मुली आहेत असे सांगून मला नाकारले़ मला यावर्षी कमी मार्क्स पडतात, पुढील शिक्षणाचा खर्च कोण करणार, मला मार्क कमी पडले की माझे लग्नच करून देणार, त्यामुळे माझ्या करिअरचे काय? बाबाकडील नातेवाईक आईच्या विरूद्ध होते, तर मी आजी, आत्या, काकांना जीव लावते म्हणून आई माझ्या विरोधात होती़ माझे करिअर मनासारखे घडत नाही म्हणून मेलेलेच बरे़ काकांनी माझ्या अंत्यविधीनंतर दारू सोडून द्यावी़