शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
2
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
3
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
4
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
5
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
6
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
7
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
8
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
9
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
10
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
11
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
12
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
13
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
14
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
15
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
16
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या नियमांमुळे अपंग साध्वीचे जीवन जगणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:43 IST

कोरोनाचा अपाय रोखण्यासाठी शासनाने १७ मार्च २०१९ ते दिवाळीच्या पाडव्यापर्यंत मंदिरे बंद केल्यामुळे आर्थिक नियोजन पूर्णतः ढासळल्यामुळे ...

कोरोनाचा अपाय रोखण्यासाठी शासनाने १७ मार्च २०१९ ते दिवाळीच्या पाडव्यापर्यंत मंदिरे बंद केल्यामुळे आर्थिक नियोजन पूर्णतः ढासळल्यामुळे मंदिर व्यवस्थापन, पुजारी, व्यापारी, भिकारी आदी मंडळी हवालदिल झाली आहेत. सध्या मंदिरे उघडी असली तरी ६५ वर्षांवरील वृध्द तसेच दहा वर्षांखालील बालकांच्या मंदिर प्रवेशावर शासनाने निर्बंध घातल्याने साधाई अंबेकर (वय ७५) व जनकाईसा अंबेकर (वय ७२) यांना ऐन हिवाळ्यातच उघड्यावर दिवस-रात्र काढावी लागत आहे.

या साध्वी भगिनी सन १९८८ पासून ईश्वर चिंतन व सेवा करण्यासाठी देवदेवेश्वर मंदिरात वास्तव्यास आहेत. ७ ऑक्टोबर १९९४ रोजी त्यांच्या पतीचे निधनही येथेच झाले. ईश्वर भक्तीसाठी देहभान हरपलेल्या या भगिनींनी २०११ साली जाळीचा देव (जि. जालना) येथे गुरु प. पु. कै. केशराजबाबा अंबेकर यांच्या हस्ते महानुभाव पंथाची दीक्षा (संन्यास) घेतली. सहा वर्षांपूर्वी साधाईना आलेले अपंगत्व, पोटी मूल-बाळ नाही, डोक्यावर छत नाही, मदतीला कुणीही नाही. अशा विपरीत परिस्थितीतही त्या ईश्वराचे स्मरण व सेवा करण्यासाठी आपला संपूर्ण वेळ देत असल्याने त्यांच्या अपार श्रध्देचे जेवढे गोडवे गावे तेवढे कमीच आहेत.

भगवान दत्तप्रभू, आई रेणुका माता व माता अनुसयाच्या वास्तव्याने पुनित झालेल्या श्रीक्षेत्र माहूरगडला दर्शन घेऊन परत जाणाऱ्या हजारो भाविकांसाठी शासन, प्रशासन व मंदिर व्यवस्थापन समितीने बऱ्यापैकी व्यवस्था केली आहे. मात्र, या जगात ज्याचे कुणीही नाही, अशा परावलंबी भक्तांसाठी कुठलीही व्यवस्था केली नसल्याची बाब या पुण्य भूमीच्या गौरवाला छेद देणारीच आहे.

️माझे पूर्वीचे नाव सुमनबाई रामदास पाटील व माझ्या बहिणीचे नाव जनाबाई रामदास पाटील असे आहे. पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे) हे आमचे मु़ळगाव होय. आमचेकडे असलेले ९ एकर शेत भावाला, तर आरा मशीन व ३ एकर मोकळी जागा पुतण्या रमेश गंगाधर पाटील यांना दिली आहे. सध्या माहूरमध्ये प्रगती पथावर असलेल्या भोजंती मंदिराच्या बांधकामासाठीही आम्ही २ लाख रुपयांची देणगी दिली आहे. आम्हाला आर्थिक चणचण नसली तरी एवढ्या बिकट परिस्थितीत देखभाल करण्यासाठी कुणीही नसल्याने आमची पावलोपावली फजिती होत आहे, शिवाय मंदिरातच जाता येत नसल्याची बाब आमच्या श्रध्देवर घाला घालणारी असून, त्याचेच अति दुःख असल्याचे साधाईने रडत रडतच सांगितले.

श्रीदेवदेवेश्वर मंदिरात अनेक व्याधीग्रस्त भाविक मागील पन्नास वर्षांपूर्वीपासून आश्रयास आहेत. निवाऱ्याची वेगळी व्यवस्था नसल्याने त्यांना उघड्यावरच जीवन कंठावे लागत आहे. भविष्यात कोरोनासारखी परिस्थिती उद्भवल्यास त्यांचे जगणे अधिकच कठीण होणार आहे. त्याचे वास्तव जाणून शासनाने येथे शासकीय निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण विद्वांस यांनी केली आहे.