शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus In Nanded : उमरीत कोरोनाचा संशयित आढळला; होम क्वारंटाईन नागरिकांवर नाही कोणाचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 20:56 IST

21 मार्चपासून परतलेल्या तरुणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

ठळक मुद्देपर गावातून परतलेले होम कॉरंटाईन बाहेर फिरताना आढळले

उमरी  : तालुक्यातील अब्दुल्लापुरवाडी येथे  कोरोना साथ रोगाचा एक  संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीच्या काळात तालुक्यात याबाबत काळजी घेतली जात होती  मात्र आता  या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता दिसून येत आहे.       आज ३० मार्च रोजी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास तीस वर्षे वयाचा एक तरुण  संशयित रुग्ण उमरीच्या  ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला.  वैद्यकीय अधीक्षक डॉ शंकर चव्हाण यांनी त्यास तपासले असता , कोरोना साथरोगाच्या संदर्भातील सर्व  लक्षणे त्याला दिसून आली.   तसेच हा रुग्ण गेल्या २१  मार्च रोजी पुणे येथून त्याची सासुरवाडी असलेल्या  अब्दुल्लापुरवाडी येथे आलेला आहे.  मध्यंतरीच्या कालावधीत तो कुठे गेला ?  कुणाकुणाशी त्याची भेट झाली ?  कोणत्या कार्यक्रमात सामील झाला ?  याची माहिती यंत्रणेमार्फत आता  घेण्यात येत आहे . मात्र तब्बल बारा दिवस त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते हे विशेष होय .

याच गावात पुणे येथून ५०  ते ६० नागरिक आलेले आहेत. या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन देवराये यांनी दिली.  याबाबत तालुक्यात काम करणाऱ्या इतर खात्याच्या   प्रशासकीय यंत्रणेची   कमालीची उदासीनता दिसून येत आहे .  सध्या उमरी तालुक्यात कोरोना साथरोगा विषयी सतर्कता बाळगली जाते .    तसेच बाहेरून आलेल्या नागरिकांची नोंदणी केली जाते.  ही कामे आशा वर्कर ,  अंगणवाडी कर्मचारी , आरोग्य विभागाचे कर्मचारी  आदींकडे  सोपविण्यात आली .  तलाठी , ग्रामसेवक ही  कामे  करीत असल्याचे सांगण्यात येत असले तरीही  मोजकेच तलाठी व  ग्रामसेवक या कामामध्ये दिसून येतात.  कारण अंगणवाडी कर्मचारी व आशा वर्कर यांना गावात योग्य माहिती दिली जात नाही.

या महिला कर्मचारी गावातील रहिवासी  असल्याने त्यांच्यावर काही मर्यादा येतात. होम क्वारंटाईन  असलेल्या एवढ्या लोकांना बाहेर फिरण्यासाठी त्या मज्जाव करू शकत नाहीत.   मात्र तलाठी व ग्रामसेवक या कर्मचाऱ्यांनी  याबाबत अधिक लक्ष देऊन  काम करण्याची गरज आहे.   त्यामध्ये बऱ्याच अंशी ते कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. उमरी तालुक्यात एकूण तीन मंडळ असून १९  सज्जा आहेत.  यात काम करण्यासाठी तलाठी पदाची १९  मंजूर पदे असली तरी फक्त १४  तलाठी कार्यरत आहेत. यातील बहुतांशी कर्मचारी हे नांदेड येथून अपडाऊन करतात.  सहा गावांच्या सज्जावर एक तलाठी काम करीत असून काही तलाठ्यांना सहा पेक्षाही अधिक गावे देण्यात आलेली आहेत.  म्हणून ते या गावावर एकाच वेळी लक्ष ठेवू शकत नाहीत . तसेच तालुक्यात ग्रामसेवकांची ४३  मंजूर पदे असून ४१  ग्रामसेवक कार्यरत आहेत.  दोन पदे रिक्त आहेत . असे असले तरीही तालुक्यातील बहुतांशी मोठ्या लोकवस्तीच्या गावातील ग्रामसेवक तसेच तलाठी गावाकडे फिरकतही नाहीत .  असे चित्र दिसून येत आहे. 

म्हणूनच मुंबई , पुणे,  नागपूर,  हैदराबाद ,  यवतमाळ येथून उमरी तालुक्यात आलेले अनेक नागरिक  होम क्वारंटाईन  असले तरी  वारंवार सूचना देऊनही ते घरामध्ये थांबत नाहीत . उमरीमध्ये असाच प्रकार  चालू असल्याने शेवटी  त्या  होम क्वारंटाईन  नागरिकांना नगरपालिकेतर्फे नोटिसा देऊन घरी बसवावे लागले.  यावरून वादविवादही झाले. शहरात ही अवस्था आहे तर खेडेगावातील परिस्थितीची कल्पनाच न केलेली बरी.   यातील अनेकजण गावामध्ये रिकामटेकडे फिरत आहेत  .  गप्पागोष्टी करण्यासाठी मित्रमंडळींमध्ये बसत आहेत.   याबाबतची माहिती वरिष्ठांकडे पोचविणे तसेच अशा प्रकारच्या नागरिकांना सूचना देणे ही बाब गावातीलच रहिवासी असलेल्या अंगणवाडी,  आशा वर्कर या कर्मचाऱ्यांना  अशक्‍य होत असल्याचे दिसून येत आहे.  मात्र नेमके याकडेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असताना दिसून येते आहे.

करोना सारख्या महाभयंकर साथीमुळे संपूर्ण जग हादरून गेलेले आहे आणि अगदी आपल्या गावात ,  गल्लीतच कोरोना सारख्या साथरोगाच्या  बाधित शहरातून अनेक नागरिक आलेले आहेत . म्हणून त्यांची अजून १४  एप्रिल पर्यंत गांभीर्यपूर्वक काळजी घेणे व त्यांच्यावर देखरेख ठेवणे गरजेचे झाले आहे . मात्र आता अन्नदान करणे , मास्क , सॅनिटायझर आदी  वस्तूंचे वाटप करणे अशा सवंग लोकप्रियतेच्या नावाखाली फोटोसेशन सुरू झाले आहे.  यावेळी  सोशल डिस्टन्सींगचा  फज्जा उडत असल्याचे विदारक चित्र   दिसून येत आहे .

विशेष म्हणजे अशाप्रकारच्या  प्रसिद्धीसाठी हपापलेले  काही कार्यकर्ते  व गावपुढारी , अधिकारी वर्गालाही यात सामावून घेऊन  आपला कार्यभार उरकण्याचा केविलवाणा  प्रयत्न करताना दिसत आहेत.  मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याला बळी न पडता  कठोर  भूमिका घेऊन  लॉकडाऊनची   काटेकोरपणे  अंमलबजावणी करावी अशी अनेक नागरिकातून मागणी होत आहे. 

तलाठी आपल्या सज्जावर सकाळी लवकरच दुचाकीवरून जातात व आवश्यक ती माहिती संकलित करतात.   सायंकाळी ते लवकरच परत घरी जातात.  गावामध्ये राहण्यासाठी त्यांच्याकडे कुठलीच व्यवस्था नाही. - माधव बोथीकर,तहसीलदार,उमरी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड