शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

कोरोना मयताच्या कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:14 IST

जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत १ हजार ९०४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात अनेक कुटुंबातील कमावती व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे ...

जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत १ हजार ९०४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात अनेक कुटुंबातील कमावती व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे अशा कुटुंबीयांसमोर दैनंदिन जीवनक्रम चालविण्यासाठी आव्हान उभे राहिले आहे. अशा गरजू कुटुंबीयांना त्यांच्या गरजेनुसार व पात्रतेच्या निकषानुसार शासनाच्या विविध विभागांच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करून सामाजिक बांधिलकीसोबतच संवेदनशील प्रशासनाचा प्रत्यय देणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले.

त्या अनुषंगाने कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या घरी भेट देऊन कुटुंबाची एकूण माहिती घ्यावी, गरजेनुसार आणि पात्रतेनुसार अशा कुटुंबांना कोणत्या योजनेचा लाभ देता येईल याबाबत माहिती घेऊन त्यांचे अर्ज घ्यावेत, ते अर्ज संबंधित विभागाला पाठवून पुढील कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले आहेत. या सामाजिक बांधिलकीद्वारे घरातील कर्ती व्यक्ती गमावलेल्या कुटुंबाला पुन्हा उभे राहण्यासाठी उभारी देण्याची गरज असल्याचेही त्यांनी आदेशात नमूद केले आहे. उपविभागीय अधिकारी तसेच सर्व तहसीलदार यांना एका पत्राद्वारे कोरोना मयताच्या कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पुढाकार घेण्याबाबत कळवले आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजू कुटुंबांना प्रदान करण्यासाठी गावनिहाय कोरोना संक्रमणामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घ्यावी, कागदपत्रांची पूर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव महसूल विभाग, महिला व बालविकास विभाग, समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे सादर करावेत. यासाठी संबंधित मंडल अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांचे पथक नियुक्त करावे. या पथकाने कुटुंबीयांची २८ जून रोजी भेट घेऊन ५ जुलैपर्यंत विविध योजनांचे प्रस्ताव संबंधित कार्यालयास सादर करावे, कोरोना संक्रमणामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना योजनेचा लाभ देऊन अहवाल करावा, असे आदेशही डॉ. विपीन यांनी दिले आहेत.