शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्र डागले, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

जिल्ह्यात सत्र न्यायालयातील खटल्यांमध्ये शिक्षेचा दर केवळ १२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:23 IST

इतर खटल्यांमध्ये मात्र प्रमाण वाढले प्रथम श्रेणी न्यायालयांमध्ये चालणाऱ्या खटल्यात ५० टक्के आराेपींना शिक्षा हाेत असल्याचे चित्र आहे. गेल्या ...

इतर खटल्यांमध्ये मात्र प्रमाण वाढले

प्रथम श्रेणी न्यायालयांमध्ये चालणाऱ्या खटल्यात ५० टक्के आराेपींना शिक्षा हाेत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भादंविच्या एकूण गुन्ह्यांमध्ये ५३ टक्के, तर स्थानिक कायद्यांतर्गत चालणाऱ्या गुन्ह्यांमध्ये १७ टक्के प्रकरणात शिक्षा हाेत असल्याची आकडेवारी आहे. भादंविच्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा गतवर्षीच्या तुलनेत गुन्हे शाबिती व शिक्षेचे प्रमाण १३ टक्क्यांनी, तर स्थानिक कायद्यांतर्गत ८ टक्क्यांनी वाढलेले आहे. एकूण सरासरीचा विचार करता गेल्या वर्षीच्या तुलनेत शिक्षेचे प्रमाण ११ टक्क्यांनी वाढलेले दिसते.

चाैकट...

अपयशाचे खापर फितुरांवर

यातील सत्र न्यायालयात चालणाऱ्या भादंविच्या गुन्ह्यातील स्थिती गंभीर मानली जाते. तब्बल ८८ टक्के खटल्यातील आराेपी सर्रास निर्दाेष सुटत आहेत. हे पाेलीस तपासातील अपयश स्पष्टपणे दिसत असले तरी पाेलीस यंत्रणा या अपयशाचे खापर पंच, साक्षीदार, फिर्यादी फितूर हाेणे, काेराेना व लाॅकडाऊनमुळे बंद असलेले, ऑनलाईन चाललेले कामकाज आदी बाबींवर फाेडताना दिसते आहे.

चाैकट....

नेमके अपयश काेणाचे ?

खटल्याच्या कामात सुसूत्रता यावी, समन्वय राहावा, यासाठी पैरवी अधिकारी म्हणून पाेलिसांना न्यायालयात नियुक्त करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही केवळ १२ टक्के खटल्यांमध्ये गुन्हे शाबिती व शिक्षा हाेत असल्याने नेमके अपयश काेणाचे, पाेलीस तपास अधिकाऱ्याचे, की सरकारी वकिलाचे, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. सदाेष दाेषाराेपपत्र हे प्रमुख कारणही बहुतांश गुन्ह्यांमधील आराेपी निर्दाेष सुटण्यास कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले जाते.

काेट

गुन्ह्यांच्या सर्वच प्रकारात आराेपींना शिक्षा व्हावी, यासाठी पाेलिसांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. तपासात आणि दाेषाराेपपत्र दाखल करताना त्यात आराेपींना फायदा मिळू शकेल अशा काेणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे निर्देश पाेलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

- निसार तांबाेळी

विशेष पाेलीस महानिरीक्षक

नांदेड