शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात दूषित पाण्याचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:22 IST

उन्हाळा जवळ येऊ लागला तसे पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे किनवटसह जिल्ह्यातील काही भागावर पाणी -टंचाईचे सावट उभे आहे. दुसरीकडे दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. जिल्हा प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल चार हजारांहून अधिक पाणी नमुने दूषित आढळले असून या ठिकाणचे पाणी पिऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देचार हजारांहून अधिक पाणी नमुने अपायकारक

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : उन्हाळा जवळ येऊ लागला तसे पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे किनवटसह जिल्ह्यातील काही भागावर पाणी -टंचाईचे सावट उभे आहे. दुसरीकडे दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. जिल्हा प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल चार हजारांहून अधिक पाणी नमुने दूषित आढळले असून या ठिकाणचे पाणी पिऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.जून-जुलैमध्ये माहूर, किनवटसह काही तालुक्यात सरासरीच्या निम्मा पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यासमोर पाणीटंचाईचा प्रश्न उभा आहे. दुसरीकडे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उपलब्ध पाणीसाठाही कमी होत असल्याचे चित्र असल्याने येत्या काळात टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाला धावपळ करावी लागणार आहे.ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे तेथेही दूषित पाण्याचा प्रश्न उभा आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने डिसेंबरमध्ये ग्रामीण व शहरी भागातून १ हजार ६३७ पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी २४.८५ टक्के म्हणजेच ३४२ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले. याबरोबरच प्रगतीपर नमुन्यात जिल्ह्यातील १९ हजार ९३ पाणी नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवालही प्राप्त झाला असून यातील ४ हजार ७३ म्हणजेच सुमारे २१.२८ टक्के पाणी नमुने दूषित आढळल्याचे आरोग्य प्रयोगशाळेचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणचे पाणी नमुने दूषित आढळले आहेत तेथील वैद्यकीय अधिका-यांना याबाबत कळविले असून संबंधित ठिकाणच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करु नये, अशा सूचनाही दिल्या आहेत.