शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

बांधकाम साहित्याने रस्ते व्यापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:17 IST

आधार नोंदणी बंद असल्याने अडचण देगलूर - शहरातील विविध आधार केंद्रावर नवीन नोंदणी तसेच आधारमध्ये माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया ...

आधार नोंदणी बंद असल्याने अडचण

देगलूर - शहरातील विविध आधार केंद्रावर नवीन नोंदणी तसेच आधारमध्ये माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया बंद आहे. यामागे कोरोनाचे कारण सांगितले जाते. शहरातील विविध भागात नागरिक फिरून चौकशी करतात. मात्र केंद्र बंद असल्याने लोकांची अडचण होत आहे.

फूल उत्पादकांना लॉकडाऊनचा फटका

मुदखेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुदखेड शहरासह तालुक्यात फूल शेती करणाऱ्या जवळपास ८०ते १००फूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने फुले विक्रीसाठी नेता येत नसल्याने जागेवरच सुकून जात आहेत. त्यामुळे फूल उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. फूल उत्पादकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.

बँकेतील गर्दी कमी होईना

कंधार - मागील महिन्यात तब्बल १० दिवस बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु काही दिवसांपासून पुन्हा ठरावीक वेळेत बँका सुरू झाल्याने ग्राहकांची गर्दी वाढली आहे. या दरम्यान कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

खरिपाची तयारी सुरू

उमरी - तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर, मूग आदी पिके घेण्याचे नियोजन केले जात आहे.

मास्क विक्रीतून रोजगार

भोकर - शहरात मास्कची मागणी वाढली असून अनेकांनी मास्क विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सध्या किरकोळ विक्रेत्यांच्या हाताला काम नसल्याने या विक्रेत्यांनी मास्क खरेदी करून शहरातील विविध भागात स्टॉल्स लावले आहेत.

जागेच्या वादातून मारहाण

नायगाव - तालुक्यातील निळगव्हाण येथील भारतबाई गागलवाड यांना जागेच्या वादातून आरोपींनी मारहाण केल्याची घटना ९ मे रोजी घडली. यामध्ये भारतबाई यांच्या डोक्याला मार लागला असून आरोपींनी त्यांना जिवे मारण्याचीही धमकी दिली. नायगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

बियाणांची चढ्या दराने विक्री

बिलोली - येथील बाजारपेठेत बियाणांची चढ्या दराने विक्री केली जात आहे. शेतकरी मशागत करून खरीप हंगामाची तयारी करीत असून बी-बियाणे, खतांच्या खरेदीचे नियोजनही करत आहेत. मात्र काही व्यापाऱ्यांनी आतापासूनच चढ्या दराने विक्री करणे सुरू केले असून यामुळे शेतकरी लुबाडला जात आहे.

गटई कामगारांना मदत द्या

नायगाव - लॉकडाऊनच्या काळात चर्मकार समाजातील गटई कामगारांची मोठ्या प्रमाणात उपासमार होत आहे. राज्यातील गटई कामगारांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गंगाधरराव गंगासागरे यांनी केली. यानिमित्ताने उपोषणही करण्यात आले. यावेळी बंटी नायगावकर, संतोष सूर्यवंशी, गजानन गंगासागरे, चंद्रकांत हवेलीकर, देवानंद गंगासागरे आदी उपस्थित होते.

सार्वजनिक विहिरीची दुरावस्था

कंधार - उस्माननगर येथील वाॅर्ड ३ व २ मधील गवळी गल्ली भागातील सार्वजनिक विहिरीची दयनीय अवस्था झाली. निजामकालीन विहीर आहे. विहिरीची उंची व रस्ता बरोबर झाल्याने अनेक दुर्घटना होत आहेत. डुक्कर, शेळी विहिरीमध्ये पडून जखमी झाले आहेत. या विहिरीचे पाणी धुणी, भांडीसाठी वापरले जाते. पावसाळा-हिवाळ्यात भरपूर पाणी असते.

तीरकमटे यांना पीएच.डी.

देगलूर - आडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन संशोधन केंद्रातील विद्यार्थी एन.टी. तीरकमटे यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ.बी.आर. कत्तुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाचे जलयुक्त शिवार अभियान विशेष संदर्भ लातूर जिल्हा या विषयावर संशोधन पूर्ण केले. याबद्दल त्यांना पीएच.डी. देण्यात आली.

पिकांचे पंचनामे करा

किनवट - वादळी वारे आणि पावसामुळे दोन दिवसापूर्वी पिकांचे मोठे नुकसान झाले. महसूल प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी किनवट पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड यांनी केली. शिवणी परिसरातील नुकसानीकडे त्यांनी लक्ष वेधले. लोकांच्या घरावरील टीनपत्रे उडाल्याचेही त्यांनी नमूद केले.

गव्हाचे भाव वाढले

हदगाव - मागील वर्षीच्या तुलनेत गव्हाचे भाव २०० ते २५० रुपये वाढले आहेत. यंदा २४०० ते २२०० रुपयांपर्यंत गहू विक्री होत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यापारी भाववाढ करीत असल्याचे दिसून येते.

रस्त्यावर शुकशुकाट

नायगाव - लॉकडाऊनमुळे कृृष्णूर परिसरातील रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे. सकाळी ७ ते ११ दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू असली तरी रस्त्यावर तुरळक गर्दी आहे. ऊन व लॉकडाऊनमुळे नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे दिसते.

उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री

नांदेड - येथील रेल्वे स्टेशनसमोर उघड्यावरच खाद्य पदार्थांची विक्री करण्यात येत असल्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे डासांसह माशांचाही प्रादुर्भाव वाढला. कोणतीही सुरक्षा बाळगली जात नाही. याशिवाय बसेसही धावत असल्यामुळे रस्त्यावरील धूळ खाद्यपदार्थांवर उडत आहे. संबंधित याकडे दुर्लक्ष करीत आहेत.