शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बांधकाम साहित्याने रस्ते व्यापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:17 IST

आधार नोंदणी बंद असल्याने अडचण देगलूर - शहरातील विविध आधार केंद्रावर नवीन नोंदणी तसेच आधारमध्ये माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया ...

आधार नोंदणी बंद असल्याने अडचण

देगलूर - शहरातील विविध आधार केंद्रावर नवीन नोंदणी तसेच आधारमध्ये माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया बंद आहे. यामागे कोरोनाचे कारण सांगितले जाते. शहरातील विविध भागात नागरिक फिरून चौकशी करतात. मात्र केंद्र बंद असल्याने लोकांची अडचण होत आहे.

फूल उत्पादकांना लॉकडाऊनचा फटका

मुदखेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुदखेड शहरासह तालुक्यात फूल शेती करणाऱ्या जवळपास ८०ते १००फूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने फुले विक्रीसाठी नेता येत नसल्याने जागेवरच सुकून जात आहेत. त्यामुळे फूल उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. फूल उत्पादकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.

बँकेतील गर्दी कमी होईना

कंधार - मागील महिन्यात तब्बल १० दिवस बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु काही दिवसांपासून पुन्हा ठरावीक वेळेत बँका सुरू झाल्याने ग्राहकांची गर्दी वाढली आहे. या दरम्यान कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

खरिपाची तयारी सुरू

उमरी - तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर, मूग आदी पिके घेण्याचे नियोजन केले जात आहे.

मास्क विक्रीतून रोजगार

भोकर - शहरात मास्कची मागणी वाढली असून अनेकांनी मास्क विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सध्या किरकोळ विक्रेत्यांच्या हाताला काम नसल्याने या विक्रेत्यांनी मास्क खरेदी करून शहरातील विविध भागात स्टॉल्स लावले आहेत.

जागेच्या वादातून मारहाण

नायगाव - तालुक्यातील निळगव्हाण येथील भारतबाई गागलवाड यांना जागेच्या वादातून आरोपींनी मारहाण केल्याची घटना ९ मे रोजी घडली. यामध्ये भारतबाई यांच्या डोक्याला मार लागला असून आरोपींनी त्यांना जिवे मारण्याचीही धमकी दिली. नायगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

बियाणांची चढ्या दराने विक्री

बिलोली - येथील बाजारपेठेत बियाणांची चढ्या दराने विक्री केली जात आहे. शेतकरी मशागत करून खरीप हंगामाची तयारी करीत असून बी-बियाणे, खतांच्या खरेदीचे नियोजनही करत आहेत. मात्र काही व्यापाऱ्यांनी आतापासूनच चढ्या दराने विक्री करणे सुरू केले असून यामुळे शेतकरी लुबाडला जात आहे.

गटई कामगारांना मदत द्या

नायगाव - लॉकडाऊनच्या काळात चर्मकार समाजातील गटई कामगारांची मोठ्या प्रमाणात उपासमार होत आहे. राज्यातील गटई कामगारांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गंगाधरराव गंगासागरे यांनी केली. यानिमित्ताने उपोषणही करण्यात आले. यावेळी बंटी नायगावकर, संतोष सूर्यवंशी, गजानन गंगासागरे, चंद्रकांत हवेलीकर, देवानंद गंगासागरे आदी उपस्थित होते.

सार्वजनिक विहिरीची दुरावस्था

कंधार - उस्माननगर येथील वाॅर्ड ३ व २ मधील गवळी गल्ली भागातील सार्वजनिक विहिरीची दयनीय अवस्था झाली. निजामकालीन विहीर आहे. विहिरीची उंची व रस्ता बरोबर झाल्याने अनेक दुर्घटना होत आहेत. डुक्कर, शेळी विहिरीमध्ये पडून जखमी झाले आहेत. या विहिरीचे पाणी धुणी, भांडीसाठी वापरले जाते. पावसाळा-हिवाळ्यात भरपूर पाणी असते.

तीरकमटे यांना पीएच.डी.

देगलूर - आडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन संशोधन केंद्रातील विद्यार्थी एन.टी. तीरकमटे यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ.बी.आर. कत्तुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाचे जलयुक्त शिवार अभियान विशेष संदर्भ लातूर जिल्हा या विषयावर संशोधन पूर्ण केले. याबद्दल त्यांना पीएच.डी. देण्यात आली.

पिकांचे पंचनामे करा

किनवट - वादळी वारे आणि पावसामुळे दोन दिवसापूर्वी पिकांचे मोठे नुकसान झाले. महसूल प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी किनवट पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड यांनी केली. शिवणी परिसरातील नुकसानीकडे त्यांनी लक्ष वेधले. लोकांच्या घरावरील टीनपत्रे उडाल्याचेही त्यांनी नमूद केले.

गव्हाचे भाव वाढले

हदगाव - मागील वर्षीच्या तुलनेत गव्हाचे भाव २०० ते २५० रुपये वाढले आहेत. यंदा २४०० ते २२०० रुपयांपर्यंत गहू विक्री होत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यापारी भाववाढ करीत असल्याचे दिसून येते.

रस्त्यावर शुकशुकाट

नायगाव - लॉकडाऊनमुळे कृृष्णूर परिसरातील रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे. सकाळी ७ ते ११ दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू असली तरी रस्त्यावर तुरळक गर्दी आहे. ऊन व लॉकडाऊनमुळे नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे दिसते.

उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री

नांदेड - येथील रेल्वे स्टेशनसमोर उघड्यावरच खाद्य पदार्थांची विक्री करण्यात येत असल्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे डासांसह माशांचाही प्रादुर्भाव वाढला. कोणतीही सुरक्षा बाळगली जात नाही. याशिवाय बसेसही धावत असल्यामुळे रस्त्यावरील धूळ खाद्यपदार्थांवर उडत आहे. संबंधित याकडे दुर्लक्ष करीत आहेत.