शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा विचार, अनेक प्रश्न अनुत्तरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST

शिक्षक विभागाने नुकतेच राज्यातील मुख्याध्यापकांचे सर्वेक्षण करून दहावीच्या निकालासंदर्भात मते मागविली होती. यावेळी १७ हजार ४८७ मुख्याध्यापकांनी अंतर्गत मूल्यमापनाआधारे ...

शिक्षक विभागाने नुकतेच राज्यातील मुख्याध्यापकांचे सर्वेक्षण करून दहावीच्या निकालासंदर्भात मते मागविली होती. यावेळी १७ हजार ४८७ मुख्याध्यापकांनी अंतर्गत मूल्यमापनाआधारे निकाल जाहीर करावा, असे मत मांडले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे २३ एप्रिलपासून घेण्यात येणारी दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र आता दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देताना कोणते निकष वापरावेत, याविषयी चर्चा सुरू आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ११ वीच्या वर्गात प्रवेशासाठी गुण देण्यासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा घ्यावी काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व विषयाची मिळून एकत्रित एक पेपर विद्यार्थ्यांना द्यावा, त्यासाठी दोन तास वेळ दिला जाईल. ही परीक्षा जुलै किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळेच्या ठिकाणी घ्यावी, असे नियोजन केले जात आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांचे मते मागविण्यात आली होती. मात्र अद्यापही कोणताच निर्णय झाला नाही.

चौकट- कोरोनामुळे मागील शैक्षणिक वर्षात शाळा सुरूच झाल्या नाहीत. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना काही शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविला, परंतु काही शाळेत अडचणी आल्या. त्यामुळे या शाळेत ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविण्यात आला नाही.

ग्रामीण भागात ऑनलाईन अभ्यासक्रमात येणारे अडथळे व विद्यार्थ्यांकडे असलेल्या असुविधांमुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने मुख्याध्यापकांच्या केलेल्या सर्वेक्षणानंतर मूल्यमापनासाठी कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

चौकट-

शिक्षक, प्राचार्य म्हणतात

१. शाळास्तरावर ११ वी प्रवेशासाठी सीईटी हा एक पर्याय होऊ शकतो. त्यानुसार नियोजन केल्यास हा प्रश्न सुटेल. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कसा राहणार, यावरही बरेच अवलंबून आहे. कारण परीक्षा म्हटले की, शाळेत गर्दी होणार. त्यासाठी वेगळे नियोजन करावे लागणार. मुख्याध्यापक पवळे, श्री शिवाजी कॉलेज, माणिकनगर, नांदेड.

२. दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्षभर ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविला. मात्र ग्रामीण भागातील अनेक शाळेतील मुलांना अभ्यासक्रमाचा परिचयसुद्धा झाला नाही. अशावेळी ते कोणती परीक्षा कशी पद्धतीने देणार, हा एक प्रश्नच आहे. - राजेश टोम्पे, शिक्षक

३. दहावीच्या निकालासाठी कोणते निकष वापरणार, यावर ११ वीच्या प्रवेशाची प्रक्रिया अवलंबून आहे. त्यामुळे शासनाने लवकर निर्णय घेऊन पालकांच्या मनातील गोंधळ थांबविला पाहिजे. कारण मुलांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले आहे. - बालाजी देशमुख , शिक्षक