शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा विचार, अनेक प्रश्न अनुत्तरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST

शिक्षक विभागाने नुकतेच राज्यातील मुख्याध्यापकांचे सर्वेक्षण करून दहावीच्या निकालासंदर्भात मते मागविली होती. यावेळी १७ हजार ४८७ मुख्याध्यापकांनी अंतर्गत मूल्यमापनाआधारे ...

शिक्षक विभागाने नुकतेच राज्यातील मुख्याध्यापकांचे सर्वेक्षण करून दहावीच्या निकालासंदर्भात मते मागविली होती. यावेळी १७ हजार ४८७ मुख्याध्यापकांनी अंतर्गत मूल्यमापनाआधारे निकाल जाहीर करावा, असे मत मांडले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे २३ एप्रिलपासून घेण्यात येणारी दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र आता दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देताना कोणते निकष वापरावेत, याविषयी चर्चा सुरू आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ११ वीच्या वर्गात प्रवेशासाठी गुण देण्यासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा घ्यावी काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व विषयाची मिळून एकत्रित एक पेपर विद्यार्थ्यांना द्यावा, त्यासाठी दोन तास वेळ दिला जाईल. ही परीक्षा जुलै किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळेच्या ठिकाणी घ्यावी, असे नियोजन केले जात आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांचे मते मागविण्यात आली होती. मात्र अद्यापही कोणताच निर्णय झाला नाही.

चौकट- कोरोनामुळे मागील शैक्षणिक वर्षात शाळा सुरूच झाल्या नाहीत. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना काही शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविला, परंतु काही शाळेत अडचणी आल्या. त्यामुळे या शाळेत ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविण्यात आला नाही.

ग्रामीण भागात ऑनलाईन अभ्यासक्रमात येणारे अडथळे व विद्यार्थ्यांकडे असलेल्या असुविधांमुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने मुख्याध्यापकांच्या केलेल्या सर्वेक्षणानंतर मूल्यमापनासाठी कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

चौकट-

शिक्षक, प्राचार्य म्हणतात

१. शाळास्तरावर ११ वी प्रवेशासाठी सीईटी हा एक पर्याय होऊ शकतो. त्यानुसार नियोजन केल्यास हा प्रश्न सुटेल. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कसा राहणार, यावरही बरेच अवलंबून आहे. कारण परीक्षा म्हटले की, शाळेत गर्दी होणार. त्यासाठी वेगळे नियोजन करावे लागणार. मुख्याध्यापक पवळे, श्री शिवाजी कॉलेज, माणिकनगर, नांदेड.

२. दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्षभर ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविला. मात्र ग्रामीण भागातील अनेक शाळेतील मुलांना अभ्यासक्रमाचा परिचयसुद्धा झाला नाही. अशावेळी ते कोणती परीक्षा कशी पद्धतीने देणार, हा एक प्रश्नच आहे. - राजेश टोम्पे, शिक्षक

३. दहावीच्या निकालासाठी कोणते निकष वापरणार, यावर ११ वीच्या प्रवेशाची प्रक्रिया अवलंबून आहे. त्यामुळे शासनाने लवकर निर्णय घेऊन पालकांच्या मनातील गोंधळ थांबविला पाहिजे. कारण मुलांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले आहे. - बालाजी देशमुख , शिक्षक