शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

भ्रष्टाचार व राजकारणाचा अड्डा बनल्याने एसटी महामंडळाची ही अवस्था: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 17:13 IST

Raju Shetty भाजपने सरकार असतांना काय केले, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला

- गोविंद टेकाळेअर्धापूर ( नांदेड ) : - महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी महामंडळ (ST Strike ) आज घडीला भ्रष्टाचार व राजकारणाचा अड्डा बनला आहे. यामुळे एसटीचे अर्थकारण बिघडून सध्याची बिकट परिस्थिती निर्माण झाल्याची टीका  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे‌ नेते व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राची लालपरी ही सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आज घडीला ही लालपरी गचके खायला लागली आहे. यास गेल्या काही काळामध्ये राज्यात सत्तेत असलेली सरकारे जबाबदार आहेत.  मोठमोठ्या घोषणा करून सर्व बोजा महामंडळ वर टाकायचा टायर खरेदी,साहित्य खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार करायचा महामंडळ राजकारणाचा अड्डा बनला असून याचे परिणाम आज एसटीचे अर्थ कारण बिघडून गेले आहे. एसटी जनसामान्यांनचा आधारवड आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवत बजेटमध्ये भरीव तरतूद करून एसटी महामंडळ वाचवावे लागेल. यासाठी एसटीचे सरकारीकरण करणे हा पर्याय आहे. यासाठी कामगारांनी सुद्धा विचार करणे गरजेचे आहे, असे शेट्टी म्हणाले. यावेळी माजी अध्यक्ष वस्त्रोद्योग महामंडळ रविकांत तुपकर,माजी प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ. प्रकाश पोपळे,स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे,अमोल हिप्परगे सोलापूर,स्वाभिमानी शिक्षक संघटना मराठवाडा अध्यक्ष सतीश सोनटक्के,जिल्हाध्यक्ष शिक्षक संघटना शेख जावेद,जेष्ठ नेते किशनराव कदम यांच्या सह अनेकजन उपस्थितीत होते.

भाजपने सरकार असतांना काय केले,भारतीय जनता पार्टीचे नेते एसटी कामगारांसाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी त्यांचे सरकार असतांना एसटीसाठी काय केलं याचं उत्तर द्यावे लागेल. कारण जनता त्यांच्याकडे उत्तर मागत आहे. सर्वांनीच एसटीचा फक्त वापरून घेतला आहे असे ही शेट्टी म्हणाले. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपNandedनांदेडRaju Shettyराजू शेट्टी