शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

आओ जाओ घर तुम्हारा! बसस्थानक, रेल्वेस्थानक, सीमेवर कुठेच तपासणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:17 IST

जिल्ह्यात दररोज पाचशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यातच शेजारील परभणी प्रशासनाने मात्र नांदेडच्या प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे. परंतु नांदेडात ...

जिल्ह्यात दररोज पाचशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यातच शेजारील परभणी प्रशासनाने मात्र नांदेडच्या प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे. परंतु नांदेडात मात्र कोणत्याही भागातून सहज येता येते. बसस्थानकावर साधी तपासणी किंवा चौकशीही केली जात नाही. रेल्वेस्टेशनवर नावालाच ॲन्टिजेन तपासणीचे केंद्र उघडण्यात आले आहे. या ठिकाणी क्वचितच प्रवाशांची तपासणी किंवा विचारपूस होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी विदर्भाच्या सीमेवर तपासणी सुरू केली होती. परंतु नंतर ती बंद करण्यात आली.

लग्नसराईनिमित्त बसस्थानकात गर्दी

n सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून, त्यासाठी बसस्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी होत आहे. या ठिकाणी ॲन्टिजेन तपासणीचे केंद्र आहे. परंतु कुणीही प्रवासी त्याकडे फिरकत नाही.

n बाकड्यावर दाटीवाटीने प्रवासी बसची वाट पाहात थांबलेले असतात. बसमध्ये जागा मिळविण्यासाठीही झुंबड उडते. विशेष म्हणजे यातील अनेकांनी मास्कही घातलेले नाहीत. त्यामुळे कोरोनाचा धोका राेखणार कसा?

रेल्वेस्टेशनवर तपासणी नावालाच

n नांदेड शहरात पुणे, मुंबई, औरंगाबाद येथून दररोज रेल्वे येतात आणि जातात. परंतु रेल्वेस्टेशनवर या प्रवाशांची कुणी तपासणी करीत नाही.

n तिकीट खिडकीसमोरच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविण्यात येत आहे. रेल्वे गाड्यांमध्येही अनेकजण विनामास्कच दिसून येतात. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करीत असलेल्या प्रवाशांवर कारवाईची गरज आहे.

जिल्हासीमा सर्वांसाठी मोकळ्याच

n नांदेडला शेजारील विदर्भ, तेलंगणाच्या सीमा आहेत. त्यामुळे दररोज या भागातून शेकडो वाहने आणि प्रवासी नांदेड जिल्ह्यात प्रवेश करतात. शेजारील यवतमाळ जिल्हा तर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे.

n अशावेळी सीमावर प्रवाशांची तपासणी करण्याची गरज आहे. परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रवाशांची तपासणी होत नाही. सर्वांसाठी रान मोकळेच आहे.

जिल्ह्यात दररोज पाचशेहून अधिक रुग्ण सापडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने २१ मार्चपर्यंत अंशत: लॉकडाऊन लावण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये, खासगी शिकविण्या बंद करण्यात आल्या आहेत. दुकानांच्या वेळा सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर लग्नसराई, अंत्यविधी या ठिकाणी उपस्थिती निश्चित केली असून, इतर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु त्यानंतरही कोरोनावर आवर घालण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. कोरोना तपासणीचा वेग वाढवून आता दररोज साधारणता अडीच हजार तपासण्या करण्यात येत आहेत. लसीकरणाचा वेगही वाढविण्यात आला आहे. शासकीय कार्यालयात प्रवेश करण्याअगोदर कोरोना तपासणी जिल्हा परिषदेत सुरू करण्यात आली आहे. यासह इतर उपाययोजना केल्या आहेत.