शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

आओ जाओ घर तुम्हारा! बसस्थानक, रेल्वेस्थानक, सीमेवर कुठेच तपासणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:17 IST

जिल्ह्यात दररोज पाचशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यातच शेजारील परभणी प्रशासनाने मात्र नांदेडच्या प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे. परंतु नांदेडात ...

जिल्ह्यात दररोज पाचशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यातच शेजारील परभणी प्रशासनाने मात्र नांदेडच्या प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे. परंतु नांदेडात मात्र कोणत्याही भागातून सहज येता येते. बसस्थानकावर साधी तपासणी किंवा चौकशीही केली जात नाही. रेल्वेस्टेशनवर नावालाच ॲन्टिजेन तपासणीचे केंद्र उघडण्यात आले आहे. या ठिकाणी क्वचितच प्रवाशांची तपासणी किंवा विचारपूस होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी विदर्भाच्या सीमेवर तपासणी सुरू केली होती. परंतु नंतर ती बंद करण्यात आली.

लग्नसराईनिमित्त बसस्थानकात गर्दी

n सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून, त्यासाठी बसस्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी होत आहे. या ठिकाणी ॲन्टिजेन तपासणीचे केंद्र आहे. परंतु कुणीही प्रवासी त्याकडे फिरकत नाही.

n बाकड्यावर दाटीवाटीने प्रवासी बसची वाट पाहात थांबलेले असतात. बसमध्ये जागा मिळविण्यासाठीही झुंबड उडते. विशेष म्हणजे यातील अनेकांनी मास्कही घातलेले नाहीत. त्यामुळे कोरोनाचा धोका राेखणार कसा?

रेल्वेस्टेशनवर तपासणी नावालाच

n नांदेड शहरात पुणे, मुंबई, औरंगाबाद येथून दररोज रेल्वे येतात आणि जातात. परंतु रेल्वेस्टेशनवर या प्रवाशांची कुणी तपासणी करीत नाही.

n तिकीट खिडकीसमोरच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविण्यात येत आहे. रेल्वे गाड्यांमध्येही अनेकजण विनामास्कच दिसून येतात. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करीत असलेल्या प्रवाशांवर कारवाईची गरज आहे.

जिल्हासीमा सर्वांसाठी मोकळ्याच

n नांदेडला शेजारील विदर्भ, तेलंगणाच्या सीमा आहेत. त्यामुळे दररोज या भागातून शेकडो वाहने आणि प्रवासी नांदेड जिल्ह्यात प्रवेश करतात. शेजारील यवतमाळ जिल्हा तर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे.

n अशावेळी सीमावर प्रवाशांची तपासणी करण्याची गरज आहे. परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रवाशांची तपासणी होत नाही. सर्वांसाठी रान मोकळेच आहे.

जिल्ह्यात दररोज पाचशेहून अधिक रुग्ण सापडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने २१ मार्चपर्यंत अंशत: लॉकडाऊन लावण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये, खासगी शिकविण्या बंद करण्यात आल्या आहेत. दुकानांच्या वेळा सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर लग्नसराई, अंत्यविधी या ठिकाणी उपस्थिती निश्चित केली असून, इतर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु त्यानंतरही कोरोनावर आवर घालण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. कोरोना तपासणीचा वेग वाढवून आता दररोज साधारणता अडीच हजार तपासण्या करण्यात येत आहेत. लसीकरणाचा वेगही वाढविण्यात आला आहे. शासकीय कार्यालयात प्रवेश करण्याअगोदर कोरोना तपासणी जिल्हा परिषदेत सुरू करण्यात आली आहे. यासह इतर उपाययोजना केल्या आहेत.