शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

कोरोनाकाळात बालविवाह वाढले; विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST

जिल्ह्यात जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आहेत. आता ग्रामीण भागात शासन निर्देशाप्रमाणे आठवी ते बारावीच्या ...

जिल्ह्यात जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आहेत. आता ग्रामीण भागात शासन निर्देशाप्रमाणे आठवी ते बारावीच्या शाळा सुरू केल्या आहेत. या शाळा सुरू केल्यानंतर कोरोनापूर्वी शाळामधील विद्यार्थ्यांची संख्या आणि आताची विद्यार्थी संख्या यात तफावत आढळते आहे. प्रामुख्याने विद्यार्थिनींची संख्या कमी झाली आहे. ग्रामीण भागात मुलींचे विवाह लवकर करण्याकडे पालकांचा कल असतो. त्यामुळेही मुलींची संख्या घटल्याचे चित्र आहे.

पटसंख्या कमी झालेली

मुली गेल्या कुठे?

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या सातवीपर्यंत शाळा असतात. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या गावी जावे लागते. पालक आपल्या मुलींना गावाबाहेरील शाळेत पाठविण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे त्यांच्या विवाहाचे प्रयत्न सुरू होतात.

दहावीच्या विद्यार्थिनींची शाळेत संख्या घटली

n जिल्ह्यात ग्रामीण भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या वर्गामध्ये नववी, दहावीतील विद्यार्थिनींची संख्या कमी झाली आहे. पालक शाळेत मुलांना पाठवण्यास तयार नसल्यानेही ही संख्या घटल्याचे दिसत आहे.

आर्थिक विवंचना हेच कारण

n कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार हिरावला. ग्रामीण भागातही वेगळे चित्र नव्हते.

n परिणामी पालक आपली जबाबदारी पूर्ण करण्याची घाई करीत होते. ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण आहेच.

जिल्ह्यात कोरोनाकाळात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्वच यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे माहिती मिळताच ३० बालविवाह रोखण्यात आले आहे. - रेखा काळम,

महिला व बालविकास अधिकारी

कोरोनाने अनेकांना रोजगारापासून वंचित रहावे लागले. ग्रामीण भागातील पालकांची मानसिकता लक्षात घेता मुलींचा विवाह करून आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतात. यातूनच बालविवाहाचे प्रमाण कोरोना काळात वाढले होते.

- सूर्यकांत इरवंत, सामाजिक कार्यकर्ता,