शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

कोरोनाकाळात बालविवाह वाढले; विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST

जिल्ह्यात जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आहेत. आता ग्रामीण भागात शासन निर्देशाप्रमाणे आठवी ते बारावीच्या ...

जिल्ह्यात जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आहेत. आता ग्रामीण भागात शासन निर्देशाप्रमाणे आठवी ते बारावीच्या शाळा सुरू केल्या आहेत. या शाळा सुरू केल्यानंतर कोरोनापूर्वी शाळामधील विद्यार्थ्यांची संख्या आणि आताची विद्यार्थी संख्या यात तफावत आढळते आहे. प्रामुख्याने विद्यार्थिनींची संख्या कमी झाली आहे. ग्रामीण भागात मुलींचे विवाह लवकर करण्याकडे पालकांचा कल असतो. त्यामुळेही मुलींची संख्या घटल्याचे चित्र आहे.

पटसंख्या कमी झालेली

मुली गेल्या कुठे?

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या सातवीपर्यंत शाळा असतात. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या गावी जावे लागते. पालक आपल्या मुलींना गावाबाहेरील शाळेत पाठविण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे त्यांच्या विवाहाचे प्रयत्न सुरू होतात.

दहावीच्या विद्यार्थिनींची शाळेत संख्या घटली

n जिल्ह्यात ग्रामीण भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या वर्गामध्ये नववी, दहावीतील विद्यार्थिनींची संख्या कमी झाली आहे. पालक शाळेत मुलांना पाठवण्यास तयार नसल्यानेही ही संख्या घटल्याचे दिसत आहे.

आर्थिक विवंचना हेच कारण

n कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार हिरावला. ग्रामीण भागातही वेगळे चित्र नव्हते.

n परिणामी पालक आपली जबाबदारी पूर्ण करण्याची घाई करीत होते. ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण आहेच.

जिल्ह्यात कोरोनाकाळात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्वच यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे माहिती मिळताच ३० बालविवाह रोखण्यात आले आहे. - रेखा काळम,

महिला व बालविकास अधिकारी

कोरोनाने अनेकांना रोजगारापासून वंचित रहावे लागले. ग्रामीण भागातील पालकांची मानसिकता लक्षात घेता मुलींचा विवाह करून आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतात. यातूनच बालविवाहाचे प्रमाण कोरोना काळात वाढले होते.

- सूर्यकांत इरवंत, सामाजिक कार्यकर्ता,