शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

कोरोनाकाळात बालविवाह वाढले; विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST

जिल्ह्यात जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आहेत. आता ग्रामीण भागात शासन निर्देशाप्रमाणे आठवी ते बारावीच्या ...

जिल्ह्यात जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आहेत. आता ग्रामीण भागात शासन निर्देशाप्रमाणे आठवी ते बारावीच्या शाळा सुरू केल्या आहेत. या शाळा सुरू केल्यानंतर कोरोनापूर्वी शाळामधील विद्यार्थ्यांची संख्या आणि आताची विद्यार्थी संख्या यात तफावत आढळते आहे. प्रामुख्याने विद्यार्थिनींची संख्या कमी झाली आहे. ग्रामीण भागात मुलींचे विवाह लवकर करण्याकडे पालकांचा कल असतो. त्यामुळेही मुलींची संख्या घटल्याचे चित्र आहे.

पटसंख्या कमी झालेली

मुली गेल्या कुठे?

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या सातवीपर्यंत शाळा असतात. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या गावी जावे लागते. पालक आपल्या मुलींना गावाबाहेरील शाळेत पाठविण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे त्यांच्या विवाहाचे प्रयत्न सुरू होतात.

दहावीच्या विद्यार्थिनींची शाळेत संख्या घटली

n जिल्ह्यात ग्रामीण भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या वर्गामध्ये नववी, दहावीतील विद्यार्थिनींची संख्या कमी झाली आहे. पालक शाळेत मुलांना पाठवण्यास तयार नसल्यानेही ही संख्या घटल्याचे दिसत आहे.

आर्थिक विवंचना हेच कारण

n कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार हिरावला. ग्रामीण भागातही वेगळे चित्र नव्हते.

n परिणामी पालक आपली जबाबदारी पूर्ण करण्याची घाई करीत होते. ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण आहेच.

जिल्ह्यात कोरोनाकाळात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्वच यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे माहिती मिळताच ३० बालविवाह रोखण्यात आले आहे. - रेखा काळम,

महिला व बालविकास अधिकारी

कोरोनाने अनेकांना रोजगारापासून वंचित रहावे लागले. ग्रामीण भागातील पालकांची मानसिकता लक्षात घेता मुलींचा विवाह करून आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतात. यातूनच बालविवाहाचे प्रमाण कोरोना काळात वाढले होते.

- सूर्यकांत इरवंत, सामाजिक कार्यकर्ता,