शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

वाहून गेलेल्या पाण्याने अनेक वर्षे भागली असती तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST

सहा लाख लोकसंख्या असलेल्या नांदेड शहराची विष्णुपुरी प्रकल्पावर तहान भागविली जाते. महिन्याला दोन दलघमी पाणी शहराला लागते. प्रति व्यक्ती ...

सहा लाख लोकसंख्या असलेल्या नांदेड शहराची विष्णुपुरी प्रकल्पावर तहान भागविली जाते. महिन्याला दोन दलघमी पाणी शहराला लागते. प्रति व्यक्ती दर दिवशी ५० लीटर पाणी दिले जाते. विष्णुपुरी प्रकल्पाची साठवण क्षमता ८० दलघमी आहे. त्यातूनच शेतीसाठी पाणी दिले जाते. त्यात दरवर्षी उन्हाळ्यात नांदेडकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे विद्यापीठाच्या शेजारी असलेल्या खदानीत, तसेच आजूबाजूच्या परिसरात साठवण तलाव निर्माण करून वाहून जाणारे पाणी त्या ठिकाणी साठविण्याचा प्रस्ताव होता, परंतु या प्रस्तावावर पुढे काहीच झाले नाही. किवळा साठवण तलावाचे फक्त भूमिपूजन झाले. त्यामुळे आजही शेकडो दलघमी पाणी तेलंगणात वाहून जाते. विष्णुपुरीच्या वरच्या बाजूस अंतेश्वरची क्षमता २१.१६ दलघमी, दिग्रस ६३.५७ दलघमी असून, तीन किमी अंतरावर गोदावरी आणि पूर्णा नदीचा संगम आहे. त्यामुळे या भागात पाऊस झाल्यास हे पाणी थेट विष्णुपुरीत येते. त्यामुळे विष्णुपुरीचे दरवाजे उघडावे लागतात. विष्णुपुरीच्या खालच्या भागात आमदुरा बांध असून, त्याची क्षमता २३.२० दलघमी, बळेगाव ४०.७८ दलघमी तर बाभळीची क्षमता ५५.४९ दलघमी आहे. त्यामुळे या ठिकाणाहून वाहून गेलेले पाणी तेलंगणातील श्रीराम सागरमध्ये जाते. श्रीराम सागरची क्षमता ३९८ दलघमी आहे. हे धरण भरल्यानंतर पाणी समुद्रात सोडण्यात येते. प्रत्यक्षात आजही विष्णुपुरी प्रकल्पात गाळ मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरत नाही. त्यात साठवण करण्याची इतर कोणतीच व्यवस्था नसल्याने प्रकल्प भरला की, पाणी सोडण्याशिवाय पर्याय राहत नाही, परंतु याबाबत प्रशासन किंवा राजकीय मंडळीकडून कोणतेही पाऊल उचलले जात नाही.

शहराला वर्षाला लागते २४ दलघमी पाणी

नांदेड शहराला वर्षाला साधारणता २४ दलघमी पाणी लागते. तेही दररोज पाणीपुरवठा केल्यावर, परंतु आजघडीला दोन ते तीन दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पुरवठा आणखी कमी होतो. असे असताना तब्बल ४७२ दलघमी पाणी मात्र तेलंगणात वाहून जाते.

खदानीचा पर्याय बासनात गुंडाळला

तत्कालीन महापौर अजयसिंह बिसेन यांनी त्यांच्या काळात विष्णुपुरी प्रकल्पातील वाहून जाणारे पाणी विद्यापीठाच्या शेजारी असलेल्या खदानीत सोडण्याचा प्रस्ताव ठेवला होता. उन्हाळ्याच्या दिवसात या खदानीतील पाणी शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी पुरेसे ठरणार होते. त्या दृष्टीने तयारीही करण्यात आली होती, परंतु बिसेन यांचा कार्यकाळ संपताच, हा प्रस्ताव गुंडाळण्यात आला.