शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वाहून गेलेल्या पाण्याने अनेक वर्षे भागली असती तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST

सहा लाख लोकसंख्या असलेल्या नांदेड शहराची विष्णुपुरी प्रकल्पावर तहान भागविली जाते. महिन्याला दोन दलघमी पाणी शहराला लागते. प्रति व्यक्ती ...

सहा लाख लोकसंख्या असलेल्या नांदेड शहराची विष्णुपुरी प्रकल्पावर तहान भागविली जाते. महिन्याला दोन दलघमी पाणी शहराला लागते. प्रति व्यक्ती दर दिवशी ५० लीटर पाणी दिले जाते. विष्णुपुरी प्रकल्पाची साठवण क्षमता ८० दलघमी आहे. त्यातूनच शेतीसाठी पाणी दिले जाते. त्यात दरवर्षी उन्हाळ्यात नांदेडकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे विद्यापीठाच्या शेजारी असलेल्या खदानीत, तसेच आजूबाजूच्या परिसरात साठवण तलाव निर्माण करून वाहून जाणारे पाणी त्या ठिकाणी साठविण्याचा प्रस्ताव होता, परंतु या प्रस्तावावर पुढे काहीच झाले नाही. किवळा साठवण तलावाचे फक्त भूमिपूजन झाले. त्यामुळे आजही शेकडो दलघमी पाणी तेलंगणात वाहून जाते. विष्णुपुरीच्या वरच्या बाजूस अंतेश्वरची क्षमता २१.१६ दलघमी, दिग्रस ६३.५७ दलघमी असून, तीन किमी अंतरावर गोदावरी आणि पूर्णा नदीचा संगम आहे. त्यामुळे या भागात पाऊस झाल्यास हे पाणी थेट विष्णुपुरीत येते. त्यामुळे विष्णुपुरीचे दरवाजे उघडावे लागतात. विष्णुपुरीच्या खालच्या भागात आमदुरा बांध असून, त्याची क्षमता २३.२० दलघमी, बळेगाव ४०.७८ दलघमी तर बाभळीची क्षमता ५५.४९ दलघमी आहे. त्यामुळे या ठिकाणाहून वाहून गेलेले पाणी तेलंगणातील श्रीराम सागरमध्ये जाते. श्रीराम सागरची क्षमता ३९८ दलघमी आहे. हे धरण भरल्यानंतर पाणी समुद्रात सोडण्यात येते. प्रत्यक्षात आजही विष्णुपुरी प्रकल्पात गाळ मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरत नाही. त्यात साठवण करण्याची इतर कोणतीच व्यवस्था नसल्याने प्रकल्प भरला की, पाणी सोडण्याशिवाय पर्याय राहत नाही, परंतु याबाबत प्रशासन किंवा राजकीय मंडळीकडून कोणतेही पाऊल उचलले जात नाही.

शहराला वर्षाला लागते २४ दलघमी पाणी

नांदेड शहराला वर्षाला साधारणता २४ दलघमी पाणी लागते. तेही दररोज पाणीपुरवठा केल्यावर, परंतु आजघडीला दोन ते तीन दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पुरवठा आणखी कमी होतो. असे असताना तब्बल ४७२ दलघमी पाणी मात्र तेलंगणात वाहून जाते.

खदानीचा पर्याय बासनात गुंडाळला

तत्कालीन महापौर अजयसिंह बिसेन यांनी त्यांच्या काळात विष्णुपुरी प्रकल्पातील वाहून जाणारे पाणी विद्यापीठाच्या शेजारी असलेल्या खदानीत सोडण्याचा प्रस्ताव ठेवला होता. उन्हाळ्याच्या दिवसात या खदानीतील पाणी शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी पुरेसे ठरणार होते. त्या दृष्टीने तयारीही करण्यात आली होती, परंतु बिसेन यांचा कार्यकाळ संपताच, हा प्रस्ताव गुंडाळण्यात आला.