शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

‘ब्रेक द चेन’चा उद्योगांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:18 IST

चौकट--------------- परराज्यातील मजूरही परतले गावी जिल्ह्यात औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये परराज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात ...

चौकट---------------

परराज्यातील मजूरही परतले गावी

जिल्ह्यात औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये परराज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या ‘ब्रेक द चेन’मध्ये हे मजूर गावाकडे परतले आहेत. राज्यातील लॉकडाऊन पाहता हे मजूर परतण्यास इच्छुक नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे मजुरांची समस्या भागवावी कशी? असा प्रश्न उद्योजकांपुढे आहे.

प्रतिक्रिया------------------

‘ब्रेक द चेन’मध्ये अत्यावश्यक उत्पादन निर्मितीला प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्योगधंदा सुरू असला तरीही वाहतूक व्यवस्था कोलमडली असल्याने कच्चा माल आणण्यात अडचणी येत आहेत. उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल नसल्यामुळे उत्पादनाची गती मंदावली आहे. काही अंशी उत्पादनाला मागणी असली तरीही ती वेळेत पूर्ण करणे अवघड जात आहे.

- मारोती कंठेवाड, उद्योजक

औद्योगिक वसाहतीतील कारखान्यामध्ये रोजंदारीवर काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. मात्र आता उद्योगधंदे बंद असल्याने रोजगाराचा प्रश्न उद्‌भवला आहे. काही कारखाने सुरू असले तरीही त्या कारखान्यातील कामगार वेगळे असल्याने आम्हाला तेथे कामावर घेतले जात नाही. त्यामुळे हाताला सध्या काम नाही.

सुरेश वाघमारे, कामगार

गावाजवळच एमआयडीसी असली तरीही नेहमीप्रमाणे आता काम उपलब्ध नाही. कोरोनामुळे वर्षापासून रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीतही पाणी नसल्याने कामे उपलब्ध नाही. या भागातील नागरिकांना आता हाती पडेल ती कामे करावी लागत आहे.

गोविंदराव शिंदे, कामगार.

आपल्या भागातील उद्योग सुरू असले तरीही त्या ठिकाणी आवश्यक असलेली कामे येत नाहीत. जेथे रोजगार मिळत होता तो उद्योग बंद पडला आहे. त्यामुळे पोटा-पाण्याचा प्रश्न उद्‌भवला आहे. बांधकाम मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे.

जितेंद्र जाधव, कामगार