शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

कंटाळलेल्या मनाला झाली बाहेर जाण्याची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर मार्च, एप्रिल व मे महिन्यात सुरू होता. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आल्याने पोलीस अधीक्षक ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर मार्च, एप्रिल व मे महिन्यात सुरू होता. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयात ई-पाससाठी अर्जांची संख्या वाढली. त्यात उपचारासाठी तसेच काहींनी नातेवाईकांच्या भेटीचे कारण, तर कोणी सहलीवर जाण्यासाठी ई-पासची गरज असल्याचे सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन कार्यरत आहे. दुसऱ्या लाटेच्या काळात अनेकांना जिल्हाबाहेर प्रवास करायचा होता.

त्यासाठी ई-पास मिळावा, यासाठी नांदेड जिल्ह्यातील तब्बल २५ हजार जणांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे कर्ज दाखल केले आहेत. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे अनेकांनी पावसाळी पर्यटनासाठी नियोजन केले आहे. काही जिल्ह्यात मात्र अद्याप लॉकडाऊनच आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना ई-पासची गरज पडणार आहे.

टाळेबंदीने कंटाळलेल्या नागरिकांची धडपड

-मार्चपासून घरातच कोंडून पडलेल्या नागरिकांना आता बाहेर जाण्याची घाई झाली आहे. यासाठी अनेकांनी सहलीवर जाण्याचे नियोजन केले आहे. लॉकडाऊन काळात लग्न झालेल्या जोडप्यांनाही सहलीवर जायचे आहे. त्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे.

- अनेकांनी ई-पास अर्जात वैद्यकीय कारण दिले असून, जवळच्या नातेवाईकांचे लग्न, नातेवाईकांची भेट आदी कारणे दिली आहेत. मात्र किरकोळ कारणासाठी केलेले अर्ज रद्द करण्यात आले आहेत.

- लग्नानंतर फिरायला जाणे, नातेवाईकांच्या भेटीला जाणे, या कारणासोबतच मुलांच्या शैक्षणिक कामासाठी जात असल्याचेही कारणे अर्जात स्पष्ट केली आहेत. अनेकांनी कागदपत्रांची पूर्तताच केली नाही.

बहुतांश अर्जदारांचे वैद्यकीय कारण

- कोरोना काळात जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी अनेकांनी ई-पाससाठी आपले अर्ज दाखल केले होते. यातील अनेकांच्या अर्जात वैद्यकीय कारणांचा उल्लेख आढळला. विशेष म्हणजे नांदेडहून हैदराबादकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या होती. अनेकांनी वैद्यकीय उपचाराचे कारण पुढे केले. सर्वाधिक अर्ज वैद्यकीय कारणाचे आहेत; तर उर्वरित कारणात लग्न, अंत्यविधीचे कारण दिले आहे. आवश्यक कारणांनाच संबंधित कार्यालयाने मंजुरी दिली आहे.

अत्यावश्यक कारणासाठी ई-पास

- ई-पाससाठी जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. अनेक अर्जांत किरकोळ कारणे होती; तर अनेकांच्या अर्जात त्रुटी होत्या. अनेकांच्या अर्जात फिरायला जाणे, असा उल्लेख असल्याने हे अर्ज रद्द करावे लागले. अत्यावश्यक कारण असलेल्या अर्जांनाच परवानगी दिली आहे. - प्रमोद शेवाळे, पोलीस अधीक्षक, नांदेड