शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

कंटाळलेल्या मनाला झाली बाहेर जाण्याची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर मार्च, एप्रिल व मे महिन्यात सुरू होता. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आल्याने पोलीस अधीक्षक ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर मार्च, एप्रिल व मे महिन्यात सुरू होता. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयात ई-पाससाठी अर्जांची संख्या वाढली. त्यात उपचारासाठी तसेच काहींनी नातेवाईकांच्या भेटीचे कारण, तर कोणी सहलीवर जाण्यासाठी ई-पासची गरज असल्याचे सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन कार्यरत आहे. दुसऱ्या लाटेच्या काळात अनेकांना जिल्हाबाहेर प्रवास करायचा होता.

त्यासाठी ई-पास मिळावा, यासाठी नांदेड जिल्ह्यातील तब्बल २५ हजार जणांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे कर्ज दाखल केले आहेत. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे अनेकांनी पावसाळी पर्यटनासाठी नियोजन केले आहे. काही जिल्ह्यात मात्र अद्याप लॉकडाऊनच आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना ई-पासची गरज पडणार आहे.

टाळेबंदीने कंटाळलेल्या नागरिकांची धडपड

-मार्चपासून घरातच कोंडून पडलेल्या नागरिकांना आता बाहेर जाण्याची घाई झाली आहे. यासाठी अनेकांनी सहलीवर जाण्याचे नियोजन केले आहे. लॉकडाऊन काळात लग्न झालेल्या जोडप्यांनाही सहलीवर जायचे आहे. त्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे.

- अनेकांनी ई-पास अर्जात वैद्यकीय कारण दिले असून, जवळच्या नातेवाईकांचे लग्न, नातेवाईकांची भेट आदी कारणे दिली आहेत. मात्र किरकोळ कारणासाठी केलेले अर्ज रद्द करण्यात आले आहेत.

- लग्नानंतर फिरायला जाणे, नातेवाईकांच्या भेटीला जाणे, या कारणासोबतच मुलांच्या शैक्षणिक कामासाठी जात असल्याचेही कारणे अर्जात स्पष्ट केली आहेत. अनेकांनी कागदपत्रांची पूर्तताच केली नाही.

बहुतांश अर्जदारांचे वैद्यकीय कारण

- कोरोना काळात जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी अनेकांनी ई-पाससाठी आपले अर्ज दाखल केले होते. यातील अनेकांच्या अर्जात वैद्यकीय कारणांचा उल्लेख आढळला. विशेष म्हणजे नांदेडहून हैदराबादकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या होती. अनेकांनी वैद्यकीय उपचाराचे कारण पुढे केले. सर्वाधिक अर्ज वैद्यकीय कारणाचे आहेत; तर उर्वरित कारणात लग्न, अंत्यविधीचे कारण दिले आहे. आवश्यक कारणांनाच संबंधित कार्यालयाने मंजुरी दिली आहे.

अत्यावश्यक कारणासाठी ई-पास

- ई-पाससाठी जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. अनेक अर्जांत किरकोळ कारणे होती; तर अनेकांच्या अर्जात त्रुटी होत्या. अनेकांच्या अर्जात फिरायला जाणे, असा उल्लेख असल्याने हे अर्ज रद्द करावे लागले. अत्यावश्यक कारण असलेल्या अर्जांनाच परवानगी दिली आहे. - प्रमोद शेवाळे, पोलीस अधीक्षक, नांदेड