शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
2
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
3
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
4
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
5
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
6
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
7
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
9
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
10
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
11
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
12
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
13
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
14
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
15
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
16
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
17
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
18
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
19
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
20
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?

कंटाळलेल्या मनाला झाली बाहेर जाण्याची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर मार्च, एप्रिल व मे महिन्यात सुरू होता. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आल्याने पोलीस अधीक्षक ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर मार्च, एप्रिल व मे महिन्यात सुरू होता. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयात ई-पाससाठी अर्जांची संख्या वाढली. त्यात उपचारासाठी तसेच काहींनी नातेवाईकांच्या भेटीचे कारण, तर कोणी सहलीवर जाण्यासाठी ई-पासची गरज असल्याचे सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन कार्यरत आहे. दुसऱ्या लाटेच्या काळात अनेकांना जिल्हाबाहेर प्रवास करायचा होता.

त्यासाठी ई-पास मिळावा, यासाठी नांदेड जिल्ह्यातील तब्बल २५ हजार जणांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे कर्ज दाखल केले आहेत. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे अनेकांनी पावसाळी पर्यटनासाठी नियोजन केले आहे. काही जिल्ह्यात मात्र अद्याप लॉकडाऊनच आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना ई-पासची गरज पडणार आहे.

टाळेबंदीने कंटाळलेल्या नागरिकांची धडपड

-मार्चपासून घरातच कोंडून पडलेल्या नागरिकांना आता बाहेर जाण्याची घाई झाली आहे. यासाठी अनेकांनी सहलीवर जाण्याचे नियोजन केले आहे. लॉकडाऊन काळात लग्न झालेल्या जोडप्यांनाही सहलीवर जायचे आहे. त्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे.

- अनेकांनी ई-पास अर्जात वैद्यकीय कारण दिले असून, जवळच्या नातेवाईकांचे लग्न, नातेवाईकांची भेट आदी कारणे दिली आहेत. मात्र किरकोळ कारणासाठी केलेले अर्ज रद्द करण्यात आले आहेत.

- लग्नानंतर फिरायला जाणे, नातेवाईकांच्या भेटीला जाणे, या कारणासोबतच मुलांच्या शैक्षणिक कामासाठी जात असल्याचेही कारणे अर्जात स्पष्ट केली आहेत. अनेकांनी कागदपत्रांची पूर्तताच केली नाही.

बहुतांश अर्जदारांचे वैद्यकीय कारण

- कोरोना काळात जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी अनेकांनी ई-पाससाठी आपले अर्ज दाखल केले होते. यातील अनेकांच्या अर्जात वैद्यकीय कारणांचा उल्लेख आढळला. विशेष म्हणजे नांदेडहून हैदराबादकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या होती. अनेकांनी वैद्यकीय उपचाराचे कारण पुढे केले. सर्वाधिक अर्ज वैद्यकीय कारणाचे आहेत; तर उर्वरित कारणात लग्न, अंत्यविधीचे कारण दिले आहे. आवश्यक कारणांनाच संबंधित कार्यालयाने मंजुरी दिली आहे.

अत्यावश्यक कारणासाठी ई-पास

- ई-पाससाठी जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. अनेक अर्जांत किरकोळ कारणे होती; तर अनेकांच्या अर्जात त्रुटी होत्या. अनेकांच्या अर्जात फिरायला जाणे, असा उल्लेख असल्याने हे अर्ज रद्द करावे लागले. अत्यावश्यक कारण असलेल्या अर्जांनाच परवानगी दिली आहे. - प्रमोद शेवाळे, पोलीस अधीक्षक, नांदेड