शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप जिल्ह्यात एकटे पडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:43 IST

नांदेड : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. राज्यात सर्वाधिक १ हजार १५ ...

नांदेड : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. राज्यात सर्वाधिक १ हजार १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नांदेड जिल्ह्यात होणार असल्याने प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरूवात केली आहे. महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेतल्यास निवडणुकीत भाजप एकटी पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक निवडणुकीत तीन पक्षाची मोटबांधायची कशी? याचे आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर असणार आहे. हे करताना बंडखोरी होण्याची शक्यता असून ती भाजपाच्या पथ्यावर पडू शकते. तूर्त तरी प्रमुख पक्षांनी गावनिहाय पॅनल उभारणीसाठी चाचपणी सुरू केली आहे.

या निवडणुकांसाठी २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र स्वीकारली जाणार आहे. त्यांची छाननी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ पासून होणार असून ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होऊन निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. १५ जानेवारी रोजी मतदान होऊन १८ रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. निवडणुकीसाठी अत्यल्प कालावधी राहिल्याने प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजपाने यासाठीचे नियोजन सुरू केले आहे. वंचित बहुजन आघाडीनेही आपले बळ असलेल्या भागातील ग्रामपंचायतीत पॅनल देण्यासाठी बैठकावर भर दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसातच निवडणुकीचे नेमके चित्र पुढे येईल. तूर्त तरी मोचर्चेबांधणीवर सर्वांचाच भर आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही कस लागणार आहे. आपापल्या मतदार संघातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती स्वत:च्या पक्षाकडे खेचण्याची रणनिती आमदारांकडून आखली जात आहे.