शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

भाजप सरकार फसवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:08 IST

राज्यासह देशातील बेरोजगारी, असहिष्णुता, महिलांवरील अत्याचार, शेतक-यांच्या प्रश्नासंदर्भात सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे सर्वसामान्यांच्या मनात अस्वस्थता आहे. पिण्याच्या पाण्याचे, उद्योग व शेतीच्या पाण्याचे भाव वाढविले. शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा फसवी निघाली, वीज कनेक्शन तोडणे, शेती सिंचनासाठी आवश्यक सामग्रीच्या किमतीत वाढ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकरी हा राज्याच्या, देशाचा कणा आहे. मात्र हे सरकार कणाच मोडायला निघाले आहे, असा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

ठळक मुद्दे अजित पवार यांचा घणाघातलोहा येथे हल्लाबोल मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कलोहा: राज्यासह देशातील बेरोजगारी, असहिष्णुता, महिलांवरील अत्याचार, शेतक-यांच्या प्रश्नासंदर्भात सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे सर्वसामान्यांच्या मनात अस्वस्थता आहे. पिण्याच्या पाण्याचे, उद्योग व शेतीच्या पाण्याचे भाव वाढविले. शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा फसवी निघाली, वीज कनेक्शन तोडणे, शेती सिंचनासाठी आवश्यक सामग्रीच्या किमतीत वाढ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकरी हा राज्याच्या, देशाचा कणा आहे. मात्र हे सरकार कणाच मोडायला निघाले आहे, असा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.लोहा येथील बैल बाजार मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शनिवारी हल्लाबोल मेळावा घेण्यात आला़ याप्रसंगी अजित पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. शंकरअण्णा धोंडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्ष प्रवक्ते नवाब मलीक, चित्राताई वाघ, कमलकिशोर कदम, संग्राम कोते, आ.सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, कल्पना पाटील डोंगळीकर, प्रांजली रावणगावकर, बसवराज पाटील, वसंत सुगावे, हरिहर भोसीकर, जिल्हाध्यक्ष डॉ़ सुनील कदम, दिलीप धोंडगे, संजय क-हाळे, बाबूराव केंद्रे, आदींची उपस्थिती होती.अजित पवार म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात लोहा-कंधार मतदारसंघात विविध धरणे, बॅरेजेस, तलावाला कुठलाही भेदभाव न ठेवता भरभरुन देण्यात आले़ पाण्यामुळे मराठवाडा सुजलाम् सुफलाम् होईल, नदीकाठची गावे हिरवीगार होऊन शेतकरी सुखी होईल. परंतु आजचे सरकार शेतकºयांचे वीज कनेक्शन तोडत आहे.शेतकºयांचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली तीही फसवी, साडेतीन वर्षांत एकाही बेरोजगाराला नोकरी दिली नाही. मागासवर्गीय, आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही. शाळा, महाविद्यालय बंद होत आहेत. मग गरिबांच्या मुलांनी शिक्षण कसे घ्यायचे? प्रारंभी शिवाजी चौक ते मेळावा मैदानापर्यंत रॅली काढण्यात आली. याप्रसंगी धनंजय मुंडे, चित्राताई वाघ, नवाब मलीक यांनी सरकारवर हल्लाबोल केला. माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांनी आपल्या खास शैलीतून स्थानिक आमदारावर चांगलेच तोंडसूख घेतले. यशस्वीतेसाठी डॉ. सुनील धोंडगे, विलास पाटील घोरबांड, दत्ता पाटील तळणीकर, माधव पाटील मोरे, संतोष पाटील दगडगावकर, मनोज पा. मोरे आदींनी सहकार्य केले.संविधान बचाव रॅलीमुळेच तिरंगा रॅली४जनतेचे प्रश्न सरकारसमोर मांडण्याचा आणि तो सोडविण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा अधिकार विरोधी पक्षाला असतो़ परंतु, विरोधी पक्षाने जाहीर केलेला कोणताही कार्यक्रम चिरडून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे़ येत्या २६ जानेवारीला सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येवून संविधान बचाव रॅली काढण्याचा निर्णय घेतला़ ही रॅली अयशस्वी करण्यासाठीच भाजपने तिरंगा रॅली काढण्याचे नियोजन केल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला़ सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात समाजातील कोणता घटक समाधानी आहे? असा सवालही त्यांनी केला़वाघाचा कासव झाला४बाळासाहेबानंतर आता शिवसेनेचा वाघ राहिला नाही तर तो शेळी झाला आहे़ नंतर तो ससा झाला, अन् आता तर कासव झाला. शिवसेनेत पूर्वीसारखी धमक राहिली नाही. शेपूट खाली घालून पळतो अशी अवस्था सेनेची झाल्याचे सांगत अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडले़