शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बँकेला कनेक्टिव्हीटी नसल्याने ग्राहक आल्यापावली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:15 IST

हदगाव : एसबीआय बँकेसमोर अनेक सेवानिवृत्त कर्मचारी सकाळी नऊ वाजल्यापासून रांगेत थांबले पण दुपारपर्यंत कनेक्टिव्हीटीच नसल्याने पदरमोड करीत परतावे ...

हदगाव : एसबीआय बँकेसमोर अनेक सेवानिवृत्त कर्मचारी सकाळी नऊ वाजल्यापासून रांगेत थांबले पण दुपारपर्यंत कनेक्टिव्हीटीच नसल्याने पदरमोड करीत परतावे लागले. बाजूला असलेल्या सेवाकेंद्रात दहा हजार रुपये काढण्यासाठी शंभर रुपये मोजावे लागत आहेत.

रविवारी सुट्टी झाल्याने सोमवारी पैसे काढणे भरण्यासाठी चांगला दिवस समजला जातो. ग्रामीण भागातील मनाठा, सावरगाव, बरडशेवाळा, पिंपरखेड, तळणी, कोहळी आदी गावातील सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या पाल्य किंवा पत्नीसह सकाळीच बँकेसमोर रांगेत पैसे काढण्यासाठी थांबले पण बँक सुरू होऊन लंच टाईम झाला तरी संगणक सुरुच झाले नाही. त्यामुळे गुरुजी मंडळी ग्रामसेवक वैतागून गेले होते. वयोमानाने अनेक व्याधींनी त्यांना ग्रासलेले त्यात कोरोनाची भीती पण पोट कसे थांबणार मग मिळणारे पेन्शन घेण्यासाठी ही मंडळी आज मोठ्या प्रमाणात बँकेसमोर उभी होती. ज्येष्ठ नागरिकांना बँकेत बसण्यासाठीही परवानगी नाही. पिण्याचे पाणी नाही.

काही ग्राहकांनी सेवा केंद्रात पैसे उचलण्याचा प्रयत्न केला. त्यांना दहा हजार रुपये काढण्यासाठी शंभर रुपयांची मागणी करण्यात आली. नाईलाजस्तव ते तयार झाले. पण त्यांचा अंगठा निशाण उमटत नसल्यामुळे त्यांना पैसे उचलता आले नाही. लंच टाईमपर्यंत मेकॅनिकल बोलावण्यात आले नव्हते. बँकेचे काही काम ढेपाळले की ते करण्यासाठी कनेक्टिव्हीटी नसल्याचे सांगून अंतर्गत कामे उरकून घेण्यात येत असतात असे एक व्यापारी म्हणाला.

अनेकांना महिन्याकाठी चार पाच हजारांचे औषधी खर्च करावा लागतो. आता उद्या भारत बंद असल्याने त्यांना एक दिवस पुन्हा थांबावे लागणार आहे. मी पत्नीसह सकाळी नऊ वाजता थंडीतच आलो. लवकर नंबर लागावा म्हणून पण येथे दिवसभर थांबूनही फायदा झाला नाही. खाली बसावे लागते. नाहीतर उभेच टाकायचे -शंकरराव नरवाडे (सेवानिवृत्त मु अ.) चुंचा

मला तीन बाॅल्केज आहेत. थोडीही वदवद जमत नाही. वय झाल्यामुळे चेकबुक दिले नाही. एटीएमपण नाही. दर महिन्याला यावे लागते -एस.एस.चौरे, मनाठा (सेवानिवृत्त मु अ.मनाठा)

वरुनच कनेक्टिव्हीटी नाही. आम्ही काय करणार? आता दुरुस्तीसाठी कारागीर बोलावले सुरू झाले की वाटप करु -चौधरी, शाखा अधिकारी एसबीआय हदगाव