शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंचलित हवामान केंद्र नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:33 IST

शेतक-यांना नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण मिळावे यासाठी शासनाने स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८० मंडळात हे हवामान केंद्र स्थापन करण्यात आले़ शेतक-यांचे होणारे नुकसान टाळता यावे व हवामानाची अचूक माहिती मिळावी, यादृृष्टीने हे केंद्र शेतक-यांसाठी आधार देणारे आहेत़ अवेळी पडणारा पाऊस, गारपीट तसेच वादळी वा-यामुळे शेतक-यांच्या तोंडचा घास निसर्ग हिरावून घेतो़ अशावेळी या केंद्राचा फारसा उपयोग होताना दिसत नाही़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील शेतक-यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा यासह वातावरणातील बदलामुळे होणारे शेतीचे संभाव्य नुकसान टाळता यावे, या उद्देशाने शासनाच्या वतीने स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८० महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आले आहेत. परंतु, या हवामान केंद्रांचा शेतक-यांना फारसा लाभ होताना दिसत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतक-यांतून ऐकावयास मिळत आहेत.दिवसेंदिवस सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहे. त्यामुळे अवेळी पडणारा पाऊस, गारपीट यासह अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान होत असल्याने शेतक-यांना अनेकवेळा आर्थिक फटका सहन करावा लागतो. शेतकºयांचे होणारे नुकसान टाळता यावे व हवामानाची अचूक माहिती मिळावी, यासाठी शासनाने स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील ९ महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र तयार करण्यात आले आहेत. तर मुदखेड-४, अर्धापूर-४, कंधार-६, लोहा-६, देगलूर-६, मुखेड तालुक्यात-७, बिलोली- ५, धर्माबाद-३, नायगाव- ५, किनवट तालुक्यात - ७, माहूर- ४, भोकर- ४, हिमायतनगर- ३, हदगाव- ७ तर उमरी तालुक्यातील ३ महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आली आहेत.एकीकडे प्रशासन स्वयंचलित हवामान केंद्राआधारे शेतकºयांना हवामानाचा अंदाज देणारी माहिती मोबाईलद्वारे दिली जात असल्याचा गवगवा करीत आहे. तर दुसरीकडे शेतकरी मात्र या केंद्रांबाबत अनभिज्ञ असल्याचे चित्र जिल्ह्यातील बहुतांश भागात दिसून येत आहे. विशेष म्हणजे, अनेक भागांतील शेतकºयांना त्यांच्याच गावातील स्वयंचलित हवामान केंद्राची माहिती नसल्याची बाब ‘लोकमत’ चमूने घेतलेल्या माहितीआधारे समोर आली आहे.४शेतकरी स्वयंचलित हवामान केंद्रांबाबत अनभिज्ञ असल्याचे चित्र जिल्ह्यातील बहुतांश भागात दिसून येत आहे. विशेष म्हणजे, अनेक भागांतील शेतकºयांना त्यांच्याच गावातील स्वयंचलित हवामान केंद्राची माहिती नसल्याची बाब ‘लोकमत’ चमूने घेतलेल्या माहितीआधारे समोर आली आहे.४ निसर्गाचा कोप झाला तर तोंडाशी आलेले पीक क्षणार्धात नष्ट होते़ त्याची नुकसान भरपाईसुद्धा पुरेशी मिळत नाही़हवामान यंत्र बनले शोभेची वस्तूबारुळ : बारुळ मंडळ महसूल अंतर्गत बारुळ (कॅम्प) येथे हवामान यंत्र बसवून एक वर्षाचा कालावधी होऊनही ते कार्यािन्वत न झाल्याने हे हवामान यंत्र एक शोभेची वस्तू बनले आहे़ बारुळ मंडळ महसूल ंतर्गत २० गावे आहेत़ त्यात कौठा, मंगलसांगवी, चिंचोली, वरवंट, काटकळंबा, हाळदा, चिखलीसह आदी गावे असून महसूल मंडळातंर्गत एकूूण क्षेत्र १३ हजार ४४ हेक्टर आहे़ या मंडळाअंतर्गत शेतकºयांच्या हितासाठी प्रशासनाने हवामान यंत्र बसविले; पण ते अजूनही सुरु झाले नाही़ त्यामुळे हे हवामान यंत्र एकप्रकारे शोभेची वस्तू बनले आहे़ त्यामुळे शेतक-यांना अनंत अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ पाऊस, अवकाळी वादळ वारे, गारपीट, विजा याचा अंदाज लागत नाही़ शेतक-यांचे आर्थिक व जीवितहानीचे प्रमाण वाढले आहे़ यंत्र बारुळ कॅम्प येथे बसविण्यात आले़ पण सद्य:स्थितीत ते सुरु झाले नाही़ त्यामुळे गैरसोय होत आहे. हे यंत्र मागीलवर्षी बसविण्यात आले होते़