शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

‘भिजलेल्या गोष्टींनी’ प्रेक्षकही भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:08 IST

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी चुरशीची होत आहे. गुरूवारी ‘भिजलेल्या गोष्टी’ आणि ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ ही नाटके सादर झाली. या दोन्ही नाटकांना उपस्थिती प्रेक्षकांतून जोरदार प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे विनोदी पठडीतील ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ हे नाटक पाहतांना प्रेक्षकांतून हास्य व टाळ्यांचा कडकडाट सुरू होता.

ठळक मुद्देहौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा: श्रद्धांजलीलाही प्रेक्षकांतून हास्याचे फवारे

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी चुरशीची होत आहे. गुरूवारी ‘भिजलेल्या गोष्टी’ आणि ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ ही नाटके सादर झाली. या दोन्ही नाटकांना उपस्थिती प्रेक्षकांतून जोरदार प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे विनोदी पठडीतील ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ हे नाटक पाहतांना प्रेक्षकांतून हास्य व टाळ्यांचा कडकडाट सुरू होता.शहरातील कुसूम सभागृहात गुरूवारी मयूर निमकर लिखीत ‘भिजलेल्या गोष्टी’ हे नाटक सादर झाले. नवराम दर्शन को.आॅ. हौ.सो. डोंबिवली यांनी सादर केलेल्या या नाटकाने दोन व्यक्तीमधील सामाजिक दरी यावर भाष्य केले. एखाद्या आपण कोणाच्या तरी सांगण्यावरून वाईट ठरवितो. वस्तुत: आपण स्वत:च्या अनुभवानंतर एखाद्या व्यक्तीबाबतचे मत ठरविले पाहिजे. परंतु, असे होत नसल्याने आपण माणूस ओळखू शकत नाही. हिच बाब ‘भिजलेल्या गोष्टींनी’ अधोरेखीत केली. या नाटकात लेखकाने तीन कथानकांचा आधार घेवून वरील मुद्दा प्रभावीपणे मांडला आहे. विशेष म्हणजे नाटकातील तीनही कथानकात दोन व्यक्तीतील दरी संपविण्यासाठी पाऊस धावून आल्याचे दिसते. बाहेर जोराचा पाऊस सुरू असताना कार्यालयात अडकलेली स्त्री आणि तिचा बॉस यांच्या संवाद होतो आणि त्या दोघांतील गैरसमज दूर होतात. दुसरे कथानकही अशाच पद्धतीचे पावसामुळे रेल्वेस्टेशनवर थांबलेल्या युवकास कधीकाळी त्याची प्रेमिका असलेल्या युवतीची भेट होते. दोघे एकमेकांवर प्रेम करीत होते. मात्र, तिचे लग्न दुसºयाशी झाले. त्यानंतर दोघांचीही मने एकमेकांविषयी दुषित झाली. मात्र पावसाच्या निमित्ताने का होईना, दोघांत संवाद घडतो. आणि ते एकमेकांना समजून घेतात. तिसरे कथानकही असेच पावसात घडते, या भिजलेल्या गोष्टी जीवंत करण्याचे काम तीन व्यक्तीरेखा साकारणाºया मयूर निमकरने ताकतीने केले. त्याला तेजल पोतदार, समीर जडे, स्वप्नील माळवदे, अंकूर निमकर, शेखर नंद, रेश्मा कदम यांचीही साथ लाभली.जिवंत व्यक्ती नव्हे तर मोबाईलच झालाय मित्रशंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात बुधवारी रात्री सादर झालेल्या ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मोबाईलच्या आहारी गेलेला मानव जीवंत व्यक्तींना नव्हे, तर यंत्र असलेल्या मोबाईलला आपला खरा मित्र मानू लागला आहे. त्यामुळेच तो वास्तव जगापासूनही दूर जात असल्याचे या नाटकातून अत्यंत विनोदी पद्धतीने सादर करण्यात आले. विशेषत: वनिता खरात यांनी साकारलेले कोकरा काकू ही भूमिका लक्षवेधी ठरली. या काकू व्यासपिठावर आल्यानंतर हास्याची लकेर उमटत होती. दिपेश ठाकरे, वैष्णवी अंबवणे, आतिश मोरे, संकेत खेडेकर, स्वप्नील पाथरे, विकास मोटे, तुषार दळवी, किरण फडतरे, सिद्धेश माने, तेजस बोराडे, अमृता मोडक, सागर पवार, विपूल काळे, विक्रांत गबरे, सिद्धेश चव्हाण, सिद्धांत महाडीकर यांनीही यात भूमिका साकारल्या.