शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे ड्रोनने हल्ले; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
3
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
4
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
5
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
7
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
8
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
9
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
10
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
11
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
13
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
14
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
15
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
16
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
17
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
18
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
19
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
20
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."

‘भिजलेल्या गोष्टींनी’ प्रेक्षकही भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:08 IST

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी चुरशीची होत आहे. गुरूवारी ‘भिजलेल्या गोष्टी’ आणि ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ ही नाटके सादर झाली. या दोन्ही नाटकांना उपस्थिती प्रेक्षकांतून जोरदार प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे विनोदी पठडीतील ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ हे नाटक पाहतांना प्रेक्षकांतून हास्य व टाळ्यांचा कडकडाट सुरू होता.

ठळक मुद्देहौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा: श्रद्धांजलीलाही प्रेक्षकांतून हास्याचे फवारे

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी चुरशीची होत आहे. गुरूवारी ‘भिजलेल्या गोष्टी’ आणि ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ ही नाटके सादर झाली. या दोन्ही नाटकांना उपस्थिती प्रेक्षकांतून जोरदार प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे विनोदी पठडीतील ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ हे नाटक पाहतांना प्रेक्षकांतून हास्य व टाळ्यांचा कडकडाट सुरू होता.शहरातील कुसूम सभागृहात गुरूवारी मयूर निमकर लिखीत ‘भिजलेल्या गोष्टी’ हे नाटक सादर झाले. नवराम दर्शन को.आॅ. हौ.सो. डोंबिवली यांनी सादर केलेल्या या नाटकाने दोन व्यक्तीमधील सामाजिक दरी यावर भाष्य केले. एखाद्या आपण कोणाच्या तरी सांगण्यावरून वाईट ठरवितो. वस्तुत: आपण स्वत:च्या अनुभवानंतर एखाद्या व्यक्तीबाबतचे मत ठरविले पाहिजे. परंतु, असे होत नसल्याने आपण माणूस ओळखू शकत नाही. हिच बाब ‘भिजलेल्या गोष्टींनी’ अधोरेखीत केली. या नाटकात लेखकाने तीन कथानकांचा आधार घेवून वरील मुद्दा प्रभावीपणे मांडला आहे. विशेष म्हणजे नाटकातील तीनही कथानकात दोन व्यक्तीतील दरी संपविण्यासाठी पाऊस धावून आल्याचे दिसते. बाहेर जोराचा पाऊस सुरू असताना कार्यालयात अडकलेली स्त्री आणि तिचा बॉस यांच्या संवाद होतो आणि त्या दोघांतील गैरसमज दूर होतात. दुसरे कथानकही अशाच पद्धतीचे पावसामुळे रेल्वेस्टेशनवर थांबलेल्या युवकास कधीकाळी त्याची प्रेमिका असलेल्या युवतीची भेट होते. दोघे एकमेकांवर प्रेम करीत होते. मात्र, तिचे लग्न दुसºयाशी झाले. त्यानंतर दोघांचीही मने एकमेकांविषयी दुषित झाली. मात्र पावसाच्या निमित्ताने का होईना, दोघांत संवाद घडतो. आणि ते एकमेकांना समजून घेतात. तिसरे कथानकही असेच पावसात घडते, या भिजलेल्या गोष्टी जीवंत करण्याचे काम तीन व्यक्तीरेखा साकारणाºया मयूर निमकरने ताकतीने केले. त्याला तेजल पोतदार, समीर जडे, स्वप्नील माळवदे, अंकूर निमकर, शेखर नंद, रेश्मा कदम यांचीही साथ लाभली.जिवंत व्यक्ती नव्हे तर मोबाईलच झालाय मित्रशंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात बुधवारी रात्री सादर झालेल्या ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मोबाईलच्या आहारी गेलेला मानव जीवंत व्यक्तींना नव्हे, तर यंत्र असलेल्या मोबाईलला आपला खरा मित्र मानू लागला आहे. त्यामुळेच तो वास्तव जगापासूनही दूर जात असल्याचे या नाटकातून अत्यंत विनोदी पद्धतीने सादर करण्यात आले. विशेषत: वनिता खरात यांनी साकारलेले कोकरा काकू ही भूमिका लक्षवेधी ठरली. या काकू व्यासपिठावर आल्यानंतर हास्याची लकेर उमटत होती. दिपेश ठाकरे, वैष्णवी अंबवणे, आतिश मोरे, संकेत खेडेकर, स्वप्नील पाथरे, विकास मोटे, तुषार दळवी, किरण फडतरे, सिद्धेश माने, तेजस बोराडे, अमृता मोडक, सागर पवार, विपूल काळे, विक्रांत गबरे, सिद्धेश चव्हाण, सिद्धांत महाडीकर यांनीही यात भूमिका साकारल्या.