शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

ग्रामविकास व जिल्हाधिका-यांच्या आदेशाने इच्छूक सरपंच चांगलेच संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:43 IST

बिलोली - ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची लगीनघाई सुरु असतानाचा १५ डिसेंबर रोजी सरपंच आरक्षण रद्द करण्यात आल्याचे ग्रामविकास विभागाचे पञ सोशलमिडीयावर ...

बिलोली - ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची लगीनघाई सुरु असतानाचा १५ डिसेंबर रोजी सरपंच आरक्षण रद्द करण्यात आल्याचे ग्रामविकास विभागाचे पञ सोशलमिडीयावर धडकले तर १६ रोजी जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण कायम राहणार असल्याची माहीती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिल्याने सरपंचपदासाठी इच्छूक असणारे उमेदवार चांगलेच संभ्रमात पडले आहेत.

बिलोली पंचायत समिती सभागृहात प्रशासनाच्यावतीने गत १५ दिवसांअगोदर ७३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत झाली होती,त्यातच ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरु झाल्याने इच्छूकांनी कागदपञांसह उमेदवारांची फिल्डींग लावण्यास सुरुवात केली होती परंतु ग्रामविकास खात्याने सरपंचपद आरक्षण रद्द केल्याने पॕनलप्रमुखांसह इच्छूकांना धक्काच बसला होता तर जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण कायम राहण्याचा फर्माण सोडल्याने सर्वञ चांगलीच धांदळ उडाली.त्यामुळे नेमके कोणाचे खरे? असा प्रश्न ग्रामीण भागात ऐकावयास येत आहे.ग्रामपंचायत निवडणुका ह्या अवघ्या २८ दिवसांवर येवुन ठेपल्या असुन आता राजकीय पक्षप्रमुख,पॕनवाप्रमुखांसह सर्वच इच्छूक उमेदवारांना देव पाण्यात ठेवुन निवडणुक लढवावी लागणार आहे.अगोदर कोरोना महामारीमुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबल्या होत्या,त्यातच कसेबसे बिलोली तालुक्यातील ७३ ग्रामपंचायती पैकी प्रशासक लागु करण्यात आलेल्या ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरु झाल्याने सेतु-सुविधा केंद्रावर पॕनलप्रमुख कागदांची जुळवा-जुळव करण्यात व्यस्त आहेत.सध्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका ह्या संभाव्य सरपंच कोण असणार,हे कोणालाच माहीती नसता निवडणुका लढाव्यात कशा? व निवडणुकीनंतर आरक्षण म्हणजे ''''''''वरातीमागुन घोडे'''''''' असाच प्रकार असल्याची प्रतिक्रीया राजकीय पुढाऱ्यांनी व्यक्त केली आहे.