शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

ऐतिहासिक मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीस नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न करणार -अशोकराव चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:24 IST

शहरातील व्यंकटेशनगर भागातील मराठवाडा खादी ग्रामोद्योग कार्यालयास सोमवार, १६ ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली ...

शहरातील व्यंकटेशनगर भागातील मराठवाडा खादी ग्रामोद्योग कार्यालयास सोमवार, १६ ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी मराठवाडा खादी ग्रामोद्योगाचे ईश्‍वरराव भोसीकर, हंसराज वैद्य, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर, काँग्रेसचे प्रवक्ता संतोष पांडागळे आदी उपस्थितीत होते.

यावेळी मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे ईश्‍वरराव भोसीकर यांनी राष्ट्रध्वज निर्मिती केंद्रात तयार होणारा तिरंगा ध्वज देशातील १६ राज्यांत पाठविण्यात येत असल्याचे सांगितले. या समवेतच मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या अन्य प्रश्‍नांकडेही लक्ष वेधले.

याप्रसंगी पालकमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले, यंदाचे वर्ष देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. या वर्षाच्या निमित्ताने ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे पुनर्जीवितासाठी राज्य शासनाकडून मदत करण्यात येईल. या संस्थेतील बंद पडलेले उपक्रम सुरू करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने संपूर्ण मदत मिळवून देण्याचा शब्द दिला. या वास्तूचे जुने रूप कायम ठेवून इमारतींना बळकटी देण्यासंदर्भात कायम करता येईल याबाबतचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा, असे निर्देश ना. चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.