शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

बाहेतीच्या अटकेने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:13 IST

तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यावर अजय बाहेती यांनी कंपनीत पुन्हा उत्पादन सुरू केले होते. त्यासाठी शेतकऱ्यांकडून तीन महिन्यांच्या मुदतीवर हळद, ...

तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यावर अजय बाहेती यांनी कंपनीत पुन्हा उत्पादन सुरू केले होते. त्यासाठी शेतकऱ्यांकडून तीन महिन्यांच्या मुदतीवर हळद, सोयाबीन, तूर असे धान्य विकत घेतले होते. परंतु सहा महिन्यांनंतरही शेतकऱ्यांना त्यांचे पैसे न मिळाल्याने कंपनीच्या समोर शेतकऱ्यांनी आंदोलन सुुरू केले होते. जवळपास आठशे शेतकऱ्यांचे १८ ते २० कोटी रुपये देणे असल्याचे बाहेती यांनी लिहून दिले होते. तसेच काही शेतकऱ्यांना रक्कम देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच येत्या काही दिवसांत पूर्ण शेतकऱ्यांची रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु असे असताना अचानक ईडीने या प्रकरणात एन्ट्री मारत बाहेतीला अटक केली. त्यामुळे आता थकीत असलेले पैसे मिळणार की नाहीत, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. थकीत रकमेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे कंपनीच्या बाहेर आंदोलन सुरू आहे. आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांनी कंपनीच्या विरोधात तर काही जणांनी कंपनीच्या बाजूने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते, परंतु आता ईडीच्या कारवाईमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सरकार आणि कंपनीसोबत लढा

गेल्या सहा महिन्यांपासून ८०० हून अधिक शेतकऱ्यांचे जवळपास शंभर कोटीहून अधिक पैसे थकले आहेत. बाहेती हा आकडा १८ ते २० कोटी सांगत आहेत. पैसे मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेकांच्या घरातील लग्नसोहळे पुढे ढकलले आहेत. आता आम्ही मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांना निवेदन दिले आहे. केंद्रीय कृषिमंत्री यांचीही भेट घेणार आहोत. अशी प्रतिक्रिया इंडिया मेगा ॲग्रो अनाज कंपनी अन्यायग्रस्त समितीचे समन्वयक डॉ. सुरेश कदम यांनी दिली.