शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

अर्जापूर पाणी योजनेचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:53 IST

राज्य शासनाच्या जलस्वराज्य प्रकल्प - २ अंतर्गत अर्जापूर या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिगत विहीर व जलकुंभ बांधकामास प्रारंभ झाला़ काम युद्धपातळीवर सुरू असल्याने आॅक्टोबरअखेर गावाला शुद्ध पाणीपुरवठा होईल, असा अंदाज आहे़ दरम्यान, राज्यात राबविणाºया अद्ययावत सुधारित पाणीपुरवठा प्रकल्पासाठी जागतिक बँकेने पाच कोटींचे अर्थसहाय्य दिलेले आहे़

ठळक मुद्देबिलोली : जागतिक बँकेकडून ५ कोटींचे अर्थसहाय्य, आॅक्टोबरअखेर शुद्ध पाणीपुरवठा

राजेश गंगमवार।लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : राज्य शासनाच्या जलस्वराज्य प्रकल्प - २ अंतर्गत अर्जापूर या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिगत विहीर व जलकुंभ बांधकामास प्रारंभ झाला़ काम युद्धपातळीवर सुरू असल्याने आॅक्टोबरअखेर गावाला शुद्ध पाणीपुरवठा होईल, असा अंदाज आहे़ दरम्यान, राज्यात राबविणाºया अद्ययावत सुधारित पाणीपुरवठा प्रकल्पासाठी जागतिक बँकेने पाच कोटींचे अर्थसहाय्य दिलेले आहे़राज्य शासनाने जलस्वराज्य-२ या योजनेत तालुक्यातील अर्जापूर व सगरोळीचा समावेश केला़ पाच व सात कोटी खर्च होणाºया योजनेअंतर्गत संपूर्ण नियंत्रण संगणक पद्धतीने होणार आहे़ ग्रामपंचायत कार्यालयात बसूनच नदीपात्रातील मोटार रिमोट कंट्रोलद्वारे बंद-चालू करता येणार आहे़ गावातील नळधारकांना मीटरद्वारे पाणी रिडींग घेतले जाणार आहे़ प्रतिलिटर एक पैसा याप्रमाणे नाममात्र दर आकारला जाईल़ भूमिगत विहिरीसाठी सौर सोलार यंत्रणा अवलंबल्याने वीजपुरवठा खंडित अथवा भारनियमनाची समस्या राहणार नाही़ त्याचप्रमाणे जलकुंभ भरल्याबरोबर संगणकावर सूचना मिळेल़ तसेच २४ तास शुद्ध फिल्टर पाण्याचा पुरवठा होईल़ संपूर्ण अद्ययावत जागतिक पातळीवर तपासणी केलेली आॅटोमॅटीक यंत्रणा अवलंबण्यात येणार आहे़ सोलार ऊर्जा पद्धतीने वीजपुरवठा असल्याने वीजबिलाचा आर्थिक भार ग्रा़ पं़ ला़ बसणार नाही़ प्रारंभी एक वर्ष चाचणी पद्धतीवर ठेकेदार यंत्रणा चालवतील तद्नंतर ग्रा़पंक़डे सोपवण्यात येईल़शैक्षणिक सुविधा असलेल्या याच अर्जापूरची ओळख विविध उपक्रम राबवित असल्याने चर्चेतील गाव आहे़ दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर येथे मसनजोगी समाजाची उपेक्षित महिला सरपंच झाली़संपूर्ण राज्यातून मसनजोगी या भटक्या समाजाची एकमेव महिला सरपंच झाल्याची नोंद शासनदरबारी झाली़ आता जलस्वराज्य-२ ही अद्ययावत पाणीपुरवठा योजना अर्जापूरला होत आहे़ पाच कोटी खर्च होत असलेल्या योजनेअंतर्गत माचनूरच्या मांजरा नदीपात्रात भूमिगत विहिरीचे काम त्यापाठोपाठ २ लाख लिटर क्षमता असलेल्या जलकुंभाचेही बांधकाम सुरू झाले़ आगामी आॅक्टोबरअखेर काम पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त केला जातो़