शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

अर्जापूर पाणी योजनेचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:53 IST

राज्य शासनाच्या जलस्वराज्य प्रकल्प - २ अंतर्गत अर्जापूर या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिगत विहीर व जलकुंभ बांधकामास प्रारंभ झाला़ काम युद्धपातळीवर सुरू असल्याने आॅक्टोबरअखेर गावाला शुद्ध पाणीपुरवठा होईल, असा अंदाज आहे़ दरम्यान, राज्यात राबविणाºया अद्ययावत सुधारित पाणीपुरवठा प्रकल्पासाठी जागतिक बँकेने पाच कोटींचे अर्थसहाय्य दिलेले आहे़

ठळक मुद्देबिलोली : जागतिक बँकेकडून ५ कोटींचे अर्थसहाय्य, आॅक्टोबरअखेर शुद्ध पाणीपुरवठा

राजेश गंगमवार।लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : राज्य शासनाच्या जलस्वराज्य प्रकल्प - २ अंतर्गत अर्जापूर या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिगत विहीर व जलकुंभ बांधकामास प्रारंभ झाला़ काम युद्धपातळीवर सुरू असल्याने आॅक्टोबरअखेर गावाला शुद्ध पाणीपुरवठा होईल, असा अंदाज आहे़ दरम्यान, राज्यात राबविणाºया अद्ययावत सुधारित पाणीपुरवठा प्रकल्पासाठी जागतिक बँकेने पाच कोटींचे अर्थसहाय्य दिलेले आहे़राज्य शासनाने जलस्वराज्य-२ या योजनेत तालुक्यातील अर्जापूर व सगरोळीचा समावेश केला़ पाच व सात कोटी खर्च होणाºया योजनेअंतर्गत संपूर्ण नियंत्रण संगणक पद्धतीने होणार आहे़ ग्रामपंचायत कार्यालयात बसूनच नदीपात्रातील मोटार रिमोट कंट्रोलद्वारे बंद-चालू करता येणार आहे़ गावातील नळधारकांना मीटरद्वारे पाणी रिडींग घेतले जाणार आहे़ प्रतिलिटर एक पैसा याप्रमाणे नाममात्र दर आकारला जाईल़ भूमिगत विहिरीसाठी सौर सोलार यंत्रणा अवलंबल्याने वीजपुरवठा खंडित अथवा भारनियमनाची समस्या राहणार नाही़ त्याचप्रमाणे जलकुंभ भरल्याबरोबर संगणकावर सूचना मिळेल़ तसेच २४ तास शुद्ध फिल्टर पाण्याचा पुरवठा होईल़ संपूर्ण अद्ययावत जागतिक पातळीवर तपासणी केलेली आॅटोमॅटीक यंत्रणा अवलंबण्यात येणार आहे़ सोलार ऊर्जा पद्धतीने वीजपुरवठा असल्याने वीजबिलाचा आर्थिक भार ग्रा़ पं़ ला़ बसणार नाही़ प्रारंभी एक वर्ष चाचणी पद्धतीवर ठेकेदार यंत्रणा चालवतील तद्नंतर ग्रा़पंक़डे सोपवण्यात येईल़शैक्षणिक सुविधा असलेल्या याच अर्जापूरची ओळख विविध उपक्रम राबवित असल्याने चर्चेतील गाव आहे़ दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर येथे मसनजोगी समाजाची उपेक्षित महिला सरपंच झाली़संपूर्ण राज्यातून मसनजोगी या भटक्या समाजाची एकमेव महिला सरपंच झाल्याची नोंद शासनदरबारी झाली़ आता जलस्वराज्य-२ ही अद्ययावत पाणीपुरवठा योजना अर्जापूरला होत आहे़ पाच कोटी खर्च होत असलेल्या योजनेअंतर्गत माचनूरच्या मांजरा नदीपात्रात भूमिगत विहिरीचे काम त्यापाठोपाठ २ लाख लिटर क्षमता असलेल्या जलकुंभाचेही बांधकाम सुरू झाले़ आगामी आॅक्टोबरअखेर काम पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त केला जातो़