शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

अर्जापूर पाणी योजनेचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:53 IST

राज्य शासनाच्या जलस्वराज्य प्रकल्प - २ अंतर्गत अर्जापूर या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिगत विहीर व जलकुंभ बांधकामास प्रारंभ झाला़ काम युद्धपातळीवर सुरू असल्याने आॅक्टोबरअखेर गावाला शुद्ध पाणीपुरवठा होईल, असा अंदाज आहे़ दरम्यान, राज्यात राबविणाºया अद्ययावत सुधारित पाणीपुरवठा प्रकल्पासाठी जागतिक बँकेने पाच कोटींचे अर्थसहाय्य दिलेले आहे़

ठळक मुद्देबिलोली : जागतिक बँकेकडून ५ कोटींचे अर्थसहाय्य, आॅक्टोबरअखेर शुद्ध पाणीपुरवठा

राजेश गंगमवार।लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : राज्य शासनाच्या जलस्वराज्य प्रकल्प - २ अंतर्गत अर्जापूर या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिगत विहीर व जलकुंभ बांधकामास प्रारंभ झाला़ काम युद्धपातळीवर सुरू असल्याने आॅक्टोबरअखेर गावाला शुद्ध पाणीपुरवठा होईल, असा अंदाज आहे़ दरम्यान, राज्यात राबविणाºया अद्ययावत सुधारित पाणीपुरवठा प्रकल्पासाठी जागतिक बँकेने पाच कोटींचे अर्थसहाय्य दिलेले आहे़राज्य शासनाने जलस्वराज्य-२ या योजनेत तालुक्यातील अर्जापूर व सगरोळीचा समावेश केला़ पाच व सात कोटी खर्च होणाºया योजनेअंतर्गत संपूर्ण नियंत्रण संगणक पद्धतीने होणार आहे़ ग्रामपंचायत कार्यालयात बसूनच नदीपात्रातील मोटार रिमोट कंट्रोलद्वारे बंद-चालू करता येणार आहे़ गावातील नळधारकांना मीटरद्वारे पाणी रिडींग घेतले जाणार आहे़ प्रतिलिटर एक पैसा याप्रमाणे नाममात्र दर आकारला जाईल़ भूमिगत विहिरीसाठी सौर सोलार यंत्रणा अवलंबल्याने वीजपुरवठा खंडित अथवा भारनियमनाची समस्या राहणार नाही़ त्याचप्रमाणे जलकुंभ भरल्याबरोबर संगणकावर सूचना मिळेल़ तसेच २४ तास शुद्ध फिल्टर पाण्याचा पुरवठा होईल़ संपूर्ण अद्ययावत जागतिक पातळीवर तपासणी केलेली आॅटोमॅटीक यंत्रणा अवलंबण्यात येणार आहे़ सोलार ऊर्जा पद्धतीने वीजपुरवठा असल्याने वीजबिलाचा आर्थिक भार ग्रा़ पं़ ला़ बसणार नाही़ प्रारंभी एक वर्ष चाचणी पद्धतीवर ठेकेदार यंत्रणा चालवतील तद्नंतर ग्रा़पंक़डे सोपवण्यात येईल़शैक्षणिक सुविधा असलेल्या याच अर्जापूरची ओळख विविध उपक्रम राबवित असल्याने चर्चेतील गाव आहे़ दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर येथे मसनजोगी समाजाची उपेक्षित महिला सरपंच झाली़संपूर्ण राज्यातून मसनजोगी या भटक्या समाजाची एकमेव महिला सरपंच झाल्याची नोंद शासनदरबारी झाली़ आता जलस्वराज्य-२ ही अद्ययावत पाणीपुरवठा योजना अर्जापूरला होत आहे़ पाच कोटी खर्च होत असलेल्या योजनेअंतर्गत माचनूरच्या मांजरा नदीपात्रात भूमिगत विहिरीचे काम त्यापाठोपाठ २ लाख लिटर क्षमता असलेल्या जलकुंभाचेही बांधकाम सुरू झाले़ आगामी आॅक्टोबरअखेर काम पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त केला जातो़