शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

रस्ते खोदणाऱ्यांना बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:59 IST

विविध प्राधिकरण, संस्था, कंपन्यांकडून रस्ते खोदण्यासाठी परवानगी घेतली जाते़ मात्र संबंधितांचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेले रस्ते तसेच दिसतात़ याचा त्रास संबंधित भागातील रहिवाशांना भोगावा लागतो़ मात्र या प्रकारास आता आळा बसणार आहे़ राज्याच्या नगरविकास विभागाने महानगरपालिकांसह नगरपरिषदांना या परवानगीबाबत कार्यपद्धती अवलंबविण्यास सांगितले असून, रस्ते खोदण्याची, पुनर्बांधणी तसेच दुरुस्तीची परवानगी घेणा-याचे नाव, पत्त्यासह संपर्क क्रमांकाचा फलक कामाच्या ठिकाणी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत़

ठळक मुद्देनगरविकास विभागाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विविध प्राधिकरण, संस्था, कंपन्यांकडून रस्ते खोदण्यासाठी परवानगी घेतली जाते़ मात्र संबंधितांचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेले रस्ते तसेच दिसतात़ याचा त्रास संबंधित भागातील रहिवाशांना भोगावा लागतो़ मात्र या प्रकारास आता आळा बसणार आहे़ राज्याच्या नगरविकास विभागाने महानगरपालिकांसह नगरपरिषदांना या परवानगीबाबत कार्यपद्धती अवलंबविण्यास सांगितले असून, रस्ते खोदण्याची, पुनर्बांधणी तसेच दुरुस्तीची परवानगी घेणा-याचे नाव, पत्त्यासह संपर्क क्रमांकाचा फलक कामाच्या ठिकाणी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत़स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अखत्यारित येणाºया रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती तसेच सदर रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थाची आहे़ मात्र रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नसल्याचे तसेच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाल्याबाबतच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येतात़ या अनुषंगानेच रस्ते दुरुस्तीच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करुन रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थाना नव्याने निर्देश दिले आहेत़ यानुसार रस्ते खोदण्यासाठी एखादी संस्था, कंपनी अथवा प्राधिकरणास परवानगी देताना काम करणाºया अभिदात्याचे नाव, पत्ता व संपर्कावरचा तपशील, खोदकामास दिलेल्या परवानगीची व्याप्ती, काम पूर्ण करण्याचा अंदाजित कालावधी, याबरोबराच कामानंतर कोठून कोठपर्यंत रस्ते पूर्ववत करण्याबाबत येतील़ याबाबतचा तपशील असलेला फलक कामाच्या ठिकाणी लावणे बंधनकारक करण्यास सांगण्यात आले आहे़नागरिकांना त्यांचे गाºहाणे, तक्रारी मांडण्यासाठी वर्षभरासाठीची सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थाची आहे़ त्यामुळे संकेतस्थळाबरोबरच नागरिकांना भ्रमणध्वनीद्वारे तक्रारी करता येतील़ या अनुषंगाने व्यवस्था उभारावी़ या तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या कार्यवाहीचा अंतिम अहवाल अथवा माहिती छायाचित्रासह तक्रार प्राप्त झाल्यापासून तीन आठवड्यांत तक्रारदारास मिळण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात यावी, असे निर्देशही नगरविकास विभागाने दिले आहेत़मल्लनि:स्सारण वाहिन्या पुरेशा संरक्षणाशिवाय उघड्या ठेवू नयेत, वाहिन्या उघड्या असल्यास त्या नागरिकांच्या निदर्शनास याव्यात यासाठीची उपाययोजनाही संबंधित यंत्रणांनी करावी, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे़नादुरुस्त रस्ते आणि खड्ड्यांचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे़ अनेकवेळा स्थानिक स्वराज्य संस्था याबाबतच टोलवाटोलवी करीत असल्याचे दिसते़ मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य शासनाच्या नगरविकास विभागानेही हा प्रश्न अधिक गांभीर्याने घेतल्याचे दिसून येते़ त्यामुळेच या विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थाना नव्याने कार्यपद्धतीबाबतचे दिशानिर्देश दिले असून याची अंमलबजावणी झाल्यास शहरी भागातील रस्ते प्रश्नाबाबत काहीसा दिलासा मिळू शकतो़त्रैमासिक अहवाल सादर करण्याच्याही सूचनामहानगरपालिकेसह नगरपरिषद आणि नगरपंचायतींना रस्त्यावरील खड्ड्याबाबत व दुरुस्तीबाबत नगरविकास विभागाने नव्याने सूचना केल्या आहेत़ या सूचनांच्या अनुषंगाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कार्यवाहीचा तसेच तक्रारींबाबतचा त्रैैमासिक अहवाल आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन यांना पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ स्थानिक स्वराज्य संस्थानी पाठविलेल्या या त्रैैमासिक अहवालाला एकत्रित करुन शासनाच्या वतीने उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे़ त्यामुळे नगरविकास विभागाने दिलेल्या निर्देशाचे पालन आता स्थानिक स्वराज्य संस्थाना करावे लागणार आहे़ या सूचनांचे पालन झाल्यास शहरी भागातील नागरिकांना रस्त्यासंबंधीच्या प्रश्नांवर दिलासा मिळेल़

टॅग्स :Nandedनांदेडroad transportरस्ते वाहतूक