शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नांदेडात बेपर्वाईचा आणखी एक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:11 IST

शहरात जडवाहतुकीला बंदी असताना बिनदिक्कतपणे दाखल झालेल्या एका ट्रकच्या धडकेने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी देगलूरनाका येथे घडली. बेपर्वाईचा आणखी एक बळी या भागात गेला आहे.

ठळक मुद्देदेगलूरनाका : दिवसाही बिनदिक्कतपणे जड वाहतुकीची ये-जा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरात जडवाहतुकीला बंदी असताना बिनदिक्कतपणे दाखल झालेल्या एका ट्रकच्या धडकेने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी देगलूरनाका येथे घडली. बेपर्वाईचा आणखी एक बळी या भागात गेला आहे.जुन्या नांदेडातील देगलूरनाका हा नेहमीच वर्दळीचा भाग आहे. शहराबाहेर जाण्यासाठी आणि शहरात येण्यासाठी जुन्या पुलावरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. त्यामध्ये जडवाहनांचाही समावेश आहे. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वाजेगाव येथील श्याम जळबा मनवर हे वाजेगावहून एम.एच.२६ बीएफ-८०५३ या क्रमांकाच्या दुचाकीवरुन बाफना टी पॉइंटकडे जात होते. त्यावेळी देगलूर नाका परिसरातील टायरबोर्डजवळ एम.एच.२६ एच-५७४५ या क्रमांकाच्या ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या श्याम मनवर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी देगलूरनाका भागात रास्ता रोको केला. जवळपास एक तास चाललेल्या या रास्ता रोकोमध्ये पोलिस प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून या भागातील जड वाहतूक बंद करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. मात्र त्याकडे दूर्लक्षच होत आहे. हीच बाब संतप्त नागरिकांनी यावेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. रास्ता रोकोमध्ये युवकांसह मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. संतप्त नागरिकांना आवरण्यासाठी इतवारा तसेच नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले. नागरिकांची समजूत काढून त्यांनी वाहतूक सुरळीत केली. जवळपास तासभर चाललेल्या या आंदोलनात देगलूरनाका भागातील युवकांचा सहभाग होता़राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष शेख रऊफ जमीनदार यांनी ३० जानेवारी रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून शहरामध्ये दाखल होणा-या जडवाहनांवर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. देगलूरनाका येथील वाहतूककोंडीचा उल्लेख त्यांनी केला होता. मात्र त्या निवेदनाकडे दूर्लक्ष करण्यात आले.देगलूरनाका भागात यापूर्वीही जडवाहतुकीचे अनेक बळी गेले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात ट्रकची ये-जा होते. दिवसा होणारी ये-जा रोखण्याची गरज असताना पोलिसांकडून मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्षच केले जाते. परिणामी निष्पापांचे बळी जात आहेत. हे बळी कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे़दरम्यान, घटनेप्रकरणी संजय जळबा मनवर यांनी दिलेल्या तक्रारीअधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात आरोपी ट्रक चालक अमृत मोटरगे याच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे़ ट्रकचालकास पोलिसांनी अटकही केली आहे.