शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

नांदेडात बेपर्वाईचा आणखी एक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:11 IST

शहरात जडवाहतुकीला बंदी असताना बिनदिक्कतपणे दाखल झालेल्या एका ट्रकच्या धडकेने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी देगलूरनाका येथे घडली. बेपर्वाईचा आणखी एक बळी या भागात गेला आहे.

ठळक मुद्देदेगलूरनाका : दिवसाही बिनदिक्कतपणे जड वाहतुकीची ये-जा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरात जडवाहतुकीला बंदी असताना बिनदिक्कतपणे दाखल झालेल्या एका ट्रकच्या धडकेने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी देगलूरनाका येथे घडली. बेपर्वाईचा आणखी एक बळी या भागात गेला आहे.जुन्या नांदेडातील देगलूरनाका हा नेहमीच वर्दळीचा भाग आहे. शहराबाहेर जाण्यासाठी आणि शहरात येण्यासाठी जुन्या पुलावरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. त्यामध्ये जडवाहनांचाही समावेश आहे. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वाजेगाव येथील श्याम जळबा मनवर हे वाजेगावहून एम.एच.२६ बीएफ-८०५३ या क्रमांकाच्या दुचाकीवरुन बाफना टी पॉइंटकडे जात होते. त्यावेळी देगलूर नाका परिसरातील टायरबोर्डजवळ एम.एच.२६ एच-५७४५ या क्रमांकाच्या ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या श्याम मनवर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी देगलूरनाका भागात रास्ता रोको केला. जवळपास एक तास चाललेल्या या रास्ता रोकोमध्ये पोलिस प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून या भागातील जड वाहतूक बंद करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. मात्र त्याकडे दूर्लक्षच होत आहे. हीच बाब संतप्त नागरिकांनी यावेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. रास्ता रोकोमध्ये युवकांसह मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. संतप्त नागरिकांना आवरण्यासाठी इतवारा तसेच नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले. नागरिकांची समजूत काढून त्यांनी वाहतूक सुरळीत केली. जवळपास तासभर चाललेल्या या आंदोलनात देगलूरनाका भागातील युवकांचा सहभाग होता़राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष शेख रऊफ जमीनदार यांनी ३० जानेवारी रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून शहरामध्ये दाखल होणा-या जडवाहनांवर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. देगलूरनाका येथील वाहतूककोंडीचा उल्लेख त्यांनी केला होता. मात्र त्या निवेदनाकडे दूर्लक्ष करण्यात आले.देगलूरनाका भागात यापूर्वीही जडवाहतुकीचे अनेक बळी गेले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात ट्रकची ये-जा होते. दिवसा होणारी ये-जा रोखण्याची गरज असताना पोलिसांकडून मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्षच केले जाते. परिणामी निष्पापांचे बळी जात आहेत. हे बळी कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे़दरम्यान, घटनेप्रकरणी संजय जळबा मनवर यांनी दिलेल्या तक्रारीअधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात आरोपी ट्रक चालक अमृत मोटरगे याच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे़ ट्रकचालकास पोलिसांनी अटकही केली आहे.