शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

कोरोना रुग्ण संख्येबरोबर लस घेणाऱ्यांची संख्याही रोडावत चालली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:25 IST

नायगाव बाजार- तालुक्यातील कोरोनाची साथ रोखण्यासाठी व बाधित रुग्णसंख्येचा आकडा कमी करण्यासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे सर्वच विभागाचे अधिकारी-कर्मचारी व ...

नायगाव बाजार- तालुक्यातील कोरोनाची साथ रोखण्यासाठी व बाधित रुग्णसंख्येचा आकडा कमी करण्यासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे सर्वच विभागाचे अधिकारी-कर्मचारी व जनतेच्या सहकार्यामुळे ही साथ आटोक्यात आली आणि बाधितांची संख्या कमी झाली. हे जरी बरोबर असले तरी जेव्हा रोजच्या रोज या संसर्ग रोगाने बाधित झालेल्यांची संख्या व मृत्यूचे आकडे वाढत होते तेव्हा लोक लसीकरण केंद्रावर रांगा लावून लस टोचून घेत होते. ती मिळत नसेल तर त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालीत असत. केंद्रावरील कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत असत. वेळप्रसंगी त्या ठिकाणी पोलिसांना देखील पाचारण करावे लागे. अशी परिस्थिती निर्माण होत होती. अनेक उपाययोजने बरोबर झालेल्या लसीकरणामुळे बाधित रुग्णसंख्येचा आलेख कमी होऊन तो महिन्याकाठी एका अंकावर आला. नोंदीनुसार २८ ऑगस्टपासून तो निरंक आहे. लसीकरणामुळे बाधितांचा आकडा कमी होत असला तरी लस न घेतलेल्यांची संख्या काही कमी नाही परंतु हे लोक केंद्रावर जाऊन लस टोचून घेत नाहीत. त्यामुळे केंद्रावर लस घेणाऱ्याची संख्या कमी होत आहे. कारण कोरोना संपला या भ्रमात ते वावरत असावेत.

तालुक्यात लसीकरणासाठी ग्रामीण रुग्णालय नायगाव बाजार, प्राथमिक आरोग्य केंद्र बडबडा, कुंटूर, मांजरम व उपकेंद्र नर्सी, शेळगाव गौरी, मुगाव, टेंभुर्णी, होटाळा, गडगा, कोलंबी, राहेर, ईकळीमोर, सुजलेगाव, रातोळी, सांगवी, घुंगराळा, देगाव, कहाळा, कुष्णूर, सोमठाणा, रुई, अंतरगाव आदी ठिकाणी व्यवस्था केली. शहरांमध्ये वाॅर्ड वाईस फेरी मारून लसीकरण करण्याची व्यवस्था ग्रा. रु.च्या वैद्यकीय अधीक्षकांनी केली. या सर्व केंद्रावर आरोग्य विभागाने लस उपलब्ध करून दिलेली आहे. केंद्रावर मुबलक अशी लस उपलब्ध असताना देखील ते घेणाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे. तालुक्यात ३६ टक्के लसीकरण झाले आहे.

यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कडधान्यातील मुगाचा पेरा १५७१ हेक्टरमध्ये केला. ज्यात नायगाव मंडळात २६४ हेक्टर, नरसी मंडळात ३०४ हेक्टर, कुंटूर मंडळात २८५ हेक्टर, बरबडा मंडळात ३९८ हेक्टर, मांजरम मंडळात ३२० हेक्टर आहे. प्रारंभी निसर्गाने साथ दिल्याने मुगाचे पीक चांगले होते परंतु जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सलग २२ दिवस पाऊस झाला नसल्याने उत्पादनात घट झाली असली तरी इतर पिकात त्याची उणीव भरून निघेल या आशेवर शेतकरी असताना ६ व ७ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाला. याची नोंद १२९ मि. मी.अशी झाली.या पावसामुळे इतर पिकांचे बरेच नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यावर पुन्हा आर्थिक संकट ओढवले आहे.