शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

कोरोना रुग्ण संख्येबरोबर लस घेणाऱ्यांची संख्याही रोडावत चालली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:25 IST

नायगाव बाजार- तालुक्यातील कोरोनाची साथ रोखण्यासाठी व बाधित रुग्णसंख्येचा आकडा कमी करण्यासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे सर्वच विभागाचे अधिकारी-कर्मचारी व ...

नायगाव बाजार- तालुक्यातील कोरोनाची साथ रोखण्यासाठी व बाधित रुग्णसंख्येचा आकडा कमी करण्यासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे सर्वच विभागाचे अधिकारी-कर्मचारी व जनतेच्या सहकार्यामुळे ही साथ आटोक्यात आली आणि बाधितांची संख्या कमी झाली. हे जरी बरोबर असले तरी जेव्हा रोजच्या रोज या संसर्ग रोगाने बाधित झालेल्यांची संख्या व मृत्यूचे आकडे वाढत होते तेव्हा लोक लसीकरण केंद्रावर रांगा लावून लस टोचून घेत होते. ती मिळत नसेल तर त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालीत असत. केंद्रावरील कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत असत. वेळप्रसंगी त्या ठिकाणी पोलिसांना देखील पाचारण करावे लागे. अशी परिस्थिती निर्माण होत होती. अनेक उपाययोजने बरोबर झालेल्या लसीकरणामुळे बाधित रुग्णसंख्येचा आलेख कमी होऊन तो महिन्याकाठी एका अंकावर आला. नोंदीनुसार २८ ऑगस्टपासून तो निरंक आहे. लसीकरणामुळे बाधितांचा आकडा कमी होत असला तरी लस न घेतलेल्यांची संख्या काही कमी नाही परंतु हे लोक केंद्रावर जाऊन लस टोचून घेत नाहीत. त्यामुळे केंद्रावर लस घेणाऱ्याची संख्या कमी होत आहे. कारण कोरोना संपला या भ्रमात ते वावरत असावेत.

तालुक्यात लसीकरणासाठी ग्रामीण रुग्णालय नायगाव बाजार, प्राथमिक आरोग्य केंद्र बडबडा, कुंटूर, मांजरम व उपकेंद्र नर्सी, शेळगाव गौरी, मुगाव, टेंभुर्णी, होटाळा, गडगा, कोलंबी, राहेर, ईकळीमोर, सुजलेगाव, रातोळी, सांगवी, घुंगराळा, देगाव, कहाळा, कुष्णूर, सोमठाणा, रुई, अंतरगाव आदी ठिकाणी व्यवस्था केली. शहरांमध्ये वाॅर्ड वाईस फेरी मारून लसीकरण करण्याची व्यवस्था ग्रा. रु.च्या वैद्यकीय अधीक्षकांनी केली. या सर्व केंद्रावर आरोग्य विभागाने लस उपलब्ध करून दिलेली आहे. केंद्रावर मुबलक अशी लस उपलब्ध असताना देखील ते घेणाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे. तालुक्यात ३६ टक्के लसीकरण झाले आहे.

यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कडधान्यातील मुगाचा पेरा १५७१ हेक्टरमध्ये केला. ज्यात नायगाव मंडळात २६४ हेक्टर, नरसी मंडळात ३०४ हेक्टर, कुंटूर मंडळात २८५ हेक्टर, बरबडा मंडळात ३९८ हेक्टर, मांजरम मंडळात ३२० हेक्टर आहे. प्रारंभी निसर्गाने साथ दिल्याने मुगाचे पीक चांगले होते परंतु जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सलग २२ दिवस पाऊस झाला नसल्याने उत्पादनात घट झाली असली तरी इतर पिकात त्याची उणीव भरून निघेल या आशेवर शेतकरी असताना ६ व ७ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाला. याची नोंद १२९ मि. मी.अशी झाली.या पावसामुळे इतर पिकांचे बरेच नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यावर पुन्हा आर्थिक संकट ओढवले आहे.