शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्ण संख्येबरोबर लस घेणाऱ्यांची संख्याही रोडावत चालली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:25 IST

नायगाव बाजार- तालुक्यातील कोरोनाची साथ रोखण्यासाठी व बाधित रुग्णसंख्येचा आकडा कमी करण्यासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे सर्वच विभागाचे अधिकारी-कर्मचारी व ...

नायगाव बाजार- तालुक्यातील कोरोनाची साथ रोखण्यासाठी व बाधित रुग्णसंख्येचा आकडा कमी करण्यासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे सर्वच विभागाचे अधिकारी-कर्मचारी व जनतेच्या सहकार्यामुळे ही साथ आटोक्यात आली आणि बाधितांची संख्या कमी झाली. हे जरी बरोबर असले तरी जेव्हा रोजच्या रोज या संसर्ग रोगाने बाधित झालेल्यांची संख्या व मृत्यूचे आकडे वाढत होते तेव्हा लोक लसीकरण केंद्रावर रांगा लावून लस टोचून घेत होते. ती मिळत नसेल तर त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालीत असत. केंद्रावरील कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत असत. वेळप्रसंगी त्या ठिकाणी पोलिसांना देखील पाचारण करावे लागे. अशी परिस्थिती निर्माण होत होती. अनेक उपाययोजने बरोबर झालेल्या लसीकरणामुळे बाधित रुग्णसंख्येचा आलेख कमी होऊन तो महिन्याकाठी एका अंकावर आला. नोंदीनुसार २८ ऑगस्टपासून तो निरंक आहे. लसीकरणामुळे बाधितांचा आकडा कमी होत असला तरी लस न घेतलेल्यांची संख्या काही कमी नाही परंतु हे लोक केंद्रावर जाऊन लस टोचून घेत नाहीत. त्यामुळे केंद्रावर लस घेणाऱ्याची संख्या कमी होत आहे. कारण कोरोना संपला या भ्रमात ते वावरत असावेत.

तालुक्यात लसीकरणासाठी ग्रामीण रुग्णालय नायगाव बाजार, प्राथमिक आरोग्य केंद्र बडबडा, कुंटूर, मांजरम व उपकेंद्र नर्सी, शेळगाव गौरी, मुगाव, टेंभुर्णी, होटाळा, गडगा, कोलंबी, राहेर, ईकळीमोर, सुजलेगाव, रातोळी, सांगवी, घुंगराळा, देगाव, कहाळा, कुष्णूर, सोमठाणा, रुई, अंतरगाव आदी ठिकाणी व्यवस्था केली. शहरांमध्ये वाॅर्ड वाईस फेरी मारून लसीकरण करण्याची व्यवस्था ग्रा. रु.च्या वैद्यकीय अधीक्षकांनी केली. या सर्व केंद्रावर आरोग्य विभागाने लस उपलब्ध करून दिलेली आहे. केंद्रावर मुबलक अशी लस उपलब्ध असताना देखील ते घेणाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे. तालुक्यात ३६ टक्के लसीकरण झाले आहे.

यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कडधान्यातील मुगाचा पेरा १५७१ हेक्टरमध्ये केला. ज्यात नायगाव मंडळात २६४ हेक्टर, नरसी मंडळात ३०४ हेक्टर, कुंटूर मंडळात २८५ हेक्टर, बरबडा मंडळात ३९८ हेक्टर, मांजरम मंडळात ३२० हेक्टर आहे. प्रारंभी निसर्गाने साथ दिल्याने मुगाचे पीक चांगले होते परंतु जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सलग २२ दिवस पाऊस झाला नसल्याने उत्पादनात घट झाली असली तरी इतर पिकात त्याची उणीव भरून निघेल या आशेवर शेतकरी असताना ६ व ७ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाला. याची नोंद १२९ मि. मी.अशी झाली.या पावसामुळे इतर पिकांचे बरेच नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यावर पुन्हा आर्थिक संकट ओढवले आहे.