शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला, लग्नसोहळे लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:17 IST

नांदेड : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी होणारे लग्नसोहळे यंदा लॉकडाऊनमुळे पाहण्यास मिळणार नाहीत. सलग ...

नांदेड : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी होणारे लग्नसोहळे यंदा लॉकडाऊनमुळे पाहण्यास मिळणार नाहीत. सलग दोन वर्षांपासून कोरोनामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला फटका बसत आहे. लॉकडाऊनमुळे प्रशासनाकडून आलेले निर्बंध आणि कोरोनाची भीती यामुळे पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला आहे. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्न करण्यासाठी अनेकांची लगबग असायची. मंगल कार्यालय बुक करण्यासाठी मोठी धावपळ होत असे. अनेकवेळा या दिवशीची तारीखही मिळत नव्हती. शहरातील सर्व मंगल कार्यालये, कापड बाजारपेठ, सराफा बाजार हाऊसफुल्ल असायचे. मात्र, यावर्षी या मुहूर्तावर लग्न नसल्याने शुकशुकाट पाहण्यास मिळणार आहे. विशेषत: जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात अनेकांनी या मुहूर्तावर लग्नाची तारीख बुक केली होती. मात्र, मार्च महिन्यापासूनच कोरोनाची दुसरी लाट आली आणि पाहता-पाहता कोरोना महामारीने सर्वांना कवेत घेतले. कोरोना रूग्णांची संख्या व मृत्यदर वाढल्याने सर्वत्र भयभीत वातावरण पाहण्यास मिळत होते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्न निश्चित करणाऱ्यांनी लग्न रद्द केली आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अनेकांनी लग्नकार्य तसेच अन्य कामांचा मुहूर्त पुढे ढकलले आहेत. लग्न सोहळे कार्यक्रमच रद्द झाल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

शहरात दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सराफा बाजारात माेठी गर्दी असते. तसेच कापड बाजारातही मोठी उलाढाल असायची. मात्र, यंदा कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी बाजारपेठेत शांतता आहे.

चौकट- मे महिन्यातील मुहूर्त

लग्नसराईत मे महिन्यात सर्वाधिक तारखा असल्याने अनेकांनी या महिन्यातच लग्नाची तारीख निश्चित केली होती. या महिन्यात अक्षय तृतीयेचा मुहूर्त गाठून लग्न निश्चित केले होते.

चौकट- नियमांचा अडसर

शासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यभरात कडक निर्बंध लावले आहेत. त्याची अंमलबजावणी सर्व जिल्ह्यांत होत आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लग्न सोहळ्यांवर निर्बंध लावले आहेत. २५ पेक्षा अधिक माणसे लग्नात असू नयेत, २ तासातच लग्न सोहळे आटोपते घ्यावेत, आदी नियमांचा अडसर ठरत आहे.

यंदाही कर्तव्य नाही

१. कोरोनामुळे मागील वर्षीसुद्धा लग्न सोहळ्यावर विरजण पडले होते. यंदाही हीच परिस्थिती आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार गेला. या काळात मुलीच्या लग्नासाठी जुळवाजुळव करणे अशक्य झाले. त्यामुळे यावर्षी लग्न न करण्याचे ठरवले आहे. - बाबाराव अवचार, नांदेड.

२. कोरोनाची भीती निर्माण झाल्यामुळे यंदा लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. एक वर्ष लग्न पुढे ढकलले तर काही फरक पडत नाही. लॉकडाऊनमध्ये लग्न लावणे अवघड आहे. शासनाच्या कडक निर्बंधांचे पालन करणे अशक्य आहे. - बबन भालेराव, नांदेड.