शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कॅन्सरमुक्त नांदेडसाठी प्रशासन सरसावले; पाच लाख महिलांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:12 IST

जिल्हाभरातील पाच लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

ठळक मुद्देया उपक्रमांतर्गत कॅन्सर आढळून येणाऱ्या रुग्णावर डीपीसीच्या माध्यमातून जनआरोग्य अभियानाद्वारे मोफत उपचार करण्यात येणार आहेत कॅन्सरमुक्त नांदेडसाठी ही मोहीम जिल्हाभरात राबविणार असल्याचे माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

नांदेड : वेळीच कॅन्सरचे निदान झाल्यास योग्य ते उपचार करुन रुग्णांचे प्राण वाचविता येऊ शकतात. त्यामुळेच जिल्हाभरातील पाच लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. या उपक्रमांतर्गत कॅन्सर आढळून येणाऱ्या रुग्णावर डीपीसीच्या माध्यमातून जनआरोग्य अभियानाद्वारे मोफत उपचार करण्यात येणार असून कॅन्सरमुक्त नांदेडसाठी ही मोहीम जिल्हाभरात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बहुतांश कॅन्सरचे रुग्ण तिसऱ्या, चौथ्या टप्प्यात आढळतात. त्यामुळे उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने कॅन्सरमुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढते. कॅन्सरचे निदान प्राथमिक अवस्थेत झाल्यास योग्य त्या औषधोपचाराद्वारे कॅन्सरवर यशस्वी उपचार होवू शकतात. या अनुषंगानेच जिल्ह्यातील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाची मुखेड तालुक्यात सुरूवात करण्यात आली. मुखेड तालुक्यातील चांडोळा आणि बेटमोगरा या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तपासणी केली असता ६७५ रुग्ण संशयित म्हणून आढळले. या संशयितांच्या तपासणीसाठी मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावून त्यांचे पुन्हा स्क्रनिंग करण्यात आले. 

या तपासणीत ५२ संशयित रुग्ण आढळून आले तर १५ रुग्ण अगोदर कॅन्सर झालेले होते. यावरुन कॅन्सर आजाराची तीव्रता लक्षात येते. त्यामुळेच प्रशासनाने जिल्ह्यात कॅन्सरमुक्त अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या मोहिमेसाठी आशा वर्कर्सची मदत घेण्यात येणार आहे. प्राथमिक तपासणीत कॅन्सरची लक्षणे आढळून आल्यास बार्शी येथील कॅन्सर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून पुनर्तपासणी करुन घेण्यात येणार असून तपासणीत कॅन्सरचे निदान झाल्यास संबंधित रुग्णांवर नांदेड येथे कोणार्क रुग्णालयाच्या सहकार्याने उपचार करण्यात येणार आहे. याबरोबरच आवश्यकतेनुसार रुग्णांवर मुंबई येथेही उपचार करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले़ 

रुग्णांवर मोफत उपचार करणारकॅन्सरवरील उपचाराचा खर्च सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरचा असतो.  त्यामुळेच या जनआरोग्य अभियानाच्या माध्यमातून रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहे. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर संबंधित रुग्णाला गावापासून नांदेड येथील रुग्णालयापर्यंत जाण्या-येण्याचा खर्च डीपीसीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. निदान झाल्यापासून उपचार पूर्ण होईपर्यंत रुग्णाला एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. सर्व पैसा शासकीय योजनांद्वारे करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :cancerकर्करोगNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडmedicinesऔषधं