शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आरक्षण हक्क कृती समितीचा २६ रोजी आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:13 IST

नांदेड - अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या समूहाचे पदोन्नतीमधील आरक्षण संपवून ३३ टक्के ...

नांदेड - अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या समूहाचे पदोन्नतीमधील आरक्षण संपवून ३३ टक्के आरक्षण संपविण्याचे कटकारस्थान करणार्‍या शासनाविरुध्द निषेध नोंदविण्यासाठी आणि हे आरक्षण कायम ठेवण्यात यावे, या मागणीसाठी येत्या २६ जूनरोजी राज्यस्तरीय आरक्षण हक्क कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यातील विविध १२० कर्मचारी, अधिकारी, संघटना सहभागी होणार असल्याची माहिती राज्य कोअर कमिटी सदस्य आरक्षण हक्क समिती महाराष्ट्र राज्यचे निमंत्रक इंजि. संजीवन गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध जात समूहासाठी लागू केलेले आरक्षण रद्द करून विविध जात समूहातील मागासवर्गीयांना पुन्हा गुलामीच्या जोखडात गोवण्याचा डाव सरकारने घातला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय नोकरीतील पदोन्नत्यांचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने योग्य भूमिका न बजाविल्याने हे आरक्षण रद्द झाले; तर ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात आणण्यात आले आहे. या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी आणि आरक्षण रद्द करण्यास कारणीभूत असलेल्यांवर अ‍ॅट्रॉसिटी नुसार गुन्हे दाखल करावेत, आरक्षण मंत्रीगट समितीचा अध्यक्ष मागासवर्गीय असावा, नवीन कामगार कायदा रद्द करावा, परदेश शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा वाढवावी, खासगी विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि फ्री शिप लागू करावी, सरकारी कंपन्या, बँका, विविध विभागांचे खासगीकरण आणि कंत्राटीकरण बंद करावे, तेथे आरक्षण लागू करावे, यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील १२० हून अधिक सामाजिक संघटना एकत्रित येऊन २६ जूनरोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापासून आरक्षण हक्क कृती समितीच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढणार आहे. बानाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इंजि. संजीवन गायकवाड, बामसेफचे मिलिंद भिंगारे, ईंसाफचे इंजि. आर. एस. टोपे, बानाईचे इंजि. भरतकुमार कानिंदे, महावितरण संघटनेचे इंजि. सिध्दार्थ पाटील, कास्ट्राईबचे गणेश कांबळे, इंजि. अभिजित बळेगावकर, हत्तीअंबिरे, गोणारकर आदींची उपस्थिती होती. मोर्चास शासनाकडून परवानगी मिळो अथवा न मिळो, मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती इंजि. गायकवाड यांनी यावेळी दिली.