शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
3
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
4
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
5
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
6
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
7
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
8
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
9
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
10
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
11
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
12
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
13
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
14
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
15
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
16
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
17
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
18
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
19
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
20
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!

८८ टक्के पेरण्या आटाेपल्या, साेयाबीनचा पेरा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:13 IST

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याची ओरड आहे. प्रत्यक्षात पावसाची आकडेवारी तपासली असता जून ...

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याची ओरड आहे. प्रत्यक्षात पावसाची आकडेवारी तपासली असता जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी १५० मिमी पाऊस पडताे; परंतु यावर्षी ही सरासरी ओलांडली असून आतापर्यंत २२५ मिमी पाऊस झाला आहे. अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रानुसार जिल्ह्यात सरसकट दुबार पेरणीची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले. जेथे हलक्या जमिनी आहेत व खूप आधी तेथे पेरणी झाली. त्याच भागात दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. लाेहा, कंधार, मुदखेड व नांदेड तालुक्यातील काही भागात पाऊस कमी पडल्याने व लगतच्या तीन-चार दिवसांत पाऊस न आल्यास तेथे दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता कृषी सूत्रांनी वर्तविली आहे; परंतु प्रत्यक्षात जिल्ह्याच्या साेळाही तालुक्यांतील शेतकरी दुबार पेरणीचे संकट घाेंगावत असल्याची ओरड करताना दिसत आहेत.

उगवन क्षमतेच्या तक्रारी नाहीत....

गेल्यावर्षी साेयाबीनचे बियाणे उगवलेच नाही, अशा स्वरूपाच्या हजाराे तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या हाेत्या. यावर्षी अद्याप तरी अशा तक्रारी प्राप्त नसल्याचे सांगितले गेले. जमिनीत कमी ओल असताना झालेली पेरणी किंवा अतिवृष्टी यामुळेच बियाणे न उगवण्याच्या तक्रारी वाढू शकतात, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. गेल्या वर्षीचा अनुभव पाहून कृषी विभागाने शेतकऱ्यांना साेयाबीनचे घरचेच बियाणे वापरण्याचे आवाहन केले हाेते. जिल्ह्याधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी सुद्धा शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना फेसबुक लाइव्हद्वारे घरचेच बियाणे वापरण्याचा सल्ला दिला हाेता. या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी बहुतांश घरच्याच बियाण्याला पसंती दिली आहे. पेरणीआधी बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याचे आवाहनही शेतकऱ्यांना केले गेले हाेते. सध्या बाजारात तीन ते चार हजार क्विंटल मुबलक साेयाबीन बियाणे उपलब्ध आहे. सुरुवातीला प्रचंड मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण झाल्याने गाेंधळ उडाला हाेता; परंतु मध्यंतरी पेरण्या लांबणीवर पडताच पुरवठा पूर्ववत झाल्याने टंचाईची ओरड थांबली.

आंध्रा-तेलंगणातून चाेर बिटी बियाणे.....

कपासीबाबत आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यातून चाेरट्या मार्गाने एचपी बीटी हे शासनाचे परवानगी नसलेले बियाणे काही भागात आणले जात आहेत. पूर्वी ते माेठ्या प्रमाणात आणले जायचे; परंतु दाेन वर्षांपासून त्याचे फारसे उत्पन्न नसल्याने शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. या बियाणे विक्रीसाठी दलाल सक्रिय आहेत. हदगाव येथे कृषी अधिकाऱ्यांनी ग्राहक बनून दलालांशी संपर्क केला व प्रकरण पाेलिसांमार्फत उघड केले. मे व जून महिन्यात बियाण्यांचे नमुने घेण्यात आले. मात्र, ते फेल असल्याबाबत अद्याप काेणताही अहवाल प्राप्त झालेला नाही.