शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

८८ टक्के पेरण्या आटाेपल्या, साेयाबीनचा पेरा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:13 IST

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याची ओरड आहे. प्रत्यक्षात पावसाची आकडेवारी तपासली असता जून ...

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याची ओरड आहे. प्रत्यक्षात पावसाची आकडेवारी तपासली असता जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी १५० मिमी पाऊस पडताे; परंतु यावर्षी ही सरासरी ओलांडली असून आतापर्यंत २२५ मिमी पाऊस झाला आहे. अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रानुसार जिल्ह्यात सरसकट दुबार पेरणीची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले. जेथे हलक्या जमिनी आहेत व खूप आधी तेथे पेरणी झाली. त्याच भागात दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. लाेहा, कंधार, मुदखेड व नांदेड तालुक्यातील काही भागात पाऊस कमी पडल्याने व लगतच्या तीन-चार दिवसांत पाऊस न आल्यास तेथे दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता कृषी सूत्रांनी वर्तविली आहे; परंतु प्रत्यक्षात जिल्ह्याच्या साेळाही तालुक्यांतील शेतकरी दुबार पेरणीचे संकट घाेंगावत असल्याची ओरड करताना दिसत आहेत.

उगवन क्षमतेच्या तक्रारी नाहीत....

गेल्यावर्षी साेयाबीनचे बियाणे उगवलेच नाही, अशा स्वरूपाच्या हजाराे तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या हाेत्या. यावर्षी अद्याप तरी अशा तक्रारी प्राप्त नसल्याचे सांगितले गेले. जमिनीत कमी ओल असताना झालेली पेरणी किंवा अतिवृष्टी यामुळेच बियाणे न उगवण्याच्या तक्रारी वाढू शकतात, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. गेल्या वर्षीचा अनुभव पाहून कृषी विभागाने शेतकऱ्यांना साेयाबीनचे घरचेच बियाणे वापरण्याचे आवाहन केले हाेते. जिल्ह्याधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी सुद्धा शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना फेसबुक लाइव्हद्वारे घरचेच बियाणे वापरण्याचा सल्ला दिला हाेता. या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी बहुतांश घरच्याच बियाण्याला पसंती दिली आहे. पेरणीआधी बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याचे आवाहनही शेतकऱ्यांना केले गेले हाेते. सध्या बाजारात तीन ते चार हजार क्विंटल मुबलक साेयाबीन बियाणे उपलब्ध आहे. सुरुवातीला प्रचंड मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण झाल्याने गाेंधळ उडाला हाेता; परंतु मध्यंतरी पेरण्या लांबणीवर पडताच पुरवठा पूर्ववत झाल्याने टंचाईची ओरड थांबली.

आंध्रा-तेलंगणातून चाेर बिटी बियाणे.....

कपासीबाबत आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यातून चाेरट्या मार्गाने एचपी बीटी हे शासनाचे परवानगी नसलेले बियाणे काही भागात आणले जात आहेत. पूर्वी ते माेठ्या प्रमाणात आणले जायचे; परंतु दाेन वर्षांपासून त्याचे फारसे उत्पन्न नसल्याने शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. या बियाणे विक्रीसाठी दलाल सक्रिय आहेत. हदगाव येथे कृषी अधिकाऱ्यांनी ग्राहक बनून दलालांशी संपर्क केला व प्रकरण पाेलिसांमार्फत उघड केले. मे व जून महिन्यात बियाण्यांचे नमुने घेण्यात आले. मात्र, ते फेल असल्याबाबत अद्याप काेणताही अहवाल प्राप्त झालेला नाही.