शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

जिल्ह्यातील ७ हजार बचत गट कर्जपुरवठ्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:15 IST

ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबनाचे धोरण राबविण्यात येत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील ...

ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबनाचे धोरण राबविण्यात येत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येतात. महिलांना आर्थिक सहाय करून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक प्रगतीच्या वाटा निर्माण केल्या आहेत. त्यामुळे अनेक महिलांना बचत गटाच्या माध्यमातून पुढे येण्याची संधी प्राप्त झाली आहे. मात्र या धोरणाला बँकांच्या उदासीन धोरणामुळे खीळ बसली आहे. मागीलवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे संकट आल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. त्याचा फटका सर्वांनाच बसला. वर्षभरापासून कोरोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या महामारीत अनेकांचे बळी गेले असून, अनेकांना लॉकडाऊनमुळे बेरोजगार व्हावे लागले आहे. ग्रामीण भागातील आर्थिक घडी विस्कटल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी बचत गटांना आर्थिक आधार देण्याची आवश्यकता असताना, बँकांनी या बचतगटांना दुर्लक्षित केल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ७ हजार २१० बचत गटांपैकी केवळ १२० बचत गटांनाच बँकांनी १ कोटी ८० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.

बचत गट स्थापन करताना बँकांना विश्वासात घेऊनच खाते उघडले जाते. त्या खात्यावर शासनाकडून काही रक्कम वेळोवेळी महिला गटाच्या कार्यान्वयासाठी जमा केली जाते. तसेच बँकांकडून कर्जरूपात काही रक्कम दिली जाते. परंतु बँकांकडून खाते उघडण्यापासूनच टाळाटाळ केली जात असल्याचे महिलांनी सांगितले.

मागीलवर्षी ६ हजार ९२० गटांपैकी २ हजार ८८८ गटांना ५१ कोटी ४५ लाख ७७ हजार रुपयांचे कर्जाचे वाटप केले होते.

चौकट- जिल्ह्यातील २ हजार ६१६ गटांनी कर्जासाठी बँकेकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र अनेकांची खाती उघडली नाहीत. बँकांच्या उदासीन धोरणामुळे महिला बचत गटांच्या आर्थिक उन्नतीला खीळ बसली आहे. राज्यात कमी कर्ज पुरवठा करणाऱ्या यादीत नांदेड जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक विकास ठप्प झाला आहे.