शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
2
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
3
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
4
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
5
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
6
शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
7
सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
8
डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
9
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
10
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
11
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
12
आता सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण की खासगीकरण? विचार सुरू; सरकार म्हणते...
13
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
14
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
15
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
16
Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
17
Palmistry: भाग्य रेषा तुटलेली आहे की अखंड? 'या' स्थितीवरून उलगडते संपत्ति आणि नशिबाचे गूढ
18
Nashik Crime: कॉल केला आणि म्हणाली, 'पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवायचे नसेल तर पाच लाख दे!'
19
सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!
20
भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
Daily Top 2Weekly Top 5

लेंडी प्रकल्पासाठी ७० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:32 IST

राज्य सरकारने ९ मार्च रोजी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला़ त्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील बहुचर्चित लेंडी प्रकल्पातील बाधित १ हजार ३१० कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी ७० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आ़ डॉ. तुषार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली़ दरम्यान, मुक्रमाबाद येथे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

ठळक मुद्देमुखेड तालुका : १३१० बाधित कुटुंबांची ९३ कोटींची मागणी, मुक्रमाबादेत फटाके फोडून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कमुखेड : राज्य सरकारने ९ मार्च रोजी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला़ त्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील बहुचर्चित लेंडी प्रकल्पातील बाधित १ हजार ३१० कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी ७० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आ़ डॉ. तुषार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली़ दरम्यान, मुक्रमाबाद येथे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.तालुक्यातील गोणेगाव येथील लेंडी नदीवर होऊ घातलेले लेंडी धरण विविध कारणांनी चर्चेत आहे़ मागील ३२ वर्षांपासून धरणाचे काम रखडल्याने १२ गावच्या बाधित कुटुंबांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. गत ३० वर्षांपासून या भागाचा विकास खुंटला आहे. मुक्रमाबाद येथील १ हजार ३१० बाधित कुटुंबांनी ्रपुनर्वसन करण्यात यावे, यासाठी १२ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको केला होता. मावेजा मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला; पण आ़ डॉ. तुषार राठोड यांनी त्या ठिकाणी जाऊन मध्यस्ती करुन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व येणाºया ९० दिवसांत मावेजा मिळवून देणार अन्यथा स्वत: आमरण उपोषण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते़ त्याच मुद्यावर आ़ डॉ. राठोड यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व जलसपंदामंत्री गिरीष महाजन यांच्याकडे २०० कोटी रुपयांची मागणी केली होती़ या मागणीस मंत्रीमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.मागील अर्थसंकल्पात ५० कोटी रुपये मंजूर झाले होते. मागील रक्कमेपैकी २० कोटी खर्च झालेले असून उर्वरित ३० कोटी अखर्चिक आहेत. तसेच या अर्थसंकल्पातील ७० कोटी व मागील ३० कोटी असे मिळून १०० कोटी रुपये लाभार्थ्यांच्या मावेजासाठी देणार असल्याचे सांगितले़ लाभार्थ्यांची मागणी ही ९३़४ कोटी रुपयांची आहे. त्यामुळे सर्वांना मावेजा मिळेलच व उर्वरित रकमेत बुडीत क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन करुन नागरी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. येत्या २ वर्षांत या लेंडी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी, महसूल विभाग प्रयत्न करणार आहे.आजपर्यंतच्या इतिहासात ७० कोटी रुपयांची सर्वात मोठी तरतूद शासनाकडून करण्यात आली असून मागील काळातील २०१५ च्या अर्थसंकल्पात ३० कोटी, २०१६ च्या अर्थसंकल्पात २६ कोटी, २०१७ च्या अर्थसंकल्पात ५० कोटी तर २०१८ च्या अर्थसंकल्पात ७० कोटी रुपये असे एकूण १७६ कोटी रुपये आणल्याचे आ़ डॉ. तुषार राठोड यांनी सांगितले. मागील ३२ वर्षांच्या कालखंडात तत्कालीन लोकप्रतिनिधींनी केवळ ३५० कोटी रुपये या प्रकल्पासाठी आणले होते. या धरणाचा एकूण खर्च १३९९़८ कोटी रुपये आहे़ तर राज्य सरकारचा या धरणाचा खर्च ६२ टक्के तर उर्वरित ३८ टक्के खर्च हा तेलंगणा राज्याने करावयाचा आहे.दरम्यान, मुक्रमाबाद येथे शासनाकडून लेंडी प्रकल्पास मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार असल्याने आनंद साजरा करण्यात आला़ अनेकांनी फटाके फोडून जल्लोष केला़ मागील ३० वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता पूर्णत्वास जाणार असल्याने या भागातील विकासाचा मार्र्ग मोकळा झाला आहे़